शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
3
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
4
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
5
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
6
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
7
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
8
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
9
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
10
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
11
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
12
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
13
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."
14
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
15
जुलैची सुरुवात ठरणार खास, ९ राशींना भरघोस लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, शुभ-कल्याणकारक काळ!
16
टीम इंडियाच्या ' या ' स्टार क्रिकेटरसोबत केलेला 'वन नाईट स्टँड'; बॉबी डार्लिंगचा खुलासा
17
शेअर बाजारात घसरण, सबस्क्रायबर्सही होताहेत कमी; तरीही वाढतोय Vodafone Idea चा शेअर, कारण काय? 
18
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
19
नेटफ्लिक्सचा 'स्क्विड गेम 3' सुपरहिट की फ्लॉप? प्रेक्षकांच्या नाराजीमुळे शेअर बाजारात हाहाकार!
20
July Born Astro: कसा ओळखावा जुलैमधल्या लोकांचा स्वभाव? ब्रह्मदेवालाही कळणे कठीण; वाचा गुण-दोष!

जायकवाडी अजूनही मृतसाठ्यातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2016 01:09 IST

औरंगाबाद : मराठवाड्यात पंधरा दिवसांत झालेल्या दमदार पावसामुळे मोठ्या प्रकल्पांमध्ये बऱ्यापैकी पाण्याची आवक झाली आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यात पंधरा दिवसांत झालेल्या दमदार पावसामुळे मोठ्या प्रकल्पांमध्ये बऱ्यापैकी पाण्याची आवक झाली आहे. विभागातील अकरापैकी सहा प्रकल्पांमध्ये आतापर्यंत ३०३ दलघमी म्हणजे सुमारे १०.७० टीएमसी पाणी आले आहे. मृतसाठ्यात असलेल्या जायकवाडी धरणात सर्वाधिक १४८ दलघमी पाण्याची आवक झाली आहे. तरीसुद्धा जायकवाडी धरण अजूनही मृतसाठ्यातच आहे. जायकवाडी जिवंत साठ्यात येण्यासाठी आणखी १२५ दलघमी म्हणजे ४.४ टीएमसी पाण्याची गरज आहे.भीषण दुष्काळामुळे यंदा मे महिन्यापूर्वीच मराठवाड्यातील सर्व जलसाठे कोरडे पडले. त्यामुळे हजारो गावांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागला. मात्र, १ जुलैपासून मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत दमदार पाऊस झाला. त्यामुळे काही प्रमाणात कोरड्या जलसाठ्यांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. पंधरवड्यातील मराठवाड्यात मोठ्या धरणांमध्ये एकूण ३०३ दलघमी पाणी आले आहे. निम्न दुधना धरणात ३१ दलघमी, येलदरी धरणात ३२ दलघमी, सिद्धेश्वर धरणात ४० दलघमी, माजलगाव धरणात ५.५० दलघमी, पेनगंगा धरणात ४७ दलघमी पाणी आले आहे. तर जायकवाडी धरणात सर्वाधिक १४८ दलघमी पाणी आले आहे. मात्र, जायकवाडी धरण अजूनही मृतसाठ्यातच आहे. यंदा जायकवाडीतील जिवंत साठा मार्च महिन्यातच संपला होता. तेव्हापासून मृतसाठ्यातून पाणी उपसा सुरू आहे. आतापर्यंत मृतसाठ्यातून २७३ दलघमी पाणी उपसा झाला आहे. त्या तुलनेत गेल्या पंधरा दिवसांत धरणात १४८ दलघमीची आवक झाल्यामुळे आता जायकवाडी जिवंत साठ्यात येण्यासाठी आणखी १२५ दलघमीची आवश्यकता आहे. मराठवाड्यात सध्या अकरापैकी केवळ तीन धरणांमध्ये जिवंत साठा आहे. विष्णूपुरी धरण ८८ टक्के भरले आहे. त्यापाठोपाठ निम्न दुधना धरणात १७ टक्के साठा झाला आहे. तर पेनगंगा धरणात ४.६८ टक्के पाणीसाठा आहे. मोठ्या प्रकल्पांप्रमाणेच लघु आणि मध्यम प्रकल्पांमध्येही गेल्या पंधरा दिवसांत पाण्याची बऱ्यापैकी आवक झाल्याचे औरंगाबाद लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.