शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
4
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
5
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
6
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
7
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
8
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
9
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
10
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
11
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
12
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
13
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
14
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
15
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
16
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
17
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
18
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
19
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!

जायकवाडीची पातळी आणखी घटली!

By admin | Updated: May 5, 2016 01:22 IST

औरंगाबाद : जायकवाडी जलाशयातील पाणीपातळी झपाट्याने खालावत आहे. मृत जलसाठ्याची पाणीपातळी ४५५.५२० दशलक्ष घनमीटरपर्यंत पोहोचली आहे.

औरंगाबाद : जायकवाडी जलाशयातील पाणीपातळी झपाट्याने खालावत आहे. मृत जलसाठ्याची पाणीपातळी ४५५.५२० दशलक्ष घनमीटरपर्यंत पोहोचली आहे. औरंगाबाद शहराची तहान भागविण्यासाठी मृत पाणीसाठ्यातून अ‍ॅप्रोच चॅनलच्या मदतीने पाणी पम्पिंग स्टेशनपर्यंत आणावे लागत आहे. आॅक्टोबरपर्यंत हे पाणी पुरणार आहे. पाऊस लांबल्यास शहराच्या पाणीपुरवठ्याचे टेन्शन वाढू शकते.मनपाकडे ४५२ मीटरपर्यंत पाणी उपसा करण्याची यंत्रणा आहे. जलसंपदा विभागाने मात्र कालव्यातून पाणी सोडू नये; अन्यथा शहराला तीव्र पाणीटंचाईला समोरे जावे लागेल. महापौर त्र्यंबक तुपे यांनी मंगळवारी पाणीपुरवठा योजनची पाहणी केली. धरणातील पाण्याचे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होत आहे. धरणाची पाणीपातळी झपाट्याने खालावत असल्यामुळे मागील दीड महिन्यापासून मनपाला मृत जलसाठ्यातून पाणीपुरवठा करावा लागत आहे. धरणात ३२२ दशलक्ष घनमीटर एवढी मृत जलसाठ्याची क्षमता आहे. त्यापैकी वापरण्यायोग्य १०९ दलघमी एवढे पाणी आहे. हे पाणी १०५ दिवस पुरेल, असा अंदाज जलसंपदा विभागाने अहवालाद्वारे व्यक्त केला आहे. दररोज २.५० दलघमी पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याने धरणातील पाणीपातळी झपाट्याने खालावत आहे. शासनाकडून मिळालेल्या विशेष निधीतून ३ वर्षांपूर्वी मनपाने कालवा खोदला आहे. त्यामुळे ४५२ घनमीटरपर्यंत पाणीसाठा असेपर्यंत मनपाला पाणी उपलब्ध होऊ शकते, असे मनपाचे कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी नमूद केले.