शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
3
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
4
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
5
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
6
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
7
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
8
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
9
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
10
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
11
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
12
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
13
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
14
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
15
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
16
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
17
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
18
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
19
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
20
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम

जायकवाडीला दोन टीएमसीची गरज

By admin | Updated: July 25, 2016 01:07 IST

औरंगाबाद : मराठवाड्यातील सर्वात मोठे जायकवाडी धरण जुलैअखेरीसही मृतसाठ्यातच आहे. मृतसाठ्यातील तूट भरून जिवंत साठ्यात येण्यासाठी आणखी २ टीएमसी पाण्याची गरज आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यातील सर्वात मोठे जायकवाडी धरण जुलैअखेरीसही मृतसाठ्यातच आहे. मृतसाठ्यातील तूट भरून जिवंत साठ्यात येण्यासाठी आणखी २ टीएमसी पाण्याची गरज आहे. सध्या धरणात वरच्या भागातून १८८२ क्युसेक्सने आवक सुरू आहे.जायकवाडी धरणातील जिवंत साठा यंदा मार्च महिन्यातच संपला होता. तेव्हापासून मृतसाठ्यातील पाण्याचा वापर केला जात आहे. या धरणाची जिवंत साठ्याची क्षमता २१७१ दलघमी इतकी आहे. तर मृतसाठ्याची क्षमता ७३८ दलघमी आहे. १ जुलैपर्यंत मृतसाठ्यातूनही सुमारे २६५ दलघमीचा उपसा झाला होता. मात्र, त्यानंतर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात काहींसा पाऊस झाल्यामुळे धरणात पाण्याची आवक सुरू झाली. शिवाय वरच्या धरणांतूनही पाण्याचा विसर्ग सुरू झाला. त्यामुळे आतापर्यंत धरणात सुमारे २०० दलघमी पाण्याची आवक झाली. तरी हे धरण अजूनही मृतसाठ्यातच आहे. रविवारी जायकवाडीच्या मृतसाठ्यात ६८१ दलघमीपर्यंत मृतसाठा पोहोचला. त्यामुळे मृतसाठ्यातून जिवंत साठ्यात येण्यासाठी आणखी ५७ दलघमी म्हणजे सुमारे अडीच टीएमसी पाण्याची गरज आहे. त्यानंतरच जिवंत साठ्यात पाणी साठण्यास सुरुवात होईल. आतापर्यंतची ही सर्वाधिक वाईट परिस्थिती असल्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. याआधी याच तारखेला २०११ साली धरणाच्या जिवंत साठ्यात ३५२ दलघमी साठा होता. २०१२ साली ७ दलघमी, २०१३ साली शून्य, २०१४ साली ४१ दलघमी पाणीसाठा होता.