शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपासोबत युती तुटताच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचालींना वेग; बैठका सुरू
2
विश्वचषक विजेत्या श्रीलंकन कर्णधाराला अटक होणार; अर्जुन रणतुंगा पेट्रोलियम घोटाळ्याप्रकरणी अडचणीत
3
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८३,६५२ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीमचे डिटेल्स
4
Yamuna Expressway Accident: ७ बस, ३ कारचा थरकाप उडवणारा अपघात! चार प्रवाशांचा जळून मृत्यू
5
Stock Market Today: शेअर बाजाराच्या कामकाजाची मोठ्या घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ३०० तर निफ्टी १०० अंकांनी घसरला
6
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
7
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
8
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
9
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
10
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
11
धनुर्मासारंभ: ९ राशींना शुभ काळ, सूर्यकृपेने दुप्पट लाभ; पद-पैसा वाढ, धनुसंक्रांती ठरेल खास!
12
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
13
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
14
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
15
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
16
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
17
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
18
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
19
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
20
शत्रूला दिसणारच नाही भारताचे लढाऊ विमान, जळगावच्या बहिणाबाई विद्यापीठाचे संशोधन
Daily Top 2Weekly Top 5

जायकवाडीला दोन टीएमसीची गरज

By admin | Updated: July 25, 2016 01:07 IST

औरंगाबाद : मराठवाड्यातील सर्वात मोठे जायकवाडी धरण जुलैअखेरीसही मृतसाठ्यातच आहे. मृतसाठ्यातील तूट भरून जिवंत साठ्यात येण्यासाठी आणखी २ टीएमसी पाण्याची गरज आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यातील सर्वात मोठे जायकवाडी धरण जुलैअखेरीसही मृतसाठ्यातच आहे. मृतसाठ्यातील तूट भरून जिवंत साठ्यात येण्यासाठी आणखी २ टीएमसी पाण्याची गरज आहे. सध्या धरणात वरच्या भागातून १८८२ क्युसेक्सने आवक सुरू आहे.जायकवाडी धरणातील जिवंत साठा यंदा मार्च महिन्यातच संपला होता. तेव्हापासून मृतसाठ्यातील पाण्याचा वापर केला जात आहे. या धरणाची जिवंत साठ्याची क्षमता २१७१ दलघमी इतकी आहे. तर मृतसाठ्याची क्षमता ७३८ दलघमी आहे. १ जुलैपर्यंत मृतसाठ्यातूनही सुमारे २६५ दलघमीचा उपसा झाला होता. मात्र, त्यानंतर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात काहींसा पाऊस झाल्यामुळे धरणात पाण्याची आवक सुरू झाली. शिवाय वरच्या धरणांतूनही पाण्याचा विसर्ग सुरू झाला. त्यामुळे आतापर्यंत धरणात सुमारे २०० दलघमी पाण्याची आवक झाली. तरी हे धरण अजूनही मृतसाठ्यातच आहे. रविवारी जायकवाडीच्या मृतसाठ्यात ६८१ दलघमीपर्यंत मृतसाठा पोहोचला. त्यामुळे मृतसाठ्यातून जिवंत साठ्यात येण्यासाठी आणखी ५७ दलघमी म्हणजे सुमारे अडीच टीएमसी पाण्याची गरज आहे. त्यानंतरच जिवंत साठ्यात पाणी साठण्यास सुरुवात होईल. आतापर्यंतची ही सर्वाधिक वाईट परिस्थिती असल्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. याआधी याच तारखेला २०११ साली धरणाच्या जिवंत साठ्यात ३५२ दलघमी साठा होता. २०१२ साली ७ दलघमी, २०१३ साली शून्य, २०१४ साली ४१ दलघमी पाणीसाठा होता.