शहरं
Join us  
Trending Stories
1
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
2
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
3
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
4
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
5
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
6
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
7
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
8
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
10
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
11
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
12
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
13
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
14
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
15
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
16
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
17
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
18
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
19
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
20
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले

जायकवाडीला दोन टीएमसीची गरज

By admin | Updated: July 25, 2016 01:07 IST

औरंगाबाद : मराठवाड्यातील सर्वात मोठे जायकवाडी धरण जुलैअखेरीसही मृतसाठ्यातच आहे. मृतसाठ्यातील तूट भरून जिवंत साठ्यात येण्यासाठी आणखी २ टीएमसी पाण्याची गरज आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यातील सर्वात मोठे जायकवाडी धरण जुलैअखेरीसही मृतसाठ्यातच आहे. मृतसाठ्यातील तूट भरून जिवंत साठ्यात येण्यासाठी आणखी २ टीएमसी पाण्याची गरज आहे. सध्या धरणात वरच्या भागातून १८८२ क्युसेक्सने आवक सुरू आहे.जायकवाडी धरणातील जिवंत साठा यंदा मार्च महिन्यातच संपला होता. तेव्हापासून मृतसाठ्यातील पाण्याचा वापर केला जात आहे. या धरणाची जिवंत साठ्याची क्षमता २१७१ दलघमी इतकी आहे. तर मृतसाठ्याची क्षमता ७३८ दलघमी आहे. १ जुलैपर्यंत मृतसाठ्यातूनही सुमारे २६५ दलघमीचा उपसा झाला होता. मात्र, त्यानंतर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात काहींसा पाऊस झाल्यामुळे धरणात पाण्याची आवक सुरू झाली. शिवाय वरच्या धरणांतूनही पाण्याचा विसर्ग सुरू झाला. त्यामुळे आतापर्यंत धरणात सुमारे २०० दलघमी पाण्याची आवक झाली. तरी हे धरण अजूनही मृतसाठ्यातच आहे. रविवारी जायकवाडीच्या मृतसाठ्यात ६८१ दलघमीपर्यंत मृतसाठा पोहोचला. त्यामुळे मृतसाठ्यातून जिवंत साठ्यात येण्यासाठी आणखी ५७ दलघमी म्हणजे सुमारे अडीच टीएमसी पाण्याची गरज आहे. त्यानंतरच जिवंत साठ्यात पाणी साठण्यास सुरुवात होईल. आतापर्यंतची ही सर्वाधिक वाईट परिस्थिती असल्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. याआधी याच तारखेला २०११ साली धरणाच्या जिवंत साठ्यात ३५२ दलघमी साठा होता. २०१२ साली ७ दलघमी, २०१३ साली शून्य, २०१४ साली ४१ दलघमी पाणीसाठा होता.