शहरं
Join us  
Trending Stories
1
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
2
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
3
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
4
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
5
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
7
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
8
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
9
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
10
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
11
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
12
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
13
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
14
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
15
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
16
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
17
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
18
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
19
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
20
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च

जामवाडीकर स्वस्त धान्यापासून वंचित

By admin | Updated: June 13, 2014 00:36 IST

जामवाडी: जालना तालुक्यातील जामवाडी येथील स्वस्तधान्य दुकानाचा प्रश्न मागील चार वर्षापासून रेग्ाांळलेला आहे.

जामवाडी: जालना तालुक्यातील जामवाडी येथील स्वस्तधान्य दुकानाचा प्रश्न मागील चार वर्षापासून रेग्ाांळलेला आहे. चार वर्षात परिसरातील पाच गावांच्या दुकानाला गाव जोडले. आता मागील दहा महिन्यांपासून इतर कोणत्याही गावाला जामवाडीची दुकान जोडली नसल्याने ग्रामस्थांना धान्यापासून वंचित रहावे लागत आहे.दरम्यान गावाच्या शिधापत्रिका धारकांच्या कोट्यातील धान्य व रॉकेल दहाही महिन्यांचे एकत्रीत वाटप करावे अशी मागणी होत आहे.जामवाडीची लोकसंख्या तीन हजार आहे. गावात एपीएलचे २२५ तर बीपीएलचे ७१, अंत्योेदयचे २५ कार्डधारक आहेत. शिवाय अन्न सुरक्षा योजनेची लाभार्थीच अद्याप निश्चत झालेली नाही. गावातील स्वस्त धान्याची दुकान विविध कार्यकारी सेवा सोसायटीकडे होती. सोसायटीने चार वर्षापूर्वीच गावात दुकान चालविण्यास असमर्थता दर्शविल्याने ही दुकान दुसऱ्या गावातील स्वस्त धान्य दुकानाला जोडली होती. आता पर्यंत ही दुकान पानशेंद्रा, गोंदेगाव, धावेडी, नागेवाडी व तांदूळवाडी येथील दुकानांना सहा महिने ते एकवर्ष अशा कालवधीसाठी जोडलेली आहे. दुकानाबाहेर गावाच्या दुकानाला जोडण्यात येत असल्याने काही ग्रामस्थांना स्वस्तधान्य मिळत नाही. एका दुकानदाराने धान्य परस्पर उचलून त्याचा काळाबाजार केला. याबाबत ग्रामस्थांनी जिल्हापुरवठा अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्यानंतर त्या दुकानाची चौकशी लावण्यात आली. मात्र ही चौकशी अद्यापही पूर्ण झालेली नाही ती लालफितीत अडकली आहे.तेव्हा पासून त्या दुकानदाराकडूनही ही दुकान काढण्यात आली. त्यामुळे मागील दहा महिन्यापासून गावाची दुकान फक्त नावालाच आहे. ही दुकान कोणत्याही गावाला जोडली नसल्याने ग्रामस्थ धान्य व रॉकेलपासून वंचित रहावे लागत आहे. धान्य पुरवठा करण्याची मागणी शिधापत्रिकाधारकांतून होत आहे. (वार्ताहर)कायमस्वरूपी दुकान द्यागावात मागील चार वर्षापासून स्वस्तधान्य दुकानाचा खो- खोचा खेळ चालू आहे. त्यातच मागील दहा महिन्यांपासून ही दुकान कोणत्याही दुकानाला जोडलेली नाही. त्यासाठी जिल्हा पुरवठा विभागही लक्ष देत नाही. एकीकडे शासन अन्न सुरक्षा योजने सारखी महत्वाकांक्षी योजना राबवीत आहे. दुसरीकडे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावालाच धान्यापासून वंचित राहावे लागत आहे. मागील चार वर्षांपासून प्रशासन फक्त वेळो- वेळी दुकान दुसऱ्या दुकानाला जोडते मात्र कायमस्वरूपी काहीच उपाय योजना केली नाही. त्यामुळे गावात कायमस्वरूपी स्वस्त धान्याचे दुकान कार्यान्वित करण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.आचारसंहिता आडसध्या आचार संहिता असल्याने गावात नव्याने दुकाना संबधी जाहीर प्रगटन काढता येत नाही तसेच दुकान दुसऱ्या दुकानाला जोडण्याचे अधिकार हे तहसीलदारांना आहे. असे जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल माचेवाड यांनी सांगितले.गावातील राजकीय पुढारी आपल्याच मर्जीतील दुकानाला हे दुकान जोडावे म्हणून शिफारशी करत आहे. त्यामुळे एकावे कुणाचे असा पेच निर्माण झाला असल्याचे तहसीलदार जे.डी. वळवी यांनी सांगितले.