शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

जामवाडीकर स्वस्त धान्यापासून वंचित

By admin | Updated: June 13, 2014 00:36 IST

जामवाडी: जालना तालुक्यातील जामवाडी येथील स्वस्तधान्य दुकानाचा प्रश्न मागील चार वर्षापासून रेग्ाांळलेला आहे.

जामवाडी: जालना तालुक्यातील जामवाडी येथील स्वस्तधान्य दुकानाचा प्रश्न मागील चार वर्षापासून रेग्ाांळलेला आहे. चार वर्षात परिसरातील पाच गावांच्या दुकानाला गाव जोडले. आता मागील दहा महिन्यांपासून इतर कोणत्याही गावाला जामवाडीची दुकान जोडली नसल्याने ग्रामस्थांना धान्यापासून वंचित रहावे लागत आहे.दरम्यान गावाच्या शिधापत्रिका धारकांच्या कोट्यातील धान्य व रॉकेल दहाही महिन्यांचे एकत्रीत वाटप करावे अशी मागणी होत आहे.जामवाडीची लोकसंख्या तीन हजार आहे. गावात एपीएलचे २२५ तर बीपीएलचे ७१, अंत्योेदयचे २५ कार्डधारक आहेत. शिवाय अन्न सुरक्षा योजनेची लाभार्थीच अद्याप निश्चत झालेली नाही. गावातील स्वस्त धान्याची दुकान विविध कार्यकारी सेवा सोसायटीकडे होती. सोसायटीने चार वर्षापूर्वीच गावात दुकान चालविण्यास असमर्थता दर्शविल्याने ही दुकान दुसऱ्या गावातील स्वस्त धान्य दुकानाला जोडली होती. आता पर्यंत ही दुकान पानशेंद्रा, गोंदेगाव, धावेडी, नागेवाडी व तांदूळवाडी येथील दुकानांना सहा महिने ते एकवर्ष अशा कालवधीसाठी जोडलेली आहे. दुकानाबाहेर गावाच्या दुकानाला जोडण्यात येत असल्याने काही ग्रामस्थांना स्वस्तधान्य मिळत नाही. एका दुकानदाराने धान्य परस्पर उचलून त्याचा काळाबाजार केला. याबाबत ग्रामस्थांनी जिल्हापुरवठा अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्यानंतर त्या दुकानाची चौकशी लावण्यात आली. मात्र ही चौकशी अद्यापही पूर्ण झालेली नाही ती लालफितीत अडकली आहे.तेव्हा पासून त्या दुकानदाराकडूनही ही दुकान काढण्यात आली. त्यामुळे मागील दहा महिन्यापासून गावाची दुकान फक्त नावालाच आहे. ही दुकान कोणत्याही गावाला जोडली नसल्याने ग्रामस्थ धान्य व रॉकेलपासून वंचित रहावे लागत आहे. धान्य पुरवठा करण्याची मागणी शिधापत्रिकाधारकांतून होत आहे. (वार्ताहर)कायमस्वरूपी दुकान द्यागावात मागील चार वर्षापासून स्वस्तधान्य दुकानाचा खो- खोचा खेळ चालू आहे. त्यातच मागील दहा महिन्यांपासून ही दुकान कोणत्याही दुकानाला जोडलेली नाही. त्यासाठी जिल्हा पुरवठा विभागही लक्ष देत नाही. एकीकडे शासन अन्न सुरक्षा योजने सारखी महत्वाकांक्षी योजना राबवीत आहे. दुसरीकडे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावालाच धान्यापासून वंचित राहावे लागत आहे. मागील चार वर्षांपासून प्रशासन फक्त वेळो- वेळी दुकान दुसऱ्या दुकानाला जोडते मात्र कायमस्वरूपी काहीच उपाय योजना केली नाही. त्यामुळे गावात कायमस्वरूपी स्वस्त धान्याचे दुकान कार्यान्वित करण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.आचारसंहिता आडसध्या आचार संहिता असल्याने गावात नव्याने दुकाना संबधी जाहीर प्रगटन काढता येत नाही तसेच दुकान दुसऱ्या दुकानाला जोडण्याचे अधिकार हे तहसीलदारांना आहे. असे जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल माचेवाड यांनी सांगितले.गावातील राजकीय पुढारी आपल्याच मर्जीतील दुकानाला हे दुकान जोडावे म्हणून शिफारशी करत आहे. त्यामुळे एकावे कुणाचे असा पेच निर्माण झाला असल्याचे तहसीलदार जे.डी. वळवी यांनी सांगितले.