शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

जामवाडीकर स्वस्त धान्यापासून वंचित

By admin | Updated: June 13, 2014 00:36 IST

जामवाडी: जालना तालुक्यातील जामवाडी येथील स्वस्तधान्य दुकानाचा प्रश्न मागील चार वर्षापासून रेग्ाांळलेला आहे.

जामवाडी: जालना तालुक्यातील जामवाडी येथील स्वस्तधान्य दुकानाचा प्रश्न मागील चार वर्षापासून रेग्ाांळलेला आहे. चार वर्षात परिसरातील पाच गावांच्या दुकानाला गाव जोडले. आता मागील दहा महिन्यांपासून इतर कोणत्याही गावाला जामवाडीची दुकान जोडली नसल्याने ग्रामस्थांना धान्यापासून वंचित रहावे लागत आहे.दरम्यान गावाच्या शिधापत्रिका धारकांच्या कोट्यातील धान्य व रॉकेल दहाही महिन्यांचे एकत्रीत वाटप करावे अशी मागणी होत आहे.जामवाडीची लोकसंख्या तीन हजार आहे. गावात एपीएलचे २२५ तर बीपीएलचे ७१, अंत्योेदयचे २५ कार्डधारक आहेत. शिवाय अन्न सुरक्षा योजनेची लाभार्थीच अद्याप निश्चत झालेली नाही. गावातील स्वस्त धान्याची दुकान विविध कार्यकारी सेवा सोसायटीकडे होती. सोसायटीने चार वर्षापूर्वीच गावात दुकान चालविण्यास असमर्थता दर्शविल्याने ही दुकान दुसऱ्या गावातील स्वस्त धान्य दुकानाला जोडली होती. आता पर्यंत ही दुकान पानशेंद्रा, गोंदेगाव, धावेडी, नागेवाडी व तांदूळवाडी येथील दुकानांना सहा महिने ते एकवर्ष अशा कालवधीसाठी जोडलेली आहे. दुकानाबाहेर गावाच्या दुकानाला जोडण्यात येत असल्याने काही ग्रामस्थांना स्वस्तधान्य मिळत नाही. एका दुकानदाराने धान्य परस्पर उचलून त्याचा काळाबाजार केला. याबाबत ग्रामस्थांनी जिल्हापुरवठा अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्यानंतर त्या दुकानाची चौकशी लावण्यात आली. मात्र ही चौकशी अद्यापही पूर्ण झालेली नाही ती लालफितीत अडकली आहे.तेव्हा पासून त्या दुकानदाराकडूनही ही दुकान काढण्यात आली. त्यामुळे मागील दहा महिन्यापासून गावाची दुकान फक्त नावालाच आहे. ही दुकान कोणत्याही गावाला जोडली नसल्याने ग्रामस्थ धान्य व रॉकेलपासून वंचित रहावे लागत आहे. धान्य पुरवठा करण्याची मागणी शिधापत्रिकाधारकांतून होत आहे. (वार्ताहर)कायमस्वरूपी दुकान द्यागावात मागील चार वर्षापासून स्वस्तधान्य दुकानाचा खो- खोचा खेळ चालू आहे. त्यातच मागील दहा महिन्यांपासून ही दुकान कोणत्याही दुकानाला जोडलेली नाही. त्यासाठी जिल्हा पुरवठा विभागही लक्ष देत नाही. एकीकडे शासन अन्न सुरक्षा योजने सारखी महत्वाकांक्षी योजना राबवीत आहे. दुसरीकडे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावालाच धान्यापासून वंचित राहावे लागत आहे. मागील चार वर्षांपासून प्रशासन फक्त वेळो- वेळी दुकान दुसऱ्या दुकानाला जोडते मात्र कायमस्वरूपी काहीच उपाय योजना केली नाही. त्यामुळे गावात कायमस्वरूपी स्वस्त धान्याचे दुकान कार्यान्वित करण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.आचारसंहिता आडसध्या आचार संहिता असल्याने गावात नव्याने दुकाना संबधी जाहीर प्रगटन काढता येत नाही तसेच दुकान दुसऱ्या दुकानाला जोडण्याचे अधिकार हे तहसीलदारांना आहे. असे जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल माचेवाड यांनी सांगितले.गावातील राजकीय पुढारी आपल्याच मर्जीतील दुकानाला हे दुकान जोडावे म्हणून शिफारशी करत आहे. त्यामुळे एकावे कुणाचे असा पेच निर्माण झाला असल्याचे तहसीलदार जे.डी. वळवी यांनी सांगितले.