शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

‘जलयुक्त’ची पावणेदोन हजारावर कामे पूर्ण !

By admin | Updated: April 15, 2015 00:40 IST

उस्मानाबाद : वारंवार उद्भवणाऱ्या टंचाई परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी शासनाकडून जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे.

उस्मानाबाद : वारंवार उद्भवणाऱ्या टंचाई परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी शासनाकडून जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यातील २१७ गावांची निवड करण्यात आली असून आजवर २ हजार ३१२ कामे पूर्ण झाली आहेत. यावर सुमारे १४ कोटी २० लाख रुपये खर्च झाल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे म्हणाले की, अभियानासाठी उस्मानाबाद तालुक्यातील ३५, तुळजापूर ३९, लोहारा ०७, भूम २२, कळंब ५७, वाशी १६ तर परंडा १४ गावांची निवड करण्यात आली आहे. त्यानुसार २१७ गावात विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. उपरोक्त गावांमध्ये ३ हजार ५१२ कामांना मंजुरी देण्यात आली होती. यापैकी १४ एप्रिलअखेर २ हजार ३१२ कामे पूर्ण झाली असून, यावर १४ कोटी २० लाख ४८ हजार रुपयांचा निधी खर्च झाल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये लोकसहभागातून गाळ काढणे २६ कामे, कंपार्टमेंट बंडिग १८३ कामे, शेत तळे ४४, सिमेंट नाला बांध २३, सिमेंट नाला बांध दुरुस्ती १४८, विहीर व बोअर पुनर्भरन ६, नाला खोलीकरण व सरळीकरण २४७, ठिंबक व तुषार सिंचनच्या १ हजार ६२४ कामांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे आणखी १ हजार २०० कामे प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत, निवासी उप जिल्हाधिकारी श्रीरंग तांबे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)उस्मानाबाद : जलयुक्त शिवार अभियानातील कामे आराखड्यानुसार सर्व यंत्रणांनी पूर्ण करावीत. सदरील कामे राबवित असताना कोणत्याही परिस्थितीत दर्जाशी तडजोड करता कामा नये, असे सांगत जी मंडळी दर्जा राखण्याकडे कानाडोळा करेल, त्यांच्याविरूद्ध कठोर कारवाई केली जाईल, अशी तंबी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिली. जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी मंगळवारी जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गतच्या कामांचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, निवासी उप जिल्हाधिकारी श्रीरंग तांबे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, कृषी उपविभागीय अधिकारी, तालुका तहसीलदार, पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, भूजल सर्वेक्षण पाटबंधारे, लघुपाटबंधारे आदी यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते. काही गावांना भेटी देऊन कामांची पाहणी केली असता काही ठिकाणच्या कामांचा दर्जा राखला नसल्याचे आढळून आले होते. याच पार्श्वभूमीवर त्यांनी मंगळवारी आढावा बैठक घेतली. यावेळी ते म्हणाले की, अभियानामध्ये जिल्हा अव्वल आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी कामासोबतच त्याच्या दर्जावरही लक्ष केंद्रित करावे. ज्यामुळे टंचाईग्रस्त गावे कायमस्वरूपी टंचाईच्या जोखडातून सुटतील. यावेळी त्यांनी गावनिहाय कामांचा आढावा घेऊन आवश्यक त्या सूचना केल्या.