शहरं
Join us  
Trending Stories
1
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
2
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
3
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
4
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
5
ATM मधून पैसे काढताना तुम्हीही दोनदा Cancel बटन दाबता का? खरंच कामाची आहे का ही ट्रिक
6
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
7
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
8
BCCI नं श्रेयस अय्यरला दिलं कॅप्टन्सीचं गिफ्ट; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ
9
'तो खोटं बोलला, हॉटेलमध्ये जाताच त्याने माझी...'; विधवा सासूने जावयावर केला खळबळजनक आरोप
10
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
11
जीएसटी कपातीमुळे कुटुंबाच्या मासिक खर्चात होणार बचत; पण वाचलेल्या पैशांची कुठे, कशी गुंतवणूक कराल?
12
Raja Raghuvanshi : कट, खून अन् पुरावे... मेघालय पोलिसांनी तब्बल ७९० पानांमध्ये नोंदवला सोनम रघुवंशी आणि राजचा गुन्हा!
13
रश्मिका मंदानाने घातली डायमंड रिंग, विजय देवरकोंडाशी झाला साखरपुडा? चर्चांना उधाण
14
Upcoming IPO: २१ वर्ष जुनी कंपनी IPO आणण्याच्या तयारीत, ८०० कोटी रुपये उभे करण्याची योजना
15
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
16
तब्बल २२ वर्षे सुरू होता घटस्फोटचा खटला, अखेर कोर्टाने दिली मंजूरी! पण वेगळं होण्याचं कारण ऐकाल तर हैराण व्हाल!
17
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
18
स्पाय कॅमेरा, ७४ तरुणींचे व्हिडिओ, खाजगी एअरलाइन्समधील पायलटचं धक्कादायक कृत्य, असं फुटलं बिंग   
19
तिला फोटोशूटसाठी भारतात पाठवण्यास राजी नाही पाकिस्तान; वर्ल्ड कप आधी घेतला मोठा निर्णय
20
“त्यांच्या सल्ल्यामुळेच उद्धव ठाकरे सत्तेवरून पायउतार झाले”; केंद्रीय मंत्र्यांचा खोचक टोला

‘जलयुक्त’ची पावणेदोन हजारावर कामे पूर्ण !

By admin | Updated: April 15, 2015 00:40 IST

उस्मानाबाद : वारंवार उद्भवणाऱ्या टंचाई परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी शासनाकडून जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे.

उस्मानाबाद : वारंवार उद्भवणाऱ्या टंचाई परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी शासनाकडून जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यातील २१७ गावांची निवड करण्यात आली असून आजवर २ हजार ३१२ कामे पूर्ण झाली आहेत. यावर सुमारे १४ कोटी २० लाख रुपये खर्च झाल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे म्हणाले की, अभियानासाठी उस्मानाबाद तालुक्यातील ३५, तुळजापूर ३९, लोहारा ०७, भूम २२, कळंब ५७, वाशी १६ तर परंडा १४ गावांची निवड करण्यात आली आहे. त्यानुसार २१७ गावात विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. उपरोक्त गावांमध्ये ३ हजार ५१२ कामांना मंजुरी देण्यात आली होती. यापैकी १४ एप्रिलअखेर २ हजार ३१२ कामे पूर्ण झाली असून, यावर १४ कोटी २० लाख ४८ हजार रुपयांचा निधी खर्च झाल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये लोकसहभागातून गाळ काढणे २६ कामे, कंपार्टमेंट बंडिग १८३ कामे, शेत तळे ४४, सिमेंट नाला बांध २३, सिमेंट नाला बांध दुरुस्ती १४८, विहीर व बोअर पुनर्भरन ६, नाला खोलीकरण व सरळीकरण २४७, ठिंबक व तुषार सिंचनच्या १ हजार ६२४ कामांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे आणखी १ हजार २०० कामे प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत, निवासी उप जिल्हाधिकारी श्रीरंग तांबे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)उस्मानाबाद : जलयुक्त शिवार अभियानातील कामे आराखड्यानुसार सर्व यंत्रणांनी पूर्ण करावीत. सदरील कामे राबवित असताना कोणत्याही परिस्थितीत दर्जाशी तडजोड करता कामा नये, असे सांगत जी मंडळी दर्जा राखण्याकडे कानाडोळा करेल, त्यांच्याविरूद्ध कठोर कारवाई केली जाईल, अशी तंबी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिली. जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी मंगळवारी जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गतच्या कामांचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, निवासी उप जिल्हाधिकारी श्रीरंग तांबे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, कृषी उपविभागीय अधिकारी, तालुका तहसीलदार, पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, भूजल सर्वेक्षण पाटबंधारे, लघुपाटबंधारे आदी यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते. काही गावांना भेटी देऊन कामांची पाहणी केली असता काही ठिकाणच्या कामांचा दर्जा राखला नसल्याचे आढळून आले होते. याच पार्श्वभूमीवर त्यांनी मंगळवारी आढावा बैठक घेतली. यावेळी ते म्हणाले की, अभियानामध्ये जिल्हा अव्वल आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी कामासोबतच त्याच्या दर्जावरही लक्ष केंद्रित करावे. ज्यामुळे टंचाईग्रस्त गावे कायमस्वरूपी टंचाईच्या जोखडातून सुटतील. यावेळी त्यांनी गावनिहाय कामांचा आढावा घेऊन आवश्यक त्या सूचना केल्या.