शहरं
Join us  
Trending Stories
1
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
2
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
3
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
4
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
5
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
6
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
7
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
8
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
9
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
10
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
11
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?
12
इंडोनेशिया, थायलंड, दुबई... पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबत कोणकोणते देश फिरली Youtuber ज्योती?
13
Viral Video : कांदा कापताना डोळ्यांतून येणार नाही पाणी! सोशल मीडियावरचा व्हायरल देसी जुगाड बघाच
14
'या' अभिनेत्याला डेट करतीये राधिका मदन? रिलेशनशिपवर म्हणाला, "मी खूप चिपकू बॉयफ्रेंड..."
15
रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला! एकाच वेळी २७३ ड्रोन्स सोडले अन्...
16
RR vs PBKS : शशांक सिंहचा परफेक्ट फिनिशिंग टच! पंजाब किंग्जनं उभारली विक्रमी धावसंख्या
17
सोलापूर आग दुर्घटना; मृतांचा आकडा पोहचला आठवर; बेडरूममध्ये सापडले पाच जणांचे मृतदेह 
18
Nehal Wadhera नं फिफ्टीसह सावरला डाव; मग प्रीती झिंटानं संघाच्या हिरोला अशी दिली दाद
19
'हा' मराठमोळा स्टार टीव्ही इंडस्ट्रीत सर्वांत महागडा! दिलीप जोशी, रुपाली गांगुलीही मागे पडले!
20
जगात 'मेड इन इंडिया'चा बोलबाला; स्मार्टफोन निर्यातीत भारताची मोठी झेप, 24 अब्ज डॉलर्स...

‘जलयुक्त’ची पावणेदोन हजारावर कामे पूर्ण !

By admin | Updated: April 15, 2015 00:40 IST

उस्मानाबाद : वारंवार उद्भवणाऱ्या टंचाई परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी शासनाकडून जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे.

उस्मानाबाद : वारंवार उद्भवणाऱ्या टंचाई परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी शासनाकडून जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यातील २१७ गावांची निवड करण्यात आली असून आजवर २ हजार ३१२ कामे पूर्ण झाली आहेत. यावर सुमारे १४ कोटी २० लाख रुपये खर्च झाल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे म्हणाले की, अभियानासाठी उस्मानाबाद तालुक्यातील ३५, तुळजापूर ३९, लोहारा ०७, भूम २२, कळंब ५७, वाशी १६ तर परंडा १४ गावांची निवड करण्यात आली आहे. त्यानुसार २१७ गावात विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. उपरोक्त गावांमध्ये ३ हजार ५१२ कामांना मंजुरी देण्यात आली होती. यापैकी १४ एप्रिलअखेर २ हजार ३१२ कामे पूर्ण झाली असून, यावर १४ कोटी २० लाख ४८ हजार रुपयांचा निधी खर्च झाल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये लोकसहभागातून गाळ काढणे २६ कामे, कंपार्टमेंट बंडिग १८३ कामे, शेत तळे ४४, सिमेंट नाला बांध २३, सिमेंट नाला बांध दुरुस्ती १४८, विहीर व बोअर पुनर्भरन ६, नाला खोलीकरण व सरळीकरण २४७, ठिंबक व तुषार सिंचनच्या १ हजार ६२४ कामांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे आणखी १ हजार २०० कामे प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत, निवासी उप जिल्हाधिकारी श्रीरंग तांबे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)उस्मानाबाद : जलयुक्त शिवार अभियानातील कामे आराखड्यानुसार सर्व यंत्रणांनी पूर्ण करावीत. सदरील कामे राबवित असताना कोणत्याही परिस्थितीत दर्जाशी तडजोड करता कामा नये, असे सांगत जी मंडळी दर्जा राखण्याकडे कानाडोळा करेल, त्यांच्याविरूद्ध कठोर कारवाई केली जाईल, अशी तंबी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिली. जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी मंगळवारी जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गतच्या कामांचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, निवासी उप जिल्हाधिकारी श्रीरंग तांबे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, कृषी उपविभागीय अधिकारी, तालुका तहसीलदार, पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, भूजल सर्वेक्षण पाटबंधारे, लघुपाटबंधारे आदी यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते. काही गावांना भेटी देऊन कामांची पाहणी केली असता काही ठिकाणच्या कामांचा दर्जा राखला नसल्याचे आढळून आले होते. याच पार्श्वभूमीवर त्यांनी मंगळवारी आढावा बैठक घेतली. यावेळी ते म्हणाले की, अभियानामध्ये जिल्हा अव्वल आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी कामासोबतच त्याच्या दर्जावरही लक्ष केंद्रित करावे. ज्यामुळे टंचाईग्रस्त गावे कायमस्वरूपी टंचाईच्या जोखडातून सुटतील. यावेळी त्यांनी गावनिहाय कामांचा आढावा घेऊन आवश्यक त्या सूचना केल्या.