लातूर : जलयुक्त चळवळीला लातूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, मदतीचा ओघही वाढत आहे. त्यामुळे ही चळवळ आता कायमस्वरुपी राहणार आहे. शासनाकडूनही सकारात्मक प्रतिसाद आणि लोकांचा सहभाग यामुळे भविष्यात लातूरचा पाणीप्रश्न कायमस्वरुपी सुटेल, असा विश्वास डॉ. अशोक कुकडे यांनी जलयुक्त लातूरच्या दुसऱ्या टप्प्यातील कामाच्या उद्घाटनप्रसंगी येथे व्यक्त केला. नागझरी बंधाऱ्यावर रविवारी दुसऱ्या टप्प्यातील कामाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते़ यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे, अॅड़ मनोहरराव गोमारे, अॅड़त्र्यंबकदास झंवर, बी़बी़ठोंबरे, मकरंद जाधव, प्राचार्य जोगेंद्रसिंह बिसेन, निलेश ठक्कर, अरुणा डंके, शिवदास मिटकरी, सुनील देशपांडे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रदीप सोलंकी, नागझरीचे सरपंच श्रीराम साळुंके, उपसरपंच परमेश्वर पवार आदींची उपस्थिती होती़ यावेळी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे म्हणाले, ‘जलयुक्त लातूर : सर्वांसाठी पाणी’ ही चळवळ हाती घेऊन लातूरकरांनी वेगळा इतिहास निर्माण केला आहे. शासनानेच प्रश्न सोडवावेत, असा समज आहे. लोकसहभागातूनही मोठे प्रश्न सुटू शकतात, लातूर जलयुक्त चळवळीच्या कामाने दाखवून दिले आहे. यावेळी सुनील कोचेटा, रवी जोशी, पंकज कुलकर्णी, प्रदीप सोलंकी, दिलीप माने, पांडुरंग आवाड, तुकाराम पाटील, सुधाकर गवळी, जीवन पवार आदींनी धनादेश दिले.सी़ए़ असोसिएशनकडून ११ लाख १ हजार १११, बिल्डर असो.कडून ११ लाख, कॅनरा बँक ११ लाख, प्रोफेशनल टिचर्स असोसिएशन १२ लाख २६ हजार २२२, प्रीती फाऊंडेशन पुणे ११ लाख ५१ हजार, प्लावूड असोसिएशन २ लाख ११ हजार, साईविहार हाऊसिंग सोसायटी ८१ हजार, सेवानिवृत्त शिक्षक विलास आराध्ये २५ हजार, सुधाकर गवळी २१ हजार, राजस्थानी महिला मंडळ ५१ हजार, जय श्रीराम योगा गु्रप २१ हजार, ज्ञानतीर्थ बहुउद्देशीय शिक्षण संस्था ५ हजार, राजस्थान विद्यालयातील १९९४ च्या बॅचकडून मदत देण्यात आली.
‘जलयुक्त’मुळे पाणीप्रश्न सुटणार
By admin | Updated: April 25, 2016 00:38 IST