शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
2
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट!
3
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
4
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
5
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
6
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
7
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
8
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
9
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
10
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
11
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
12
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
13
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
14
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
15
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
16
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
17
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
18
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
19
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
20
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल

जालना रोड, बीड बायपास रुंदीकरण प्रकल्प आॅक्सिजनवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 01:21 IST

नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाकडून (एनएचएआय) होणारा जालना रोड आणि बीड बायपास प्रस्तावित ७८९ कोटी रुपयांचा प्रकल्प आॅक्सिजनवर असून, त्याला मंजुरी मिळण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्प २०१८ ची वाट पाहावी लागणार आहे.

विकास राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाकडून (एनएचएआय) होणारा जालना रोड आणि बीड बायपास प्रस्तावित ७८९ कोटी रुपयांचा प्रकल्प आॅक्सिजनवर असून, त्याला मंजुरी मिळण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्प २०१८ ची वाट पाहावी लागणार आहे. दरम्यान सात महिन्यांपासून त्या प्रकल्पासह मराठवाड्यातील क्र. २११ या महामार्गाचे काम ठप्प पडल्यामुळे प्रकल्प संचालक यशवंत घोटकर यांची नांदेडला बदली करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.सोमवार, २३ आॅक्टोबर रोजी नागपूर विभागीय कार्यालयातून पदोन्नतीने येणारे व्ही. बी. गाडेकर हे त्या पदाची सूत्रे घेणार आहेत. यू. जे. चामरगोरे यांची मार्चमध्ये बदली झाल्यानंतर घोटकर यांची त्या पदावर वर्णी लागली. परंतु त्यांच्या कार्यकाळात जालना रोड, बीड बायपास रोड रुंदीकरणासह एनएच क्र.२११ च्या कामाला गती मिळाली नाही. बैठका आणि चर्चेमध्येच त्यांचा कार्यकाळ गेला. सात महिन्यांत दोन संचालक एनएचएआयला बदलावे लागले आहेत.दोन किंवा तीन टप्प्यांत हा प्रकल्प पूर्णत्वाकडे नेण्याबाबत दिल्ली मुख्यालय विचार करीत असल्याचे वृत्त आहे. कमी खर्चात हे प्रकल्प मार्गी लावण्याबाबत चिंतन सुरू झाले आहे. मुळात एनएचएआय शहरातील रस्ते करण्याबाबत नकारात्मक मोडमध्ये गेले आहेत.अहमदनगरमधील एलिव्हेटेड रोडचे काम ५ कि़मी.वरून दीड कि़मी.वर आणले आहे. तसेच हे काम औरंगाबाद विभागाकडून नाशिक विभागाकडे हॅण्डओव्हर केले आहे. यावरून लक्षात येते की, एनएचएआय शहरातील कामांमध्ये मोठ्या प्रमाणात काटछाट करण्याच्या मन:स्थितीत आहे. ७८९ कोटींतून प्रस्तावित असलेल्या जालना रोड, बीड बायपासमधील कामांची कपात करण्याचे संकेत आहेत. दोन वर्षांपासून जालना रोड, बीड बायपासच्या रुंदीकरणाबाबत वेगवेगळे आराखडे, घोषणा एनएचएआयने केल्या. परंतु सद्य:स्थितीत हे दोन्ही प्रकल्प रेंगाळले आहेत.अर्थसंकल्प २०१८ कडे लक्षकेंद्रीय अर्थसंकल्प फेबु्रवारी २०१८ मध्ये येईल. त्या अर्थसंकल्पामध्ये जालना रोड, बीड बायपास रुंदीकरणासाठी किमान पहिल्या नोडसाठी २०० कोटींची तरतूद, अर्थसंकल्प २०१९ मध्ये २०० कोटींची तरतूद केली तर या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात तरी होईल. हे सगळे करून घेण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. यावेळी अर्थसंकल्पामध्ये तरतूद झाली नाहीतर हे दोन्ही प्रकल्प रखडण्याची दाट शक्यता आहे. १४ महिन्यांपासून या प्रकल्पाच्या निविदा एनएचएआयच्या दिल्ली मुख्यालयात पडून आहेत.