शहरं
Join us  
Trending Stories
1
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
2
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
3
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
4
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
5
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
6
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
7
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
8
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
9
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
10
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
11
इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये १४ अणुशास्त्रज्ञ ठार, इराण अणुकार्यक्रम पुन्हा सुरू करणार
12
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
13
‘मुंबई १’ कार्डवर आता एसटीचे तिकीट! मेट्रो, मोनो, रेल्वेपाठोपाठ एसटीचा निर्णय
14
अग्रलेख: हिंदीचे ओझे कशाला? राजकारण करण्याच्या सवयीने घात झाला
15
प्रियकर खर्चापोटी एक लाख रुपये देणार; अखेर २५ आठवड्यांच्या गर्भपातास हायकोर्टाने दिली परवानगी 
16
Axiom Mission 4: भारताचा शुभांशू शुक्ला आज झेपावणार अंतराळात
17
Operation Sindhu: इराण, इस्रायलमधून आणखी १,१०० भारतीय मायदेशात, विमान कंपन्यांची मध्य-पूर्वेतील उड्डाणे थांबली
18
आरोग्यसेवेचे मोल शून्य; राज्यातील ३२ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांचा २ महिन्यांचा पगार थकला
19
एसीबीच्या अहवालामुळे  सिडको प्रशासन हादरले, कार्मिक विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह
20
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी

जालन्यात आमदार, माजी मंत्री येणार आमने-सामने

By admin | Updated: August 27, 2014 01:01 IST

संजय कुलकर्णी , जालना विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरूवात झाली आहे. जालना विधानसभा मतदार संघात शिवसेना व काँग्रेस या दोन पक्षांत निवडणुकीत सामना रंगणार असला

संजय कुलकर्णी , जालनाविधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरूवात झाली आहे. जालना विधानसभा मतदार संघात शिवसेना व काँग्रेस या दोन पक्षांत निवडणुकीत सामना रंगणार असला तरी बसपा, भारिप आणि मनसे उमेदवारांचाही त्यात महत्वाचा सहभाग राहिल, अशी चिन्हे आहेत. या मतदारसंघाचे विद्यमान आमदार कैलास गोरंट्याल व माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यात लढतीचे चित्र राहिल, अशी शक्यता आहे.हा मतदारसंघ मागील पंधरा वर्षांपूर्वी शिवसेना-भाजपा युतीचा बालेकिल्ला समजला जात होता. मात्र मागील निवडणुकीत काँग्रेसतर्फे कैलास गोरंट्याल विजयी झाले. त्यानंतर गेल्या अडीच वर्षापूर्वी जालना नगरपालिका व पंचायत समितीही काँग्रेस आघाडीच्या ताब्यात आली. तीन-चार महिन्यांपूर्वीच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या लाटेने जालना विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार रावसाहेब दानवेंना मताधिक्य मिळाले. वास्तविक गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार कल्याण काळे यांना मताधिक्य मिळाले होते. यावेळी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसतर्फे आ. गोरंट्याल यांनी जनतेसमोर आपल्या कार्याचा लेखाजोखा सादर करण्याची तयारी दर्शविली आहे. पक्षातून अन्य इच्छुकांची नावेही समोर येत आहेत. १९ आॅगस्ट रोजी काँग्रेसच्या राज्य निवड समितीसमोर आ. गोरंट्याल यांच्यासह माजी आ. शकुंतला शर्मा, डॉ. संजय लाखे पाटील, प्रा. सत्संग मुंढे यांनीही मुलाखती दिल्या. या सर्वांनी आपल्या कार्याचा आढावा पक्षश्रेष्ठींसमोर सादर केला. निवड समिती ठरवेल, त्याच नावावर उमेदवारीचे शिक्कामोर्तब होईल. तरीही गोरंट्याल यांची उमेदवारी सद्यस्थितीत पक्की मानली जात आहे. या मतदारसंघात काँग्रेसचा प्रतिस्पर्धी पक्ष म्हणून शिवसेनेकडे पाहिले जाते. मागील निवडणुकीत घनसावंगी मतदारसंघातून पालकमंत्री राजेश टोपेंना तुल्यबळ लढत दिलेले माजी मंत्री अर्जुन खोतकर पुन्हा आपल्या जुन्या मतदारसंघाकडे वळलेले आहेत. मोर्चा, धरणे, आंदोलनांच्या माध्यमातून काही दिवसांमध्ये खोतकर यांनी शक्तीप्रदर्शन दाखविण्याचा प्रयत्न केलेला आहे. शिवसेनेतून भास्कर अंबेकर, विष्णू पाचफुले हेही इच्छूक आहेत. शेवटी पक्षाचा निर्णयच अंतिम आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक रशीद पहेलवान यांनी बहुजन समाज पार्टीत प्रवेश केला. तेही बसपाकडून नशीब आजमावणार असल्याने निवडणुकीला चांगलाच रंग भरणार आहे. दुसरीकडे मनसेकडून रवी राऊत यांनीही उमेदवारीसाठी आपली मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर निकाळजे हेही पक्षाकडून इच्छूक आहेत. गोरंट्याल यांनी जायकवाडी पाणीपुरवठा योजनेच्या पूर्णत्वासाठी सत्ताधाऱ्यांसमोरच आपली ताकद पणाला लावली. शहरातील अनेक भागात तयार झालेले रस्ते, महिला व बाल रुग्णालयाच्या नूतन इमारत व अंतर्गत जलवाहिनीसाठी मिळवावयाचा निधी यासाठीही प्रयत्न केले. तर जायकवाडी पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव तत्कालीन शिवसेना नगराध्यक्ष भास्कर अंबेकर यांच्या कार्यकाळात तयार होऊन शासनाकडे सादर झाला. अर्जुन खोतकर यांनी न्यायालयात दाद मागितल्याने योजनेसाठीचा पहिला हप्ता मिळाला, अशा दावे-प्रतिदाव्यांनी गाजलेली जायकवाडी पाणीपुरवठा योजना आगामी काळात पुन्हा चर्चेत राहणार यात शंका नाही.