शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
6
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
7
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
8
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
9
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
10
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
11
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
12
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
13
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
14
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
15
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
16
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
17
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
18
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
19
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
20
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार

अपहरण प्रकरणी जालना एलसीबीने एकास उचलले

By admin | Updated: November 17, 2015 00:32 IST

बीड : व्यापाऱ्यास लुटमार करून त्याचे अपहरण व खंडणी उकळण्याचा कट रचणाऱ्या पाच आरोपीस ९ नोव्हेंबर जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले होते.

बीड : व्यापाऱ्यास लुटमार करून त्याचे अपहरण व खंडणी उकळण्याचा कट रचणाऱ्या पाच आरोपीस ९ नोव्हेंबर जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले होते. या पाच गुन्हेगारांच्या सहाव्या साथीदारास गुन्हे शाखेने बीड येथून सोमवारी अटक केली आहे.दरम्यान त्या पाचही आरोपींच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना सोमवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी दिली.जालना येथील नवीन मोढ्यातील आडत व्यापारी आशिष आनंद सेठिया यांच्या जवळील मोठी रक्कम लुटून त्यांचे अपहरण करण्याचा बेत बीड येथील पाच अट्टल गुन्हेगारांनी रचला होता. ते ९ नोव्हेंबर रोजी रात्री ७ वाजेच्या सुमारास नवीन मोढा ते भोकरदन नाका रस्त्यावर टाटासुमो वाहनात दबा धरून बसलेल्या या आरोपींना वरकड हॉस्पीटल समोरील मोकळ्या जागेत सापळा लावून जेरबंद करण्यात आले होते. त्यात अन्वर खान मिर्झा खान उर्फ गुजर (३२ रा. इंद्रप्रस्थ कॉलनी बीड), शेख वसीम शेख वजीर (२६ रा. ढगे कॉलनी,अशोकनगर बीड), सय्यद नासेर सय्यद महेबूब (२४ रा.बालेपीर भरतभूषण क्षीरसागर नगर,बीड), सय्यद अहमद सय्यद महेबुब (२५ रा. संजयनगर गॅस गोडावून समोर जालना), व शेख उबेद शेख बाबु (२५ बागल नाक्या जवळ बीड) या पाच जणांना समावेश होता. त्यांच्या ताब्यातून टाटासुमो, एक तलवार, एक चाकु, दोरी असे साहित्य जप्त करण्यात आले होते.याप्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करून आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १४ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. दरम्यान पोलिस कोठडीची मुदत संपल्याने पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आणखी दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली होती.त्याची मुदत संपल्याने या आरोपींना सोमवारी पून्हा न्यायालयात हजर केले असता त्याना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान याप्रकरणी बीड येथून आणखी एका आरोपीस अटक करण्यात आले आहे. अलिम अहेमद जलील अहेमद असे त्याचे नाव आहे. (प्रतिनिधी)