शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

जालना नगरीत अवतरली पंढरी...

By admin | Updated: July 10, 2014 01:04 IST

जालना : आषाढी एकादशीनिमित्त शहरवासियांचे दैवत समजले जाणाऱ्या आनंदी स्वामी महाराज यांची पालखी मिरवणूक बुधवारी काढण्यात आली.

जालना : आषाढी एकादशीनिमित्त शहरवासियांचे दैवत समजले जाणाऱ्या आनंदी स्वामी महाराज यांची पालखी मिरवणूक बुधवारी काढण्यात आली. या मिरवणुकीमुळे जुना जालना भाग ‘भज गोविंदम् भज गोपाल’ च्या घोषाने दुमदुमला होता. जालन्यात पंढरीच अवतरली होती. सकाळी ८ वाजता आनंदी स्वामी महाराज यांची पालखी मिरवणूक निघाली. मिरवणुकीसमोर औरंगाबाद येथील धर्मसंग्राम क्रीडा मंडळाने विशेष ढोल-ताशाची मोफत व्यवस्था केली होती. दादाराव उस्ताद व देवराव उस्ताद यांच्या आखाड्यातील मल्लांनी वेगवेगळी प्रात्यक्षिके सादर करून लोकांचे लक्ष वेधले. तुळजापूर येथील संस्कार भारती मंडळाचे पारंपरिक गोंधळ नृत्य हेही सर्वांचे आकर्षण ठरले. जय बजरंग व्यायाम शाळेच्या मल्लांनीही आपली प्रात्यक्षिके सादर केली. लाड गवळी समाजाच्या महिला भजनी मंडळाने विविध भजने सादर केली. तर आनंदीस्वामी भक्त मंडळाचे सेवेकरी टाळ-मृदंगाच्या गजरात ‘भज गोविंदम् भज गोपाल’ चा गजर करीत होते. पालखी ज्या मार्गावरून जात होती, तेथे सुवासिनींकडून ओवाळण्यात येत होते. महिला-पुरूष, युवक-युवती चौकाचौकात दर्शनासाठी प्रतीक्षा करीत होते. मिरवणुकीत सहभागी झालेल्या सेवेकऱ्यांसाठी तसेच उपस्थित भाविकांसाठी ठिकठिकाणी वैयक्तिकरित्या, विविध मंडळे, संस्था, संघटनांच्या वतीने मोफत चहा, पाणी, फराळाची व्यवस्था केली होती. ही पालखी शनिमंदिर, कचेरी रोड, गणपती गल्ली, शास्त्री मोहल्ला, मार्गे बाजार चौकी येथे आली. या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या वतीने परंपरेप्रमाणे मंदिराचे पुजारी रमेश महाराज ढोले यांच्यासह आखाडेप्रमुख व प्रतिष्ठित नागरिकांचे स्वागत करण्यात आले. मोरंडी मोहल्ला, कसबा, माळीपुरा, गांधी चमन, टाऊनहॉल मार्गे रात्री ९.३० वाजता परत मंदिरात पोहोचली. आनंदीस्वामी यात्रा महोत्सवानिमित्त शनिमंदिर ते गांधीचमन तसेच आनंदीस्वामी रोड परिसरात विविध स्टॉलवर आबालवृद्धांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. वाहतूक पोलिसांनी मिरवणुकीच्या मार्गावर दुचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहतूक बंद केली होती. (प्रतिनिधी)‘भज गोविंदम् भज गोपाल’ चा गजरया पालखी मिरवणुकीचे मुस्लिम समाजाच्या वतीने बाजार चौकी येथे स्वागत करण्यात आले. अतिरिक्त पोलिस अधीक्षक वसंत परदेशी, एकबाल पाशा, शाह आलमखान, शेख अख्तर, अय्यूबखान, पो.नि. अनिल विभूते, सतीश बदादे, विष्णूअप्पा सतकर, गणेश सुपारकर आदी उपस्थित होते.