शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

जालना आगाराचा कारभार विस्कळीत

By admin | Updated: May 22, 2015 00:31 IST

संजय कुलकर्णी , जालना जबाबदार अधिकाऱ्यांपैकी कुणाचेच नियंत्रण नसल्याने एस.टी. महामंडळाच्या जालना आगाराचा कार्यभार विस्कळीत झाल्याचा प्रकार उघडकीस आला

संजय कुलकर्णी , जालनाजबाबदार अधिकाऱ्यांपैकी कुणाचेच नियंत्रण नसल्याने एस.टी. महामंडळाच्या जालना आगाराचा कार्यभार विस्कळीत झाल्याचा प्रकार गुरूवारी ‘लोकमत’ ने केलेल्या स्टींग आॅपरेशनद्वारे उघडकीस आला. आगाराचा कार्यभार वाऱ्यावर सोडल्याने कुणाचा-कुणाशी ताळमेळ दिसून आला नाही. नियोजनाअभावी लांबपल्ल्याच्या काही बसगाड्या रद्द कराव्या लागल्या, तर काही गाड्या उशिराने धावल्या. त्यामुळे प्रवाशांची मात्र मोठी गैरसोय झाल्याचेही दिसून आले.जिल्ह्याचे ठिकाण असल्याने जालना आगारात ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. ग्रामीण भागातील अनेक प्रवाशी लांबपल्ल्याच्या प्रवासाकरीता या बसस्थानकावर येऊन आपल्या नियोजित ठिकाणी जातात. मात्र, जालना आगारात प्रमुख पदांवरील अधिकारी या - ना त्या कारणाने दीर्घ रजेवर असल्याने त्यापैकी बहुतांश जणांचा कारभार सध्या वाहकांच्या हाती आहे. गुरूवारी दुपारी २ वाजता स्थानकात पोहोचल्यानंतर या सर्व बाबी समोर आल्या.आगार व्यवस्थापक गेल्या दोन महिन्यांपासून आजारपणामुळे रजेवर असल्याने त्यांचा कार्यभार व्ही.एस. वाकोडे यांच्याकडे आहे. स्थानकप्रमुखांसह दोन्ही वाहतूक निरीक्षकही सध्या रजेवर आहेत. त्यामुळे नियंत्रण कक्ष, स्थानकप्रमुख कार्यालय, सेवा नोंदणी या विभागांचा कार्यभार काही वाहकांकडे आहे. काही लिपिक व वाहतूक नियंत्रकाच्या जागेवर वाहकच काम करताना आढळून आले.स्थानकातील वाहक-चालकांच्या आरामगृहातील अस्वच्छतेबद्दल विभाग नियंत्रक चेतना खिरवाडकर यांना विचारणा केली असता त्यांनी तेथे तातडीने स्वच्छता केली जाईल असे सांगितले. या अस्वच्छतेचा प्रकार सतत असतो, अशी माहिती दिल्यानंतर याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जातील, असे विभाग नियंत्रण खिरवाडकर यांनी सांगितले. आगारप्रमुख प्रभारी कार्यभार असलेले व्ही.एस. वाकोडे यांनी आगारातील सर्वच कारभार वाहकांकडे नाही, असे सांगून सध्या काही अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या घरीही लग्नसमारंभ असल्याने ते सुटीवर असल्याने ड्युटी देताना तारांबळ होत असल्याचे मान्य केले. स्वच्छतेचे काम ठेकेदाराकडे आहे. काम व्यवस्थित करण्याबाबत ठेकेदारास अनेकवेळा सूचना देण्यात आलेल्या असल्याचेही ते म्हणाले.आगारामध्ये मागील बाजूस एस.टी. पुरूष वााहक-चालकांसाठी आरामगृह आहे. मात्र या आरामगृहाच्या आवारापासून कचरा, घाणीच्या साम्राज्याला सुरूवात होते. प्रवेशद्वारासमोर कचरा, आतमध्ये गेल्यानंतर या कचऱ्यामध्येच कर्मचारी आराम करताना दिसून आले. स्वच्छतागृहांमध्येही कचरा दिसून आला. ४याबाबत कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता येथे साफसफाई होत नाही, असे उत्तर मिळाले. येथे पंख्यांची संख्याही कमी आहे. घाण, दुर्गंधीमध्येच कर्मचाऱ्यांना आराम करावा लागत असल्याचे दिसून आले. ४या आरामगृहासमोर झाडाखाली सिमेंट बाकावर बसून कर्मचारी जेवण करतात. मात्र या ठिकाणी देखील अस्वच्छता आहे. स्वच्छतेचे काम ठेकेदाराकडे दिलेले आहे. परंतु स्वच्छता कधीच होत नसल्याचे काही कर्मचाऱ्यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.