शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
3
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
4
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
5
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
6
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
7
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
8
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
9
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
10
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
11
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
12
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
13
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
14
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
15
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
16
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
17
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
18
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
19
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
20
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

जालना आगाराचा कारभार विस्कळीत

By admin | Updated: May 22, 2015 00:31 IST

संजय कुलकर्णी , जालना जबाबदार अधिकाऱ्यांपैकी कुणाचेच नियंत्रण नसल्याने एस.टी. महामंडळाच्या जालना आगाराचा कार्यभार विस्कळीत झाल्याचा प्रकार उघडकीस आला

संजय कुलकर्णी , जालनाजबाबदार अधिकाऱ्यांपैकी कुणाचेच नियंत्रण नसल्याने एस.टी. महामंडळाच्या जालना आगाराचा कार्यभार विस्कळीत झाल्याचा प्रकार गुरूवारी ‘लोकमत’ ने केलेल्या स्टींग आॅपरेशनद्वारे उघडकीस आला. आगाराचा कार्यभार वाऱ्यावर सोडल्याने कुणाचा-कुणाशी ताळमेळ दिसून आला नाही. नियोजनाअभावी लांबपल्ल्याच्या काही बसगाड्या रद्द कराव्या लागल्या, तर काही गाड्या उशिराने धावल्या. त्यामुळे प्रवाशांची मात्र मोठी गैरसोय झाल्याचेही दिसून आले.जिल्ह्याचे ठिकाण असल्याने जालना आगारात ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. ग्रामीण भागातील अनेक प्रवाशी लांबपल्ल्याच्या प्रवासाकरीता या बसस्थानकावर येऊन आपल्या नियोजित ठिकाणी जातात. मात्र, जालना आगारात प्रमुख पदांवरील अधिकारी या - ना त्या कारणाने दीर्घ रजेवर असल्याने त्यापैकी बहुतांश जणांचा कारभार सध्या वाहकांच्या हाती आहे. गुरूवारी दुपारी २ वाजता स्थानकात पोहोचल्यानंतर या सर्व बाबी समोर आल्या.आगार व्यवस्थापक गेल्या दोन महिन्यांपासून आजारपणामुळे रजेवर असल्याने त्यांचा कार्यभार व्ही.एस. वाकोडे यांच्याकडे आहे. स्थानकप्रमुखांसह दोन्ही वाहतूक निरीक्षकही सध्या रजेवर आहेत. त्यामुळे नियंत्रण कक्ष, स्थानकप्रमुख कार्यालय, सेवा नोंदणी या विभागांचा कार्यभार काही वाहकांकडे आहे. काही लिपिक व वाहतूक नियंत्रकाच्या जागेवर वाहकच काम करताना आढळून आले.स्थानकातील वाहक-चालकांच्या आरामगृहातील अस्वच्छतेबद्दल विभाग नियंत्रक चेतना खिरवाडकर यांना विचारणा केली असता त्यांनी तेथे तातडीने स्वच्छता केली जाईल असे सांगितले. या अस्वच्छतेचा प्रकार सतत असतो, अशी माहिती दिल्यानंतर याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जातील, असे विभाग नियंत्रण खिरवाडकर यांनी सांगितले. आगारप्रमुख प्रभारी कार्यभार असलेले व्ही.एस. वाकोडे यांनी आगारातील सर्वच कारभार वाहकांकडे नाही, असे सांगून सध्या काही अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या घरीही लग्नसमारंभ असल्याने ते सुटीवर असल्याने ड्युटी देताना तारांबळ होत असल्याचे मान्य केले. स्वच्छतेचे काम ठेकेदाराकडे आहे. काम व्यवस्थित करण्याबाबत ठेकेदारास अनेकवेळा सूचना देण्यात आलेल्या असल्याचेही ते म्हणाले.आगारामध्ये मागील बाजूस एस.टी. पुरूष वााहक-चालकांसाठी आरामगृह आहे. मात्र या आरामगृहाच्या आवारापासून कचरा, घाणीच्या साम्राज्याला सुरूवात होते. प्रवेशद्वारासमोर कचरा, आतमध्ये गेल्यानंतर या कचऱ्यामध्येच कर्मचारी आराम करताना दिसून आले. स्वच्छतागृहांमध्येही कचरा दिसून आला. ४याबाबत कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता येथे साफसफाई होत नाही, असे उत्तर मिळाले. येथे पंख्यांची संख्याही कमी आहे. घाण, दुर्गंधीमध्येच कर्मचाऱ्यांना आराम करावा लागत असल्याचे दिसून आले. ४या आरामगृहासमोर झाडाखाली सिमेंट बाकावर बसून कर्मचारी जेवण करतात. मात्र या ठिकाणी देखील अस्वच्छता आहे. स्वच्छतेचे काम ठेकेदाराकडे दिलेले आहे. परंतु स्वच्छता कधीच होत नसल्याचे काही कर्मचाऱ्यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.