शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

जलयुक्त शिवार अभियान शेतकऱ्यांसाठी वरदान

By admin | Updated: June 22, 2015 00:18 IST

फकिरा देशमुख , भोकरदन भोकरदन तालुक्यात राज्यशासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेले जलयुक्त शिवार योजना ही शेतकऱ्यांसाठी वरदान ठरली आहे. पहिल्याच पावसात सिंमेट बंधाऱ्यात साठविलेल्या पाण्यामुळे

फकिरा देशमुख , भोकरदनभोकरदन तालुक्यात राज्यशासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेले जलयुक्त शिवार योजना ही शेतकऱ्यांसाठी वरदान ठरली आहे. पहिल्याच पावसात सिंमेट बंधाऱ्यात साठविलेल्या पाण्यामुळे १ हजार ५०० हेक्टर क्षेत्र सिंंचनाखाली येणार आहे़भोकरदन तालुका तसा कोरडवाहू म्हणून प्रसिध्द आहे. या तालुक्यातून पूर्णा, केळणा व जुई या नद्या वाहतात. मात्र यापैकी केळणा व पूर्णा नदीवर सिल्लोड व कन्नड तालुक्यात मध्यम प्रकल्प बांधण्यात आले असल्याने या नद्यावर भोकरदन तालुक्यात मध्यम प्रकल्प होण्याची शक्यता नाही तरी सुध्दा विदर्भातील देऊळगाव मही येथे उभारण्यात आलेल्या खडक पूर्णा प्रकल्पामुळे जाफ्राबाद तालुक्यातील सिंचन क्षेत्रवाढीला मोठी मदत झाली आहे भोकरदन तालुक्यात लघु सिंचन जलसंधारण उपविभाग, तालुका कृषी कार्यालय व जिल्हापरिषदेच्या सिंचन विभागा मार्फत जलयुक्त शिवार योजनेची कामे सुरू आहे. या सर्व कामासाठी सुमारे १० कोटी रुपयापर्यतच्या कामाना मंजुरी मिळाली आहे.यामुळे तालुक्यातील जलयुक्त शिवार योजनेमध्ये निवड करण्यात आलेल्या भोकरदन, पेरजापूर, सुभानपूर, गोकुळ, फत्तेपुर, पल्हादपुर, वाडी, ईब्राहिमपूर, गारखेडा, बंरजळा लोखंडे, कोदोली, टाकळी भोकरदन, सावखेडा, राजूर, पळसखेडा पिंपळे, आन्वा, जळगाव सपकाळ, हिसोडा बु, पिंपळगाव रेणुकाई, धावडा, विझोरा, पोखरी, मेहेगाव, तळणी, रेलगाव, आव्हाना, लिगेंवाडी, सावंगी आवघडराव, आव्हानावाडी, जोमाळा, तांदूळवाडी या ३४ गावामध्ये भविष्यात पाणी टंचाई भाषणार नाही अशी स्थिती होणार आहे़तालुक्यात लघु सिंचन जलसंधारण विभागाच्या वतीने ५० सिमेन्ट बंधाऱ्यांचे कामे सुरू आहे. त्या पैकी २७ कामे पूर्ण करण्यात आली आहेत. तर कृषी विभागाकडून सुध्दा नाला माती बांध, चर खोदकाम, नाला खोलीकरण व सरळीकरणची कामे हाती घेण्यात आली आहेत. आतापर्यन्त ९३४ कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यापैकी ६१३ कामे पूर्ण करण्यात आली आहेत. तर ३२१ कामे प्रगती पथावर आहेत. या कामांवर २ कोटी ६९ लाख ७८ हजार रूपये खर्च करण्यात आले आहेत.जलयुक्त शिवार योजना ही शेतकऱ्यांसाठी मोठी वरदान ठरणारी योजना शासनाने सुरू केली आहे. कारण पावसाचा एक एक थेंब आपल्या परिसरात जिरविण्यासाठी सिमेन्ट बाध, नाला खोलीकरण, चारी खोदकाम, शेतीमाती बांध हे एक उपयुक्त साधन आहे. कारण जर एखादा प्रकल्प उभारण्यासाठी आजच्या काळात शेतकरी जमीन देणे शक्य नाही, त्यामुळे प्रत्येक शेताच्या बाजूने वाहनाऱ्या नाल्याच्या माध्यमातून जर पाणी आडवून सिंचन क्षेत्र वाढविता आले तर त्याचा मोठा फायदा हा शेतकऱ्यांना होणार आहे. मात्र त्यासाठी शेतकऱ्यांनी सुध्दा सिमेंट बांध होत असताना शेताच्या बांधावर माती टाकणे आवश्यक आहे. पाणी आडले पाहिजे, मात्र दुसऱ्याच्या जमिनीत बांध होऊन त्याचा फायदा आपल्याला व्हावा ही मानसिकता बदलण्याची आवश्यकता आहे़