शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवार अभियान शेतकऱ्यांसाठी वरदान

By admin | Updated: June 22, 2015 00:18 IST

फकिरा देशमुख , भोकरदन भोकरदन तालुक्यात राज्यशासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेले जलयुक्त शिवार योजना ही शेतकऱ्यांसाठी वरदान ठरली आहे. पहिल्याच पावसात सिंमेट बंधाऱ्यात साठविलेल्या पाण्यामुळे

फकिरा देशमुख , भोकरदनभोकरदन तालुक्यात राज्यशासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेले जलयुक्त शिवार योजना ही शेतकऱ्यांसाठी वरदान ठरली आहे. पहिल्याच पावसात सिंमेट बंधाऱ्यात साठविलेल्या पाण्यामुळे १ हजार ५०० हेक्टर क्षेत्र सिंंचनाखाली येणार आहे़भोकरदन तालुका तसा कोरडवाहू म्हणून प्रसिध्द आहे. या तालुक्यातून पूर्णा, केळणा व जुई या नद्या वाहतात. मात्र यापैकी केळणा व पूर्णा नदीवर सिल्लोड व कन्नड तालुक्यात मध्यम प्रकल्प बांधण्यात आले असल्याने या नद्यावर भोकरदन तालुक्यात मध्यम प्रकल्प होण्याची शक्यता नाही तरी सुध्दा विदर्भातील देऊळगाव मही येथे उभारण्यात आलेल्या खडक पूर्णा प्रकल्पामुळे जाफ्राबाद तालुक्यातील सिंचन क्षेत्रवाढीला मोठी मदत झाली आहे भोकरदन तालुक्यात लघु सिंचन जलसंधारण उपविभाग, तालुका कृषी कार्यालय व जिल्हापरिषदेच्या सिंचन विभागा मार्फत जलयुक्त शिवार योजनेची कामे सुरू आहे. या सर्व कामासाठी सुमारे १० कोटी रुपयापर्यतच्या कामाना मंजुरी मिळाली आहे.यामुळे तालुक्यातील जलयुक्त शिवार योजनेमध्ये निवड करण्यात आलेल्या भोकरदन, पेरजापूर, सुभानपूर, गोकुळ, फत्तेपुर, पल्हादपुर, वाडी, ईब्राहिमपूर, गारखेडा, बंरजळा लोखंडे, कोदोली, टाकळी भोकरदन, सावखेडा, राजूर, पळसखेडा पिंपळे, आन्वा, जळगाव सपकाळ, हिसोडा बु, पिंपळगाव रेणुकाई, धावडा, विझोरा, पोखरी, मेहेगाव, तळणी, रेलगाव, आव्हाना, लिगेंवाडी, सावंगी आवघडराव, आव्हानावाडी, जोमाळा, तांदूळवाडी या ३४ गावामध्ये भविष्यात पाणी टंचाई भाषणार नाही अशी स्थिती होणार आहे़तालुक्यात लघु सिंचन जलसंधारण विभागाच्या वतीने ५० सिमेन्ट बंधाऱ्यांचे कामे सुरू आहे. त्या पैकी २७ कामे पूर्ण करण्यात आली आहेत. तर कृषी विभागाकडून सुध्दा नाला माती बांध, चर खोदकाम, नाला खोलीकरण व सरळीकरणची कामे हाती घेण्यात आली आहेत. आतापर्यन्त ९३४ कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यापैकी ६१३ कामे पूर्ण करण्यात आली आहेत. तर ३२१ कामे प्रगती पथावर आहेत. या कामांवर २ कोटी ६९ लाख ७८ हजार रूपये खर्च करण्यात आले आहेत.जलयुक्त शिवार योजना ही शेतकऱ्यांसाठी मोठी वरदान ठरणारी योजना शासनाने सुरू केली आहे. कारण पावसाचा एक एक थेंब आपल्या परिसरात जिरविण्यासाठी सिमेन्ट बाध, नाला खोलीकरण, चारी खोदकाम, शेतीमाती बांध हे एक उपयुक्त साधन आहे. कारण जर एखादा प्रकल्प उभारण्यासाठी आजच्या काळात शेतकरी जमीन देणे शक्य नाही, त्यामुळे प्रत्येक शेताच्या बाजूने वाहनाऱ्या नाल्याच्या माध्यमातून जर पाणी आडवून सिंचन क्षेत्र वाढविता आले तर त्याचा मोठा फायदा हा शेतकऱ्यांना होणार आहे. मात्र त्यासाठी शेतकऱ्यांनी सुध्दा सिमेंट बांध होत असताना शेताच्या बांधावर माती टाकणे आवश्यक आहे. पाणी आडले पाहिजे, मात्र दुसऱ्याच्या जमिनीत बांध होऊन त्याचा फायदा आपल्याला व्हावा ही मानसिकता बदलण्याची आवश्यकता आहे़