शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
4
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
5
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
6
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
7
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
8
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
9
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
10
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
11
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
12
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
13
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
14
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
15
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
16
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
17
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
18
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
19
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
20
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?

जालन्याचे पाणी पेटले;

By admin | Updated: December 22, 2014 00:58 IST

जालना : जायकवाडी-जालना योजनेतून अंबडला पाणी देण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय चुकीचा असल्याचा आरोप करून माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी याप्रकरणी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे

जालना : जायकवाडी-जालना योजनेतून अंबडला पाणी देण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय चुकीचा असल्याचा आरोप करून माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी याप्रकरणी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, शासनाने याप्रकरणी विभागीय आयुक्तांना कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. पालिकेची बाजू मांडून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कारभारात हस्तक्षेप करणे बेकादेशीर असल्याचे पटवून देणार आहोत, असे आ. कैलास गोरंट्याल यांनी सांगितले. जायकवाडी योजनेतून पाणी देण्यापूर्वी जालना नगर पालिकेची भूमिका विचारात घेणे गरजेचे आहे. स्वायत्त संस्थेच्या कारभारात थेट हस्तक्षेप करताना नगरपालिकेला विश्वासात घेणे गरजेचे आहे. हा बेकायदेशीर निर्णय असून स्थानिक परिस्थितीचा विचार करण्यात आला नाही, असेही गोरंट्याल म्हणाले.गेली ३० वर्ष अंबडला जालन्याने पाणी दिले. शहागड योजनेतून निम्मे पाणी उचलून एकही रूपया खर्च केला नाही. ही योजना अतिशय अडचणी ठरली. त्यामुळे आम्ही सर्वच कायदेशीर बाबी पूर्ण करून जायकवाडीहून पाणी घेतले. त्यात इतर कोणाचाही अधिकार नाही.पाणी आणण्याच्या आंदोलनात ज्यांचे काहीच योगदान नाही. अशी मंडळी फुकटचे पाणी घेण्यासाठी पुढाकार घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही गोरंट्याल यांनी केला. जालनेकरांची अडचण सोडविताना आलेल्या अडचणींचा उल्लेखही माजी आ. गोरंट्याल यांनी केला. यावेळी नगराध्यक्षा पार्वताबाई रत्नपारखे, सभापती महावीर ढक्का, काँगे्रसचे शहराध्यक्ष अ. हाफीज, डेव्हीड घुमारे, अरूणराव मगरे, शेख माजेदखान, वाजेदखान, ईसाखान पठाण, रहिम तांबोळी, पिंटू रत्नपारखे, महेंद्र अकोले, रवींद्र अकोलकर, अ‍ॅड. राहूल हिवराळे, संजय देठे, विनोद यादव, संतोष माधोले आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)४मंगळवारी मामा चौकात धरणे आंदोलन करून पाणी देण्याचा बेकायदेशीर आदेश फेटाळून लावण्याची मागणी होईल. या योजनेचा खर्च अवाढव्य आहे. पूर्वीच्या योजनेसाठी संपूर्ण खर्च जालना पालिकेला सहन करावा लागला. त्याची पुनरावृत्ती आता होणार नाही. त्यासाठी मंत्रालयात ठरल्यानुसारच पूर्तता करावी लागेल, असे गोरंट्याल यांनी सांगितले.