शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
4
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
5
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
6
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
7
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
8
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
9
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
10
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
11
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
12
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
13
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
14
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
15
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
16
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
17
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
18
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
19
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
20
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ

जिल्हा पाणंदमुक्तीच्या उंबरठ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 00:26 IST

जिल्ह्यात स्वच्छता अभियानाचे ९९ टक्के काम पूर्ण झाले आहे.

बाबासाहेब म्हस्के ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : स्वच्छ भारत अभियानांतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागात वैयक्तिक स्वच्छतागृह बांधण्याचा कार्यक्रम मिशन मोडवर राबविण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ७७६ पैकी ७७६ गावांमध्ये स्वच्छतागृह बांधण्याचे काम पूर्ण झाले असून, आॅनलाइन फोटो अपलोडिंगचे काम ६५ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. जिल्ह्यात स्वच्छता अभियानाचे ९९ टक्के काम पूर्ण झाले आहे.स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत जिल्ह्यात २०१२ च्या पायाभूत सर्वेक्षणानुसार दोन लाख ६६ हजार ९५२ कुटुंबांपैकी एक लाख ८० हजार ८५ कुटुंबांकडे वैयक्तिक शौचालय नसल्याचे समोर आले. त्यामुळे शौचायले बांधण्याचे हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषदेची संपूर्ण यंत्रणा गत काही महिन्यांपासून ग्र्रामीण भागात काम करत आहे. मुख्यकार्यकारी अधिकारी दीपक चौधरी यांच्यासह जिल्हा परिषदेतील वर्ग एक, वर्ग दोन, वर्ग तीनच्या अधिकाºयांना तालुकानिहाय जबाबदाºयांचे वाटप करण्यात आले. आवश्यक तिथे ग्रामपंचायती दत्तक देऊन अधिकाºयांकडून स्वच्छतागृहांचे बांधकाम पूर्ण करून घेण्यात आले. स्वच्छतागृह बांधकामाच्या प्रगतीचा दररोज राज्य, विभागस्तरावरून आढावा घेण्यात आला. तसेच स्वच्छतागृहांचे बांधकाम व वापराबाबत जनजागृती करण्यासाठी गावनिहाय ग्रामसभा घेणे, गृह भेटी देणे, स्वच्छतागृहांचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्याच्या वापर करावयास सांगणे, गावातील शाळा, अंगणवाड्या येथे स्वच्छतागृहांचे बांधकाम करणे, खराब शौचालयांची दुरुस्ती ही कामे वरिष्ठ अधिकाºयांनी अनेकदा गावात मुक्कामी थांबून युद्ध पातळीवर पूर्ण करून घेतली. त्यामुळे जिल्ह्यातील दोन लाख चाळीस हजारांपेक्षा अधिक कुटुंबांनी वैयक्तिक शौचालये बांधली आहेत. परतूर, जाफराबाद, मंठा आणि बदनापूर तालुका संपूर्ण पाणंदमुक्त झाली असून, आॅनलाइन फोटो अपलोडिंगचे कामही पूर्ण झाले आहे. तर भोकरदन, अंबड, घनसावंगी, जालना या तालुक्यांमधील स्वच्छतागृह बांधकामचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. या तालुक्यात पूर्ण झालेल्या स्वच्छतागृहांचे आॅनलाइन फोटा अ‍ॅलोडिंगचे कामे अंतीम टप्प्यात आहे.पुढील दोन दिवसात हे काम पूर्ण होईल, असे पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी पी.पी. कोकणी यांनी सांगितले. त्यामुळे येत्या दोन आॅक्टोबरला महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त होणाºया विशेष कार्यक्रमात जिल्हा १०० टक्के पाणंदमुक्त घोषित होण्याची शक्यता आहे.