शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वल निकम आता यापुढे संतोष देशमुख प्रकरणाची केस लढणार नाहीत? पण कारण काय? चर्चांना उधाण
2
६२ वर्षांच्या सेवेनंतर मिग-२१ लढाऊ विमान निरोप घेणार; १९६५ च्या युद्धात पाकिस्तानला टक्कर दिलेली
3
"राजीनामा तर द्यावाच लागेल..."; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा नवा व्हिडिओ आला समोर
4
“२५ वर्षे विधानसभेत, राजीनामा देण्यासारखे घडले काय?”; माणिकराव कोकाटे विरोधकांवर बरसले
5
“यालाही हनी ट्रॅप म्हणायचे का?”; फोटोला फोटोने उत्तर, ठाकरे गटाच्या आरोपावर भाजपाचा पलटवार
6
सोने, चांदी, बिटकॉइन स्वस्त होणार? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा दावा; वॉरेन बफेही 'त्या' क्षणाची वाट पाहतायेत?
7
एअर इंडियाच्या बोईंग जेटच्या फ्युएल कंट्रोल स्विचची तपासणी पूर्ण; समोर आली महत्त्वाची माहिती
8
Video - स्टंटगिरी! हिरो बनण्याच्या नादात मर्सिडीज थेट समुद्रात नेली, दलदलीत अडकली अन्..
9
अकोला: शेतातून घरी परत असतानाच काळाची झडप, पित्यासह मुलगा पुरात गेला वाहून; मुलाचा मृतदेह सापडला
10
"राज्याला भिकारी म्हणून त्यांनी कळस गाठलाय"; कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांना विनंती
11
घटस्फोटीत महिलेशी फेसबुकवर मैत्री, भेटायला बोलावून बलात्कार, अंधेरीतील घटना!
12
"आता हे अचानक 'हशणार, बशणार' हे कुठून आलं?", अभिनेत्रीचा 'पुणे'करांना सवाल
13
Shravan 2025: श्रावणात 'या' राशींवर होणार महादेवाची कृपा; बरसणार सुखाच्या श्रावणसरी!
14
'सभागृहाचं कामकाज संपलं होतं, हे विधान धडधडीत खोटं'; रोहित पवारांनी कोकाटेंचे आणखी दोन व्हिडीओ केले पोस्ट
15
Deep Amavasya 2025: 'या' सोप्या टिप्स कामी येतील, तेलातुपाचे दिवे लख्ख उजळतील!
16
'मी बोलेन तेच...'; राज्यसभेतील 'ते' विधान आणि धनखड यांच्या बैठकीला दांडी, राजीनाम्यानंतर नड्डांनी मौन सोडलं
17
सचिनजींना भेदता आलं नव्हतं 'महाभारत'चं चक्रव्यूह, 'कोण होणार करोडपती'मध्ये दिलेलं चुकीचं उत्तर, पाहा व्हिडीओ
18
कुठे नेऊन ठेवलाय...! डोक्याला फेटा, गळ्यात हार अन् ढोलताशांचा गजर...; विधानभवनात 'राडा' करणाऱ्यांचं जंगी स्वागत
19
मुख्यमंत्री नितीश कुमारांना भारताचे उपराष्ट्रपती बनवा; भाजप आमदाराची मागणी
20
"उपराष्ट्रपतींसह अनेक भूमिकांमध्ये त्यांना..."; जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यावर PM मोदींची प्रतिक्रिया

जिल्हा पाणंदमुक्तीच्या उंबरठ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 00:26 IST

जिल्ह्यात स्वच्छता अभियानाचे ९९ टक्के काम पूर्ण झाले आहे.

बाबासाहेब म्हस्के ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : स्वच्छ भारत अभियानांतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागात वैयक्तिक स्वच्छतागृह बांधण्याचा कार्यक्रम मिशन मोडवर राबविण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ७७६ पैकी ७७६ गावांमध्ये स्वच्छतागृह बांधण्याचे काम पूर्ण झाले असून, आॅनलाइन फोटो अपलोडिंगचे काम ६५ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. जिल्ह्यात स्वच्छता अभियानाचे ९९ टक्के काम पूर्ण झाले आहे.स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत जिल्ह्यात २०१२ च्या पायाभूत सर्वेक्षणानुसार दोन लाख ६६ हजार ९५२ कुटुंबांपैकी एक लाख ८० हजार ८५ कुटुंबांकडे वैयक्तिक शौचालय नसल्याचे समोर आले. त्यामुळे शौचायले बांधण्याचे हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषदेची संपूर्ण यंत्रणा गत काही महिन्यांपासून ग्र्रामीण भागात काम करत आहे. मुख्यकार्यकारी अधिकारी दीपक चौधरी यांच्यासह जिल्हा परिषदेतील वर्ग एक, वर्ग दोन, वर्ग तीनच्या अधिकाºयांना तालुकानिहाय जबाबदाºयांचे वाटप करण्यात आले. आवश्यक तिथे ग्रामपंचायती दत्तक देऊन अधिकाºयांकडून स्वच्छतागृहांचे बांधकाम पूर्ण करून घेण्यात आले. स्वच्छतागृह बांधकामाच्या प्रगतीचा दररोज राज्य, विभागस्तरावरून आढावा घेण्यात आला. तसेच स्वच्छतागृहांचे बांधकाम व वापराबाबत जनजागृती करण्यासाठी गावनिहाय ग्रामसभा घेणे, गृह भेटी देणे, स्वच्छतागृहांचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्याच्या वापर करावयास सांगणे, गावातील शाळा, अंगणवाड्या येथे स्वच्छतागृहांचे बांधकाम करणे, खराब शौचालयांची दुरुस्ती ही कामे वरिष्ठ अधिकाºयांनी अनेकदा गावात मुक्कामी थांबून युद्ध पातळीवर पूर्ण करून घेतली. त्यामुळे जिल्ह्यातील दोन लाख चाळीस हजारांपेक्षा अधिक कुटुंबांनी वैयक्तिक शौचालये बांधली आहेत. परतूर, जाफराबाद, मंठा आणि बदनापूर तालुका संपूर्ण पाणंदमुक्त झाली असून, आॅनलाइन फोटो अपलोडिंगचे कामही पूर्ण झाले आहे. तर भोकरदन, अंबड, घनसावंगी, जालना या तालुक्यांमधील स्वच्छतागृह बांधकामचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. या तालुक्यात पूर्ण झालेल्या स्वच्छतागृहांचे आॅनलाइन फोटा अ‍ॅलोडिंगचे कामे अंतीम टप्प्यात आहे.पुढील दोन दिवसात हे काम पूर्ण होईल, असे पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी पी.पी. कोकणी यांनी सांगितले. त्यामुळे येत्या दोन आॅक्टोबरला महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त होणाºया विशेष कार्यक्रमात जिल्हा १०० टक्के पाणंदमुक्त घोषित होण्याची शक्यता आहे.