शहरं
Join us  
Trending Stories
1
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
2
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
3
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
4
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
6
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
7
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
8
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
9
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
10
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
11
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
12
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
13
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
14
भारताने तुर्कस्तानला धडा शिकवला! चॉकलेट, फळं, कपड्यांपासून ते पर्यटन; 'या' गोष्टी झाल्या बॉयकॉट
15
"आत्महत्या करण्यापूर्वी तिने सूरजला फोन करुन.."; जिया खानच्या मृत्यूनंतर १२ वर्षांनी झरीना वहाब यांचा मोठा खुलासा
16
भारत-पाक संघर्षात ड्रॅगनची खेळी, खरा विजय चीनचा झाल्याचा दावा; करणार तगडी कमाई, पण कशी?
17
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
18
बॉलिवूडकर गप्प, पण सई ताम्हणकरने थेट घेतलं पाकिस्तानचं नाव; म्हणाली, "ज्यांना सरळ भाषा..."
19
'तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही...', भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!
20
'अण्वस्त्रांचा मारा करू, असा इशारा पाकने दिला नव्हता; लढाई पारंपरिक पद्धतीनेच'

जि.प.त पुन्हा रिक्त पदांचा डोंगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 00:22 IST

हिंगोली : जिल्हा परिषद व ग्रामीण विकास यंत्रणेत पुन्हा रिक्त पदांचा डोंगर निर्माण झाला आहे. मुख्य पदांवरच अधिकारी नसल्याने नियंत्रण सैल होत असून अधिकाºयांचीच एकूण ७४ पदे रिक्त असून कर्मचाºयांसह हा आकडा पाचशेच्या घरात जातो.

हिंगोली : जिल्हा परिषद व ग्रामीण विकास यंत्रणेत पुन्हा रिक्त पदांचा डोंगर निर्माण झाला आहे. मुख्य पदांवरच अधिकारी नसल्याने नियंत्रण सैल होत असून अधिकाºयांचीच एकूण ७४ पदे रिक्त असून कर्मचाºयांसह हा आकडा पाचशेच्या घरात जातो.हिंगोली जिल्हा परिषदेत सध्या प्रमुख पदावरच अधिकारी नाहीत. ज्या हागणदारीमुक्तीसाठी शासन रेटा लावत आहे त्या विभागालाच उपमुख्य कार्यकारी अधिकारी अजून आला नाही. पाणीपुरवठ्याचे कार्यकारी अभियंता पद जणू व्यपगतच झाल्यात जमा आहे. येथे उपअभियंता, वरिष्ठ, कनिष्ठ भूवैज्ञानिक, यांत्रिकी उपअभियंता अशी सात पदे रिक्त आहेत. आता बांधकामही त्याच मार्गाला लागले आहे. कार्यकारी अभियंता तर नाहीच. उपअभियंत्यांचाही जिल्हाभरात पत्ता नाही. लघुसिंचन कार्यकारी अभियंत्याची बदली तर झाली. मात्र ती रोखून धरली आहे. या विभागाला उपअभियंता नाही. उपविभागाचीही तीच गत आहे. समाजकल्याण अधिकारी पद प्रभारावर चालते. जिल्हा आरोग्य अधिकारी एसीबीच्या प्रकरणामुळे गायब आहेत. अतिरिक्त, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी ही पदे रिक्त आहेत. १५ वैद्यकीय अधिकाºयांची पदे रिक्त आहेत. २ तालुका आरोग्य अधिकारी, प्रशासन अधिकारी, गट बची ३ वैद्यकीय अधिकारी पदे रिक्त आहेत. लेखा विभागात उपमुख्य लेखा व वित्त अधिकारीही नाही. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेला प्रकल्प संचालक नाही. सहायक प्रकल्प संचालकांची पदेही रिक्तच आहेत. याशिवाय महिला व बालविकास अधिकारी पदही आता रिक्त झाले. तेथे कोणी आले नाही. इतर तीन बालविकास प्रकल्पालाही अधिकारी नाहीत. पशुसंवर्धन विभागात पशुधन विकास अधिकाºयांची ४ पदे रिक्त आहेत. कृषी विभागात सामान्य कृषी अधिकारी व मोहीम अधिकारी ही पदे रिक्त आहेत. शिक्षण विभागात उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, गट ब मुख्याध्यापक १६ अशी १९ पदे रिक्त आहेत.जिल्हा परिषदेत पदभारावरच अनेक विभाग सुरू असल्याने कारभारात अडचणी येत आहेत. नवीन पदाधिकारी आल्यानंतर येथे अचानकच हा रिक्त पदांचा भार वाढला. ही पदे भरण्यासाठी रेटा लावण्यातही ही मंडळी अपुरी पडत आहे. त्यामुळे प्रशासकीय डोलारा कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. जि.प.ला लागलेली रिक्त पदांची लागण पंचायत राज समितीच्या शिफारशींनंतर दूर होईल, असे वाटत होते. मात्र चार पदे भरल्यानंतर या समितीलाही मंत्रालयात कोणी थारा दिला नसल्याचे दिसत आहे. कारण वर्ग १ ची पदेही रिक्त असण्याचे प्रमाण मोठे आहे. विशेष म्हणजे येथून बदलीवर जाणाºया अधिकाºयाला नवीन अधिकारी आल्याशिवाय सोडू नये, असा शासन दंडक आहे. मात्र हिंगोली जिल्ह्यात राजकीय दबावातून म्हणा की, अधिकाºयांच्या उदासीनतेतून तो पाळला जात नाही. नंतर मात्र रिक्त पदे असतील तर कामे कशी करायची, अशी ओरड होते. या प्रकाराबाबत कोण आवाज उठवेल, हा प्रश्नच आहे.