शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात बचत गटांची चळवळ थंडावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 00:30 IST

नांदेड : मागील दीड वर्षापासून गट समन्वयकांच्या अनेक जागा रिक्त असल्याने ग्रामीण भागातील महिला बचतगटांची चळवळ थंडावली आहे़ आर्थिक पुरवठा करणाºया बँकांना बचत गटांच्या उन्नतीचे काहीच घेणे- देणे नसल्यामुळे अधिक कमकुवत झालेले बचत गट आता समन्वय नसल्याने वाºयावर आहेत़

भारत दाढेल ।लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : मागील दीड वर्षापासून गट समन्वयकांच्या अनेक जागा रिक्त असल्याने ग्रामीण भागातील महिला बचतगटांची चळवळ थंडावली आहे़ आर्थिक पुरवठा करणाºया बँकांना बचत गटांच्या उन्नतीचे काहीच घेणे- देणे नसल्यामुळे अधिक कमकुवत झालेले बचत गट आता समन्वय नसल्याने वाºयावर आहेत़जिल्ह्यात गट समन्वयकांच्या १३ जागा रिक्त आहेत़ ३३ पैकी १९ जागेवर हे गट समन्वयक कार्यरत आहेत़ तसेच समुह संसाधन व्यक्तीच्या नियुक्त्याही करण्यात आल्या नाहीत़ प्रत्येक दहा गटासाठी एक समूह संसाधन व्यक्ती या प्रमाणे निवड होणे आवश्यक आहे़ गट समन्वयक व समूह संसाधन व्यक्ती नसल्याने या गटांना मार्गदर्शन मिळत नसल्याचे चित्र आहे़जिल्ह्यात १९८० साली बचत गटांसाठी योजना सुरू झाली तेव्हापासून आजपर्यंत १९ हजार ६०० बचत गट स्थापन झाले आहेत़ त्यामुळे मोठ्या प्रमाणावर महिलांच्या सक्षमीकरणाची संधी आहे़ जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी व गटसमन्वयक यांनी बँक मेळाव्याचे आयोजन करणे, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कर्ज प्रकरणे प्रलंबित आहेत, अशा बँक शाखामध्ये बँक मेळावे घेणे आवश्यक आहे़दारिद्र्य रेषेखालील जीवन जगणाºया कुटुंबांच्या आर्थिक उन्नतीसाठी बचत गटांचे माध्यम आधारभूत ठरले असले तरी सध्या अनेक बचत गट मोडकळीस आले आहेत़ जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातंर्गत बचत गटांची चळवळ जोमाने सुरू होती़ परंतु प्रशासकीय यंत्रणा व बँकेच्या असहकार्यामुळे बचत गटांचा आर्थिक विकास थांबला आहे़ जिल्ह्यातील विविध बँक शाखेत डीआरडीच्या बचतगटांचे कर्ज प्रकरणे पडून आहेत़ या गटांना कर्ज पुरवठा करण्यास बँकांची तयारी नाही़ ‘विना कारण, विना तारण’ या तत्वावर बँकांनी बचत गटांना १ लाख २५ हजार रूपयापर्यंत कर्ज पुरवठा करणे आवश्यक आहे़ परंतु या तत्वांचा विसर बँकांना पडला आहे़ दारिद्र्य रेषेखालील बचत गटांची पत तसेच पाठपुरावा करणाºया यंत्रणेची कमतरता असल्याने या कर्ज प्रकरणांकडे कोणाचेही लक्ष नाही़दुसरीकडे प्रशासकीय स्तरावरून या गटांच्या विकासासाठी प्रयत्न करणारी यंत्रणा अपुरी पडत आहे़ त्यामुळे गटांची परिस्थिती दयनीय झाली आहे़ दरम्यान, बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी राबविण्यात येणाºया विविध उपक्रमांचाही विसर प्रशासनाला पडला आहे़