शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

जिल्ह्यात १,३८७ पाणीपुरवठा योजना बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 01:12 IST

औरंगाबाद : बिलाच्या थकबाकीमुळे महावितरण कंपनीने जिल्ह्यातील १,३८७ ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजनांचा विद्युत प्रवाह कापला

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : बिलाच्या थकबाकीमुळे महावितरण कंपनीने जिल्ह्यातील १,३८७ ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजनांचा विद्युत प्रवाह कापला. परिणामी मागील आठ ते दहा दिवसांपासून ग्रामस्थांवर भर पावसाळ्यात पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. तथापि, आज शनिवारी मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी महावितरणच्या प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक ओम प्रकाश बकोरिया यांची भेट घेऊन तडजोड करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा बकोरिया यांनी सोमवारी परत भेटण्याची ग्वाही दिल्यामुळे वीज जोडणीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.महावितरण कंपनीने सध्या थकबाकी वसुली मोहीम हाती घेतली आहे. जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींना ७५ हजार ते २ लाखांपर्यंतचे उत्पन्न मिळते. असे असताना त्या ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा योजनांचे वीज बिल मात्र १५ ते २० लाखांपर्यंत देण्यात आले आहे. त्यामुळे अनेक ग्रामपंचायतींना मिळणारा महसूल कमी व बिलांची रक्कम लाखोंच्या घरात असल्यामुळे त्या वीज बिलाचा भरणा करू शकल्या नाहीत. परिणामी महावितरण कंपनीने तब्बल १,३८७ ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजनांची वीज कापली आहे.महावितरण कंपनीने या सर्व योजनांकडे २३ कोटी ८५ लाख रुपयांची निव्वळ थकबाकी दाखवली असून, त्यावर १३ कोटी ८९ लाख रुपयांचे व्याज वेगळेच. याशिवाय चालू महिन्याच्या बिलाची रक्कम ही २९ लाख रुपये एवढी आहे. वास्तविक या संपूर्ण पाणीपुरवठा योजनांकडे वीज बिलाची थकबाकी २४ कोटी १४ लाख रुपये एवढी आहे.