शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

जायकवाडीच्या पाण्याविषयी संभ्रम

By admin | Updated: May 26, 2014 00:58 IST

पाथरी : जायकवाडी धरणातील डाव्या कालव्यात आठ दिवसांपूर्वी पाणी सोडण्यात आले असले तरी या भागातील शेतकर्‍यांना मात्र हे पाणी मिळणार की नाही? याबाबत अद्यापही संभ्रम आहे.

पाथरी : जायकवाडी धरणातील डाव्या कालव्यात आठ दिवसांपूर्वी पाणी सोडण्यात आले असले तरी या भागातील शेतकर्‍यांना मात्र हे पाणी मिळणार की नाही? याबाबत अद्यापही संभ्रम आहे. उन्हाळ्याच्या सरतेशेवटी जायकवाडी विभागाने डाव्या कालव्यामध्ये पाणी सोडले आहे. या भागातील शेतकरी सुरुवातीपासूनच चार पाणीपाळी सोडा, अशी मागणी करीत होते. परंतु प्रशासनाने जायकवाडी धरणातील पहिली पाणी पाळी जानेवारी महिन्यामध्ये सोडली होती. त्यानंंतर मार्च आणि एप्रिल महिन्यात जायकवाडीचे पाणी सोडावे, अशी मागणी शेतकर्‍यांकडून करण्यात येत होती. परंतु प्रशासनाकडून याबाबत कोणताही निर्णय झाला नव्हता. आठ ते दहा दिवसांपूर्वी जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यात पाणी सोडण्यात आले आहे. परंतु परभणी जिल्ह्यातील शेतकर्‍यांकडून पाणी मागणी अर्जच आले नसल्याचे कारण देऊन हे पाणी परभणी जिल्ह्याला देण्यात आले नाही. त्यामुळे हे सोडण्यात आलेले पाणी प्रत्यक्षात शेतकर्‍यांच्या शेतापर्यंत पोहोचेल की, नाही? याची शाश्वती नाही. याबाबत शेतकर्‍यांसोबत प्रशासनाने समन्वय न साधल्यामुळे पाणी मागणी अर्ज शेतकर्‍यांकडून गेले नाहीत. यामुळे या भागातील शेतकर्‍यांना चांगलाच फटका बसणार आहे. (प्रतिनिधी)