शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

जायकवाडीच्या पाण्याविषयी संभ्रम

By admin | Updated: May 26, 2014 00:58 IST

पाथरी : जायकवाडी धरणातील डाव्या कालव्यात आठ दिवसांपूर्वी पाणी सोडण्यात आले असले तरी या भागातील शेतकर्‍यांना मात्र हे पाणी मिळणार की नाही? याबाबत अद्यापही संभ्रम आहे.

पाथरी : जायकवाडी धरणातील डाव्या कालव्यात आठ दिवसांपूर्वी पाणी सोडण्यात आले असले तरी या भागातील शेतकर्‍यांना मात्र हे पाणी मिळणार की नाही? याबाबत अद्यापही संभ्रम आहे. उन्हाळ्याच्या सरतेशेवटी जायकवाडी विभागाने डाव्या कालव्यामध्ये पाणी सोडले आहे. या भागातील शेतकरी सुरुवातीपासूनच चार पाणीपाळी सोडा, अशी मागणी करीत होते. परंतु प्रशासनाने जायकवाडी धरणातील पहिली पाणी पाळी जानेवारी महिन्यामध्ये सोडली होती. त्यानंंतर मार्च आणि एप्रिल महिन्यात जायकवाडीचे पाणी सोडावे, अशी मागणी शेतकर्‍यांकडून करण्यात येत होती. परंतु प्रशासनाकडून याबाबत कोणताही निर्णय झाला नव्हता. आठ ते दहा दिवसांपूर्वी जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यात पाणी सोडण्यात आले आहे. परंतु परभणी जिल्ह्यातील शेतकर्‍यांकडून पाणी मागणी अर्जच आले नसल्याचे कारण देऊन हे पाणी परभणी जिल्ह्याला देण्यात आले नाही. त्यामुळे हे सोडण्यात आलेले पाणी प्रत्यक्षात शेतकर्‍यांच्या शेतापर्यंत पोहोचेल की, नाही? याची शाश्वती नाही. याबाबत शेतकर्‍यांसोबत प्रशासनाने समन्वय न साधल्यामुळे पाणी मागणी अर्ज शेतकर्‍यांकडून गेले नाहीत. यामुळे या भागातील शेतकर्‍यांना चांगलाच फटका बसणार आहे. (प्रतिनिधी)