शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

जायकवाडी पक्षी अभयारण्य अतिक्रमणांच्या विळख्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2019 04:56 IST

महाराष्ट्रातील पाणतळीचे सगळ्यात मोठे पक्षी अभयारण्य म्हणून जायकवाडीकडे पाहिले जाते.

ऋचिका पालोदकर औरंगाबाद : महाराष्ट्रातील पाणतळीचे सगळ्यात मोठे पक्षी अभयारण्य म्हणून जायकवाडीकडे पाहिले जाते. पण प्रशासनाच्या उदासीन कारभारामुळे स्थानिक लोकांची अतिक्रमणे फोफावली आणि पक्ष्यांची संख्या रोडावली आहे.पाण्याजवळ येताच पक्ष्यांच्याही आधी येथील मासेमारीच्या जाळ्या, गाळपेऱ्यात फुललेली शेती आणि खराब कपडे, प्लास्टिकच्या बाटल्या, थर्माकोलचा कचरा लक्ष वेधून घेतो. गाळपेºयात शेती केली जात असल्यामुळे पिकांवर कीटकनाशके फवारण्यात येतात. यातील काही जमिनीत मिसळून पाण्यात जातात. हे जलचर आणि पक्ष्यांसाठी अपायकारक असल्याने त्यांची संख्या घटली आहे. याशिवाय मासेमारीच्या जाळ्या ठिकठिकाणी पाण्यात सोडलेल्या असून, यातही पक्षी अडकून दगावतात. मानवी हस्तक्षेपामुळे मागच्या १० ते १२ वर्षांत पक्ष्यांचे प्रमाण प्रचंड घटले आहे. पूर्वी येथे ४० ते ५० हजार फ्लेमिंगो पक्षी दिसायचे. ही संख्या आता अवघ्या १-२ हजारांवर आली आहे.डीएमआयसी प्रकल्पासाठी पाणीपुरवठा करण्याचे काम येथे मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यामुळे येथे कामगार राहतात. या प्रकल्पासाठी सुरू असणारे बांधकाम, सुरुंगांचे स्फोट, यामुळेही पक्ष्यांच्या संख्येवर मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम झाल्याचे पक्षीतज्ज्ञ डॉ. किशोर पाठक यांनी सांगितले.>180 पेक्षाही अधिक प्रजातीयेथे स्थानिक, स्थलांतरित पक्ष्यांच्या एकूण १८० पेक्षाही अधिक प्रजाती आहेत. फ्लेमिंगो (रोहित) पक्षी येथील मुख्य आकर्षण असून, हिवाळ्यात येणारे मत्स्य गरूड, रंगीत करकोचा, लालसरी बदक, फापड्या बदक यासह कृष्णकौंच, तुतारी, तुतवार, पाणलावा, बदक व गरुडांचे विविध प्रकार, माळभिंगरी, कमळ, नीलकमळ, विविध सूरय जातीचे पक्षी मध्य आशिया, सायबेरिया, युरोप, रशिया, चीन, तिबेट येथून येतात. हळद- कुंकू बदक, पाणकावळे, ब्राह्मणी घार, वारकरी बदक, पाणकोंबड्या, नदीसूरय, शिरवा हे येथील स्थानिक पक्षी आहेत. लडाख, उत्तरांचल, दक्षिणेकडील राज्यातूनही अनेक पक्षी येतात.>अक्षम्य दुर्लक्षनिसर्गाने भरभरून दिले आहे; पण वनखाते, सिंचन विभाग आणि महसूल खाते यांचे अक्षम्य दुर्लक्ष याठिकाणी दिसून येते. यामुळे कधी काळी लाखोंच्या संख्येत येणारे पक्षी आता केवळ हजारोंच्या संख्येतयेतआहेत.- डॉ. किशोर पाठक, पक्षीतज्ज्ञ>मनुष्यबळाची कमीमासेमारीच्या माध्यमातून परिसरातील गोरगरीब लोक त्यांचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्यावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करीत आहोत. पण अनेकदा लपून- छपून हे लोक मासेमारी करायला येतात. आमच्याकडे मनुष्यबळ कमी असल्यामुळे नियंत्रण ठेवायला कोणी नाही. - संजय भिसे,वन परिक्षेत्र अधिकारी