शहरं
Join us  
Trending Stories
1
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
2
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
3
Ram Sutar: शिल्पकलेचा उपासक काळाच्या पडद्याआड! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
4
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत म्हणाला-
5
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
6
SEBI नं तीन दशकं जुन्या ब्रोकिंगच्या नियमांत केले महत्त्वाचे बदल; अनेक मोठ्या सुधारणांनाही मंजुरी, जाणून घ्या
7
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
8
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
9
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
10
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
11
जास्त पीक! शेतात तयार झाल्या प्रचंड 'विहिरी'! तुर्कीतील शेतकऱ्यांनी स्वतःहून ओढवून घेतलेली आपत्ती
12
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
13
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
14
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
15
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
16
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
17
काँग्रेस 'मविआ'त नाही; आता मनसे, उद्धवसेनेची आघाडी, मुंबई महापालिकेचे गणित बदलले
18
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
19
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
20
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
Daily Top 2Weekly Top 5

जायकवाडी पक्षी अभयारण्य अतिक्रमणांच्या विळख्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2019 04:56 IST

महाराष्ट्रातील पाणतळीचे सगळ्यात मोठे पक्षी अभयारण्य म्हणून जायकवाडीकडे पाहिले जाते.

ऋचिका पालोदकर औरंगाबाद : महाराष्ट्रातील पाणतळीचे सगळ्यात मोठे पक्षी अभयारण्य म्हणून जायकवाडीकडे पाहिले जाते. पण प्रशासनाच्या उदासीन कारभारामुळे स्थानिक लोकांची अतिक्रमणे फोफावली आणि पक्ष्यांची संख्या रोडावली आहे.पाण्याजवळ येताच पक्ष्यांच्याही आधी येथील मासेमारीच्या जाळ्या, गाळपेऱ्यात फुललेली शेती आणि खराब कपडे, प्लास्टिकच्या बाटल्या, थर्माकोलचा कचरा लक्ष वेधून घेतो. गाळपेºयात शेती केली जात असल्यामुळे पिकांवर कीटकनाशके फवारण्यात येतात. यातील काही जमिनीत मिसळून पाण्यात जातात. हे जलचर आणि पक्ष्यांसाठी अपायकारक असल्याने त्यांची संख्या घटली आहे. याशिवाय मासेमारीच्या जाळ्या ठिकठिकाणी पाण्यात सोडलेल्या असून, यातही पक्षी अडकून दगावतात. मानवी हस्तक्षेपामुळे मागच्या १० ते १२ वर्षांत पक्ष्यांचे प्रमाण प्रचंड घटले आहे. पूर्वी येथे ४० ते ५० हजार फ्लेमिंगो पक्षी दिसायचे. ही संख्या आता अवघ्या १-२ हजारांवर आली आहे.डीएमआयसी प्रकल्पासाठी पाणीपुरवठा करण्याचे काम येथे मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यामुळे येथे कामगार राहतात. या प्रकल्पासाठी सुरू असणारे बांधकाम, सुरुंगांचे स्फोट, यामुळेही पक्ष्यांच्या संख्येवर मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम झाल्याचे पक्षीतज्ज्ञ डॉ. किशोर पाठक यांनी सांगितले.>180 पेक्षाही अधिक प्रजातीयेथे स्थानिक, स्थलांतरित पक्ष्यांच्या एकूण १८० पेक्षाही अधिक प्रजाती आहेत. फ्लेमिंगो (रोहित) पक्षी येथील मुख्य आकर्षण असून, हिवाळ्यात येणारे मत्स्य गरूड, रंगीत करकोचा, लालसरी बदक, फापड्या बदक यासह कृष्णकौंच, तुतारी, तुतवार, पाणलावा, बदक व गरुडांचे विविध प्रकार, माळभिंगरी, कमळ, नीलकमळ, विविध सूरय जातीचे पक्षी मध्य आशिया, सायबेरिया, युरोप, रशिया, चीन, तिबेट येथून येतात. हळद- कुंकू बदक, पाणकावळे, ब्राह्मणी घार, वारकरी बदक, पाणकोंबड्या, नदीसूरय, शिरवा हे येथील स्थानिक पक्षी आहेत. लडाख, उत्तरांचल, दक्षिणेकडील राज्यातूनही अनेक पक्षी येतात.>अक्षम्य दुर्लक्षनिसर्गाने भरभरून दिले आहे; पण वनखाते, सिंचन विभाग आणि महसूल खाते यांचे अक्षम्य दुर्लक्ष याठिकाणी दिसून येते. यामुळे कधी काळी लाखोंच्या संख्येत येणारे पक्षी आता केवळ हजारोंच्या संख्येतयेतआहेत.- डॉ. किशोर पाठक, पक्षीतज्ज्ञ>मनुष्यबळाची कमीमासेमारीच्या माध्यमातून परिसरातील गोरगरीब लोक त्यांचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्यावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करीत आहोत. पण अनेकदा लपून- छपून हे लोक मासेमारी करायला येतात. आमच्याकडे मनुष्यबळ कमी असल्यामुळे नियंत्रण ठेवायला कोणी नाही. - संजय भिसे,वन परिक्षेत्र अधिकारी