शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

जायकवाडी पक्षी अभयारण्य अतिक्रमणांच्या विळख्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2019 04:56 IST

महाराष्ट्रातील पाणतळीचे सगळ्यात मोठे पक्षी अभयारण्य म्हणून जायकवाडीकडे पाहिले जाते.

ऋचिका पालोदकर औरंगाबाद : महाराष्ट्रातील पाणतळीचे सगळ्यात मोठे पक्षी अभयारण्य म्हणून जायकवाडीकडे पाहिले जाते. पण प्रशासनाच्या उदासीन कारभारामुळे स्थानिक लोकांची अतिक्रमणे फोफावली आणि पक्ष्यांची संख्या रोडावली आहे.पाण्याजवळ येताच पक्ष्यांच्याही आधी येथील मासेमारीच्या जाळ्या, गाळपेऱ्यात फुललेली शेती आणि खराब कपडे, प्लास्टिकच्या बाटल्या, थर्माकोलचा कचरा लक्ष वेधून घेतो. गाळपेºयात शेती केली जात असल्यामुळे पिकांवर कीटकनाशके फवारण्यात येतात. यातील काही जमिनीत मिसळून पाण्यात जातात. हे जलचर आणि पक्ष्यांसाठी अपायकारक असल्याने त्यांची संख्या घटली आहे. याशिवाय मासेमारीच्या जाळ्या ठिकठिकाणी पाण्यात सोडलेल्या असून, यातही पक्षी अडकून दगावतात. मानवी हस्तक्षेपामुळे मागच्या १० ते १२ वर्षांत पक्ष्यांचे प्रमाण प्रचंड घटले आहे. पूर्वी येथे ४० ते ५० हजार फ्लेमिंगो पक्षी दिसायचे. ही संख्या आता अवघ्या १-२ हजारांवर आली आहे.डीएमआयसी प्रकल्पासाठी पाणीपुरवठा करण्याचे काम येथे मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यामुळे येथे कामगार राहतात. या प्रकल्पासाठी सुरू असणारे बांधकाम, सुरुंगांचे स्फोट, यामुळेही पक्ष्यांच्या संख्येवर मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम झाल्याचे पक्षीतज्ज्ञ डॉ. किशोर पाठक यांनी सांगितले.>180 पेक्षाही अधिक प्रजातीयेथे स्थानिक, स्थलांतरित पक्ष्यांच्या एकूण १८० पेक्षाही अधिक प्रजाती आहेत. फ्लेमिंगो (रोहित) पक्षी येथील मुख्य आकर्षण असून, हिवाळ्यात येणारे मत्स्य गरूड, रंगीत करकोचा, लालसरी बदक, फापड्या बदक यासह कृष्णकौंच, तुतारी, तुतवार, पाणलावा, बदक व गरुडांचे विविध प्रकार, माळभिंगरी, कमळ, नीलकमळ, विविध सूरय जातीचे पक्षी मध्य आशिया, सायबेरिया, युरोप, रशिया, चीन, तिबेट येथून येतात. हळद- कुंकू बदक, पाणकावळे, ब्राह्मणी घार, वारकरी बदक, पाणकोंबड्या, नदीसूरय, शिरवा हे येथील स्थानिक पक्षी आहेत. लडाख, उत्तरांचल, दक्षिणेकडील राज्यातूनही अनेक पक्षी येतात.>अक्षम्य दुर्लक्षनिसर्गाने भरभरून दिले आहे; पण वनखाते, सिंचन विभाग आणि महसूल खाते यांचे अक्षम्य दुर्लक्ष याठिकाणी दिसून येते. यामुळे कधी काळी लाखोंच्या संख्येत येणारे पक्षी आता केवळ हजारोंच्या संख्येतयेतआहेत.- डॉ. किशोर पाठक, पक्षीतज्ज्ञ>मनुष्यबळाची कमीमासेमारीच्या माध्यमातून परिसरातील गोरगरीब लोक त्यांचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्यावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करीत आहोत. पण अनेकदा लपून- छपून हे लोक मासेमारी करायला येतात. आमच्याकडे मनुष्यबळ कमी असल्यामुळे नियंत्रण ठेवायला कोणी नाही. - संजय भिसे,वन परिक्षेत्र अधिकारी