शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
3
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
4
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
5
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
6
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
7
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
8
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
9
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
10
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
11
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
12
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
13
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
14
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

शौचालयासाठी ४०० लोककलावंतांचा जागर

By admin | Updated: May 29, 2017 00:25 IST

लातूर : ९० हजार शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट घेऊन काम करणाऱ्या जिल्हा परिषद प्रशासनाने लोककलावंतांकडून जागर सुरू केला आहे.

आशपाक पठाण । लोकमत न्यूज नेटवर्कलातूर : गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी स्वच्छ भारत अभियानांतर्गत लातूर जिल्ह्यात विविध उपक्रम राबविले जात आहेत. ३१ मार्च २०१८ अखेर जिल्हा हागणदारीमुक्त व्हावा, यासाठी ९० हजार शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट घेऊन काम करणाऱ्या जिल्हा परिषद प्रशासनाने लोककलावंतांकडून जागर सुरू केला आहे. जवळपास ४०० कलावंत गावोगावी जाऊन शौचालय बांधकामाचे महत्त्व पटवून देण्याचे काम करीत आहेत. वासुदेव, मसनजोगी आणि पांगूळही गावोगावी आरोळी ठोकत आहेत.गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी विडा उचललेल्या काही ग्रामपंचायतींना स्वच्छ भारत अभियानांतर्गत प्रशासनही पाठबळ देत आहे. जिल्ह्यात एकूण ७८३ ग्रामपंचायती आहेत. यातील ३९० ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या असून, उर्वरित ग्रामपंचायत क्षेत्रात शौचालय बांधकामाची जणू चळवळच उभी करण्यात आली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी उघड्यावर शौचास जाणाऱ्या नागरिकांचे मतपरिवर्तन करण्याचे काम हाती घेतले आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालय बांधकामासाठी १२ हजार रुपयांची शासन मदत देत आहे. ही मदत म्हणजे संबंधित लाभधारकांना प्रोत्साहन असून त्यांचेच आरोग्य सुदृढ राहावे, उघड्यावर कोणीही शौचास जाऊ नये, वैयक्तिक पर्यायाने गावचेही आरोग्य कसे सुरक्षित ठेवता येईल, यासाठी जिल्हा परिषद प्रशासन कामाला लागले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी ग्रामसेवक संघटना तसेच अन्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांंनाही हागणदारीमुक्त गाव करण्यासाठी कामाला लावले आहे. त्यानुसार गुडमॉर्निंग पथकेही गावोगावी जात आहेत. उघड्यावर जाणाऱ्या नागरिकांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अनोखे स्वागत केले जात आहे. तर काही ठिकाणी थेट पोलीस कारवाईही केली जात आहे. याशिवाय, लोककलावंतही गावोगावी शौचालय बांधकाम, आरोग्य, स्वच्छता याविषयी प्रबोधन करीत आहेत.