शहरं
Join us  
Trending Stories
1
'ठाकरे बंधूंचा वचननामा ४ जानेवारीला प्रसिद्ध करणार, नंतर एवढ्या संयुक्त सभा होणार', संजय राऊत यांनी दिली माहिती 
2
'AB फॉर्म'चा झोल केला! भाजपच्या बंडखोर उमेदवाराने पक्षालाच गंडवलं, अमित साटमांचे थेट अधिकाऱ्यालाच पत्र
3
सिगरेट, पान मसाला, तंबाखू महागणार, नवीन कर आणि सेस लागू होणार; १ फेब्रुवारीपासून किंमत वाढणार? जाणून घ्या
4
आजपासून 'भारत टॅक्सी'ची सुरुवात; स्वस्त प्रवास अन् 'नो सर्ज प्रायसिंग'ने प्रवाशांना मिळणार दिलासा
5
दोन वर्षांत १४ लाख पाकिस्तान्यांनी देश सोडला! कारण काय?
6
१ वर्षासाठी एफडीमध्ये १ लाख रुपये गुंतवून तुम्हाला किती परतावा मिळेल? कोणत्या बँकेत किती रिटर्न, पाहा
7
ईडीने धनकुबेराच्या घरीच छापा मारला; रोकड सोडा, दागिनेच एवढ्या कोटींचे सापडले की... घबाड पाहून अधिकारीही अवाक्
8
दूधात मिसळलं नळाचं पाणी, तेच ठरलं विष; ५ महिन्यांच्या अव्यानचा मृत्यू, १० वर्षांनी झालेला मुलगा
9
नवे वर्ष २०२६: आयुष्यातील नकारात्मकता दूर करण्यासाठी या वर्षात करा 'हे' ५ उपाय!
10
मुंबईकरांना वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य सेवा मोफत; ‘आप’ने दिली गॅरंटी, जाहीरनामा केला प्रसिद्ध
11
"भाजपच्या सांगण्यावरुनच कृपाशंकर यांनी..."; उत्तर भारतीय महापौर करण्याच्या विधानावरुन संजय राऊत आक्रमक
12
Success Story: कपडे धुवून कोट्यधीश बनली 'ही' व्यक्ती, एकेकाळी रिक्षाचं भाडं देण्यासही नव्हते पैसे, कसा होता आजवरचा प्रवास
13
शिंदेसेनेच्या २, उद्धवसेना, काँग्रेसच्या प्रत्येकी एका उमेदवाराचा अर्ज रद्द, ७१९ उमेदवार रिंगणात
14
विमानाचं तिकीट आता खिशाला परवडणार? विमान इंधनाच्या किमतीत मोठी कपात; पाहा काय आहेत नवीन दर?
15
तो काळ परत येणार नाही...! PCO चा बुथ ते 3G डोंगलचा वेग; स्मार्टफोन आणि ५जीच्या स्पीडने तुम्ही विसरलात का...?
16
प्रवाशांनो… २४ ट्रेनची वेळ बदलली, ६२ ट्रेनचा वेग वाढला; पुणे, मुंबईतील अनेक ट्रेनचा समावेश!
17
अर्ज छाननीचाही ‘रात्रीस खेळ चाले’; मुंबईत १६७ अर्ज बाद, भाईंदरमध्ये ६०० अर्ज वैध
18
'धुरंधर'च्या यशानंतरही रणवीर सिंह गायब? आता दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, 'पाजी खूप...'
19
बंडखोरी, नाराजी शमविण्यासाठी ठाकरे बंधूंचे नेते आता मैदानात
20
LPG Price Hike: नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका, एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

जाधववाडीत शुकशुकाट

By admin | Updated: June 3, 2017 00:47 IST

औरंगाबाद : शेतकऱ्यांच्या संपाच्या दुसऱ्या दिवशी आज शुक्रवार असल्याने जाधववाडीतील फळभाज्यांच्या अडत बाजाराला साप्ताहिक सुटी होती

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शेतकऱ्यांच्या संपाच्या दुसऱ्या दिवशी आज शुक्रवार असल्याने जाधववाडीतील फळभाज्यांच्या अडत बाजाराला साप्ताहिक सुटी होती. धान्याच्या अडत बाजारात मात्र गहू, बाजारी, तांदूळ, तुरीची ५४ टन आवक झाली; पण हमालांनी संपाला पाठिंबा दिल्याने तोलाई झाली नाही. ग्राहकांनीही पाठ फिरविल्याने या बाजारात शुकशुकाट जाणवत होता. कर्जमाफी मिळावी यासह अन्य मागण्यांसाठी शेतकरी संपावर गेले आहेत. गुरुवारी संपाच्या पहिल्या दिवशी जाधववाडीतील अडत बाजारात टरबूज, टोमॅटो फेकून देणाऱ्या शेतकरी प्रतिनिधींना संतापलेल्या काही व्यापाऱ्यांनी मारहाण केल्याने मोठा गदारोळ झाला होता; पण आज अडत बाजाराला सुटी असल्याने परपेठेतून फळे, पालेभाज्या आल्या नाहीत. तिथे २० ते २५ किरकोळ विक्रेत्यांनी कालच्या शिल्लक भाज्या व फळे विक्रीला ठेवली होती. शिवसेनेचे अंबादास दानवे यांनी या भागात फेरफटका मारला; पण किरकोळ विक्रेते शिल्लक भाज्या विक्री करताना पाहून ते निघून गेले. संपाच्या दुसऱ्या दिवशी धान्याच्या अडत बाजारात परपेठेतील आवकीवर मोठा परिणाम झाल्याचे जाणवले. एरव्ही दररोज परपेठेतून १५ ते २० ट्रक धान्य बाजारपेठेत येत असते. मात्र, आज परपेठेतून १६ टन गहू व ३२ टन तांदळाची आवक झाली. गंगापूर, पैठण आदी तालुक्यांतून ३ टन तुरी, आसपासच्या ग्रामीण भागातून १५ पोते गहू व १५ पोते बाजरीची आवक झाली. व्यापाऱ्यांनी सर्वमाल उतरून घेतला व ट्रकचालकांना रवाना केले. या आलेल्या धान्याची तोलाई, हर्राशी झालीच नाही. कारण, शेतकऱ्यांच्या संपाला हमालांनी पाठिंबा दिला आहे. यामुळे दुपारपर्यंत हमाल कामावर आले नव्हते. म्हणून तोलाई होऊ शकली नाही, अशी माहिती कृउबाचे सचिव विजय शिरसाठ यांनी दिली. शेतकऱ्यांच्या संपामुळे धान्याच्या अडत बाजारात धान्याची आवक घटली, तसेच वार्षिक धान्य खरेदीही संपुष्टात आल्याने उठावही कमी झाला. यामुळे दिवसभर धान्याचा अडत बाजारात शुकशुकाट जाणवत होता. अनेक अडत्यांनी आज आपली दुकानेही उघडली नव्हती. ज्या अडत्यांनी दुकाने उघडली त्यांनी काम नसल्याने गटागटाने गप्पा मारून वेळ काढला. दुपारी ४ नंतर अडत्यांनी दुकाने बंद करून घरचा रस्ता धरला.