शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

जाधववाडीत शुकशुकाट

By admin | Updated: June 3, 2017 00:47 IST

औरंगाबाद : शेतकऱ्यांच्या संपाच्या दुसऱ्या दिवशी आज शुक्रवार असल्याने जाधववाडीतील फळभाज्यांच्या अडत बाजाराला साप्ताहिक सुटी होती

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शेतकऱ्यांच्या संपाच्या दुसऱ्या दिवशी आज शुक्रवार असल्याने जाधववाडीतील फळभाज्यांच्या अडत बाजाराला साप्ताहिक सुटी होती. धान्याच्या अडत बाजारात मात्र गहू, बाजारी, तांदूळ, तुरीची ५४ टन आवक झाली; पण हमालांनी संपाला पाठिंबा दिल्याने तोलाई झाली नाही. ग्राहकांनीही पाठ फिरविल्याने या बाजारात शुकशुकाट जाणवत होता. कर्जमाफी मिळावी यासह अन्य मागण्यांसाठी शेतकरी संपावर गेले आहेत. गुरुवारी संपाच्या पहिल्या दिवशी जाधववाडीतील अडत बाजारात टरबूज, टोमॅटो फेकून देणाऱ्या शेतकरी प्रतिनिधींना संतापलेल्या काही व्यापाऱ्यांनी मारहाण केल्याने मोठा गदारोळ झाला होता; पण आज अडत बाजाराला सुटी असल्याने परपेठेतून फळे, पालेभाज्या आल्या नाहीत. तिथे २० ते २५ किरकोळ विक्रेत्यांनी कालच्या शिल्लक भाज्या व फळे विक्रीला ठेवली होती. शिवसेनेचे अंबादास दानवे यांनी या भागात फेरफटका मारला; पण किरकोळ विक्रेते शिल्लक भाज्या विक्री करताना पाहून ते निघून गेले. संपाच्या दुसऱ्या दिवशी धान्याच्या अडत बाजारात परपेठेतील आवकीवर मोठा परिणाम झाल्याचे जाणवले. एरव्ही दररोज परपेठेतून १५ ते २० ट्रक धान्य बाजारपेठेत येत असते. मात्र, आज परपेठेतून १६ टन गहू व ३२ टन तांदळाची आवक झाली. गंगापूर, पैठण आदी तालुक्यांतून ३ टन तुरी, आसपासच्या ग्रामीण भागातून १५ पोते गहू व १५ पोते बाजरीची आवक झाली. व्यापाऱ्यांनी सर्वमाल उतरून घेतला व ट्रकचालकांना रवाना केले. या आलेल्या धान्याची तोलाई, हर्राशी झालीच नाही. कारण, शेतकऱ्यांच्या संपाला हमालांनी पाठिंबा दिला आहे. यामुळे दुपारपर्यंत हमाल कामावर आले नव्हते. म्हणून तोलाई होऊ शकली नाही, अशी माहिती कृउबाचे सचिव विजय शिरसाठ यांनी दिली. शेतकऱ्यांच्या संपामुळे धान्याच्या अडत बाजारात धान्याची आवक घटली, तसेच वार्षिक धान्य खरेदीही संपुष्टात आल्याने उठावही कमी झाला. यामुळे दिवसभर धान्याचा अडत बाजारात शुकशुकाट जाणवत होता. अनेक अडत्यांनी आज आपली दुकानेही उघडली नव्हती. ज्या अडत्यांनी दुकाने उघडली त्यांनी काम नसल्याने गटागटाने गप्पा मारून वेळ काढला. दुपारी ४ नंतर अडत्यांनी दुकाने बंद करून घरचा रस्ता धरला.