शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

जाधववाडी बाजार समितीचा कारभार आजपासून आॅनलाईन; विरोध करणा-यांचे परवाने होणार रद्द 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 17:32 IST

जाधववाडी येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुक्रवार ९ फेब्रुवारीपासून प्रत्यक्षात राष्ट्रीय कृषी बाजार ‘ई-नाम’ ला सुरुवात होणार आहे. यात प्रारंभी,  प्राथमिक स्वरूपात बाजार समितीअंतर्गत आॅनलाईन हर्राशी होणार आहे.

औरंगाबाद : जाधववाडी येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुक्रवार ९ फेब्रुवारीपासून प्रत्यक्षात राष्ट्रीय कृषी बाजार ‘ई-नाम’ ला सुरुवात होणार आहे. यात प्रारंभी,  प्राथमिक स्वरूपात बाजार समितीअंतर्गत आॅनलाईन हर्राशी होणार आहे. या अंतर्गत पारंपरिक रोखेच्या व्यवहाराऐवजी शेतकर्‍यांच्या थेट बँकेच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे. जे अडत्या किंवा खरेदीदार आॅनलाईन व्यवहाराला विरोध करतील त्यांच्या परवान्याचे नूतनीकरण करण्यात येणार नाही, हे विशेष. 

शेतकर्‍यांची होणारी लूट थांबविण्यासाठी, शेतीमालाला रास्त भाव मिळावा व बाजार समितीमधील व्यवहारात पारदर्शकता निर्माण व्हावी, यासाठी केंद्र सरकार देशभर आॅनलाईन कृषी बाजार प्रकल्प राबवीत आहे. यासाठी ‘ई-नाम’ पोर्टल तयार करण्यात आले आहे. यासाठी राज्यात पहिल्या टप्प्यात ३० बाजार समिती निवडण्यात आल्या त्यातील औरंगाबादेतील बाजार समिती एक आहे. तीन महिने झाले पण येथे ‘ई-नाम’ला सुरुवात झाली नाही. याचा आढावा घेण्यासाठी  महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार बाजार समितीत आले होते. शुक्रवार ९ फेब्रुवारीपासून येथे प्राथमिक स्वरूपात ‘आॅनलाईन हर्राशी’ सुरूकरा, असे आदेश त्यांनी दिले.

या संदर्भात बाजार समितीचे सचिव विजय शिरसाट यांनी सांगितले की, बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारात आजपर्यंत ४७९१ शेतकर्‍यांची नोंदणी झाली आहे. त्यातील ३७९ शेतकर्‍यांनी ‘ई-नाम’ पोर्टलवर नोंदणी केली आहे. याशिवाय अडते व खरेदीदारांनीही पोर्टलवर नोंदणी केली आहे. केंद्र सरकारने कॉम्प्युटर व टेस्टिंग लॅब आदी सुविधांचा पुरवठा केला आहे. प्रत्येक सेल हॉलमध्ये स्वतंत्र केबिन तयार केली आहे. येत्या महिन्यात नवीन खरेदीदारांची संख्या वाढविण्यात येणार आहे.

प्राथमिक स्वरूपात ई-व्यवहार धान्याच्या अडत बाजारात सकाळपासून आॅनलाईन-हर्राशीला सुरुवात. प्राथमिक स्वरूपात बाजार समिती अंतर्गत शेतीमालाची खरेदी-विक्री होणार. खरेदीदारांची मक्तेदारी मोडण्यासाठी नवीन खरेदीदारांनाही परवाने देणार. ‘ई-नाम’ची अट मान्य करणार्‍या अडत्या-खरेदीदारांचे परवाने नूतनीकरण करणार. 

आॅनलाईन हर्राशी करण्यात अडचणीलिज्ड लाईन कृउबापर्यंत पोहोचली आहे. पण शासनाने नेमलेल्या कंपनीने कंपोनंटचा पुरवठा केला नाही. यामुळे ई-नामचे काम रखडले. बाजार समिती आता  डोंगल वापरून आॅनलाईन हर्राशी सुरू करणार, पण ई-नाम पोर्टलवर स्पीड भेटत नाही. दैनंदिन आलेल्या शेतमालाची मॅन्युअली गुणवत्ता तपासणीसाठी वेळ लागणार.