शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

जाधववाडी बाजार समितीचा कारभार आजपासून आॅनलाईन; विरोध करणा-यांचे परवाने होणार रद्द 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 17:32 IST

जाधववाडी येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुक्रवार ९ फेब्रुवारीपासून प्रत्यक्षात राष्ट्रीय कृषी बाजार ‘ई-नाम’ ला सुरुवात होणार आहे. यात प्रारंभी,  प्राथमिक स्वरूपात बाजार समितीअंतर्गत आॅनलाईन हर्राशी होणार आहे.

औरंगाबाद : जाधववाडी येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुक्रवार ९ फेब्रुवारीपासून प्रत्यक्षात राष्ट्रीय कृषी बाजार ‘ई-नाम’ ला सुरुवात होणार आहे. यात प्रारंभी,  प्राथमिक स्वरूपात बाजार समितीअंतर्गत आॅनलाईन हर्राशी होणार आहे. या अंतर्गत पारंपरिक रोखेच्या व्यवहाराऐवजी शेतकर्‍यांच्या थेट बँकेच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे. जे अडत्या किंवा खरेदीदार आॅनलाईन व्यवहाराला विरोध करतील त्यांच्या परवान्याचे नूतनीकरण करण्यात येणार नाही, हे विशेष. 

शेतकर्‍यांची होणारी लूट थांबविण्यासाठी, शेतीमालाला रास्त भाव मिळावा व बाजार समितीमधील व्यवहारात पारदर्शकता निर्माण व्हावी, यासाठी केंद्र सरकार देशभर आॅनलाईन कृषी बाजार प्रकल्प राबवीत आहे. यासाठी ‘ई-नाम’ पोर्टल तयार करण्यात आले आहे. यासाठी राज्यात पहिल्या टप्प्यात ३० बाजार समिती निवडण्यात आल्या त्यातील औरंगाबादेतील बाजार समिती एक आहे. तीन महिने झाले पण येथे ‘ई-नाम’ला सुरुवात झाली नाही. याचा आढावा घेण्यासाठी  महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार बाजार समितीत आले होते. शुक्रवार ९ फेब्रुवारीपासून येथे प्राथमिक स्वरूपात ‘आॅनलाईन हर्राशी’ सुरूकरा, असे आदेश त्यांनी दिले.

या संदर्भात बाजार समितीचे सचिव विजय शिरसाट यांनी सांगितले की, बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारात आजपर्यंत ४७९१ शेतकर्‍यांची नोंदणी झाली आहे. त्यातील ३७९ शेतकर्‍यांनी ‘ई-नाम’ पोर्टलवर नोंदणी केली आहे. याशिवाय अडते व खरेदीदारांनीही पोर्टलवर नोंदणी केली आहे. केंद्र सरकारने कॉम्प्युटर व टेस्टिंग लॅब आदी सुविधांचा पुरवठा केला आहे. प्रत्येक सेल हॉलमध्ये स्वतंत्र केबिन तयार केली आहे. येत्या महिन्यात नवीन खरेदीदारांची संख्या वाढविण्यात येणार आहे.

प्राथमिक स्वरूपात ई-व्यवहार धान्याच्या अडत बाजारात सकाळपासून आॅनलाईन-हर्राशीला सुरुवात. प्राथमिक स्वरूपात बाजार समिती अंतर्गत शेतीमालाची खरेदी-विक्री होणार. खरेदीदारांची मक्तेदारी मोडण्यासाठी नवीन खरेदीदारांनाही परवाने देणार. ‘ई-नाम’ची अट मान्य करणार्‍या अडत्या-खरेदीदारांचे परवाने नूतनीकरण करणार. 

आॅनलाईन हर्राशी करण्यात अडचणीलिज्ड लाईन कृउबापर्यंत पोहोचली आहे. पण शासनाने नेमलेल्या कंपनीने कंपोनंटचा पुरवठा केला नाही. यामुळे ई-नामचे काम रखडले. बाजार समिती आता  डोंगल वापरून आॅनलाईन हर्राशी सुरू करणार, पण ई-नाम पोर्टलवर स्पीड भेटत नाही. दैनंदिन आलेल्या शेतमालाची मॅन्युअली गुणवत्ता तपासणीसाठी वेळ लागणार.