शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
4
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
5
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
6
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
7
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
9
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
10
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
11
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
12
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
13
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
14
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
16
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
17
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
18
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
19
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
20
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?

‘अच्छा आदमी’च्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य

By admin | Updated: October 13, 2014 00:35 IST

औरंगाबाद : राजकारणात सध्या चांगल्या माणसांची कमी आहे. कोणत्याही मार्गाने सत्ता मिळविणे आणि सत्तेतून सर्वकाही मिळविणाऱ्यांचीच संख्या जास्त आहे.

औरंगाबाद : राजकारणात सध्या चांगल्या माणसांची कमी आहे. कोणत्याही मार्गाने सत्ता मिळविणे आणि सत्तेतून सर्वकाही मिळविणाऱ्यांचीच संख्या जास्त आहे. राजकारणातील चांगुलपणा टिकवून ठेवायचा असेल, तर राजेंद्र दर्डा यांच्यासारख्या ‘अच्छा आदमी’च्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य आहे, असे आवाहन उद्योजक मानसिंग पवार यांनी व्यापारी महासंघाच्या बैठकीत केले. औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघ आणि विविध व्यापारी संघटनेच्या वतीने पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. याप्रसंगी काँग्रेसचे औरंगाबाद पूर्वचे उमेदवार राजेंद्र दर्डा, जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष अजय शहा, मराठवाडा चेंबर्स आॅफ रेड अँड कॉमर्सचे माजी अध्यक्ष तनसुख झांबड, मसिआचे अध्यक्ष भारत मोतिंगे, व्यापारी महासंघाचे मार्गदर्शक झोयब येवलावाला यांची भाषणे झाली. सुरुवातीला राजेंद्र दर्डा यांच्या ‘व्हिजन औरंगाबाद’ या जाहीरनाम्यावर आधारित माहितीपटाचे प्रसारण करण्यात आले. मानसिंग पवार पुढे म्हणाले की, काही दिवसांपूर्वी ‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा’ ही जाहिरात टीव्हीवर दाखविण्यात येत होती; परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सुजाण नागरिकांनी जाहिरातीला त्यांच्याच पद्धतीने; परंतु अत्यंत सकारात्मक उत्तर दिले. त्यामुळे भाजपाला त्या जाहिराती बंद कराव्या लागल्या. गेल्या पंधरा वर्षांतील महाराष्ट्राचा विकासदर इतर राज्यांच्या तुलनेत सर्वांत जास्त आहे. औद्योगिक क्षेत्रात जेवढा विकास महाराष्ट्रात झाला तेवढा कुठल्याच राज्यात झाला नाही. एवढेच काय तर, इतर राज्यांतील लोक वास्तव्यासाठी फक्त महाराष्ट्रालाच पसंती देतात. त्यामुळे जे विचारतील कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, त्यांना एकच सांगा, सातासमुद्रापार जाऊन पोहोचलाय महाराष्ट्र माझा. मानसिंग पवार यांच्या या आवाहनाला सर्व व्यापारी बांधवांनी जबरदस्त प्रतिसाद दिला. राजेंद्र दर्डा यांनी विविध विकासकामांचा लेखाजोखा मांडला. घाटीतील मेडिसीन विभागाची अत्याधुनिक इमारत, एमआयसीयू, एनआयसीयू, महाराष्ट्रातले पहिले कॅन्सर हॉस्पिटल अशा आरोग्य सुविधा आज शहरात निर्माण झाल्या आहेत. विभागीय क्रीडा संकुल, सिडको नाट्यगृह, आंतरराष्ट्रीय विमानतळ यासह गुंठेवारी भागातील विकासकामांमुळे औरंगाबादची प्रगतीकडे वाटचाल सुरू आहे. भविष्यातील औरंगाबाद कसे असावे, याचे व्हिजन आम्ही ५२ हजार नागरिकांच्या संकल्पनांतून मांडले आहे. येणाऱ्या काळात अत्याधुनिक महानगर बनविण्यासाठी मी काम करणार असल्याची ग्वाही दर्डा यांनी दिली. मसिआचे अध्यक्ष भारत मोतिंगे म्हणाले की, राजेंद्र दर्डा यांच्यामुळेच डीएमआयसी औद्योगिक प्रकल्प औरंगाबादेत आला आहे. त्यामुळे येणारा काळ व्यापाऱ्यांसाठी सुवर्णकाळ असणार आहे. व्यापारी महासंघाचे अध्यक्ष अजय शहा म्हणाले की, व्हिजन असलेला नेता सोबत असल्याने व्यापाऱ्यांना काळजी करण्याचे कारण नाही. बैठकीला मसिआचे उपाध्यक्ष अशोक बेडसे पाटील, व्यापारी महासंघाचे सचिव राजन हौजवाला, संजय कांकरिया, मदन जालनावाला, सुभाष दरख, हरिसिंग, हरिभाऊ पवार, राजकुमार भाटिया, राकेश सोनी, शिवशंकर स्वामी, अर्जुन राऊत, मुकेश मुगळे, विकास पाटणी, आदेशपालसिंग छाबडा आदींसह विविध व्यापारी संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.