शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

‘अच्छा आदमी’च्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य

By admin | Updated: October 13, 2014 00:35 IST

औरंगाबाद : राजकारणात सध्या चांगल्या माणसांची कमी आहे. कोणत्याही मार्गाने सत्ता मिळविणे आणि सत्तेतून सर्वकाही मिळविणाऱ्यांचीच संख्या जास्त आहे.

औरंगाबाद : राजकारणात सध्या चांगल्या माणसांची कमी आहे. कोणत्याही मार्गाने सत्ता मिळविणे आणि सत्तेतून सर्वकाही मिळविणाऱ्यांचीच संख्या जास्त आहे. राजकारणातील चांगुलपणा टिकवून ठेवायचा असेल, तर राजेंद्र दर्डा यांच्यासारख्या ‘अच्छा आदमी’च्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य आहे, असे आवाहन उद्योजक मानसिंग पवार यांनी व्यापारी महासंघाच्या बैठकीत केले. औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघ आणि विविध व्यापारी संघटनेच्या वतीने पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. याप्रसंगी काँग्रेसचे औरंगाबाद पूर्वचे उमेदवार राजेंद्र दर्डा, जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष अजय शहा, मराठवाडा चेंबर्स आॅफ रेड अँड कॉमर्सचे माजी अध्यक्ष तनसुख झांबड, मसिआचे अध्यक्ष भारत मोतिंगे, व्यापारी महासंघाचे मार्गदर्शक झोयब येवलावाला यांची भाषणे झाली. सुरुवातीला राजेंद्र दर्डा यांच्या ‘व्हिजन औरंगाबाद’ या जाहीरनाम्यावर आधारित माहितीपटाचे प्रसारण करण्यात आले. मानसिंग पवार पुढे म्हणाले की, काही दिवसांपूर्वी ‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा’ ही जाहिरात टीव्हीवर दाखविण्यात येत होती; परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सुजाण नागरिकांनी जाहिरातीला त्यांच्याच पद्धतीने; परंतु अत्यंत सकारात्मक उत्तर दिले. त्यामुळे भाजपाला त्या जाहिराती बंद कराव्या लागल्या. गेल्या पंधरा वर्षांतील महाराष्ट्राचा विकासदर इतर राज्यांच्या तुलनेत सर्वांत जास्त आहे. औद्योगिक क्षेत्रात जेवढा विकास महाराष्ट्रात झाला तेवढा कुठल्याच राज्यात झाला नाही. एवढेच काय तर, इतर राज्यांतील लोक वास्तव्यासाठी फक्त महाराष्ट्रालाच पसंती देतात. त्यामुळे जे विचारतील कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, त्यांना एकच सांगा, सातासमुद्रापार जाऊन पोहोचलाय महाराष्ट्र माझा. मानसिंग पवार यांच्या या आवाहनाला सर्व व्यापारी बांधवांनी जबरदस्त प्रतिसाद दिला. राजेंद्र दर्डा यांनी विविध विकासकामांचा लेखाजोखा मांडला. घाटीतील मेडिसीन विभागाची अत्याधुनिक इमारत, एमआयसीयू, एनआयसीयू, महाराष्ट्रातले पहिले कॅन्सर हॉस्पिटल अशा आरोग्य सुविधा आज शहरात निर्माण झाल्या आहेत. विभागीय क्रीडा संकुल, सिडको नाट्यगृह, आंतरराष्ट्रीय विमानतळ यासह गुंठेवारी भागातील विकासकामांमुळे औरंगाबादची प्रगतीकडे वाटचाल सुरू आहे. भविष्यातील औरंगाबाद कसे असावे, याचे व्हिजन आम्ही ५२ हजार नागरिकांच्या संकल्पनांतून मांडले आहे. येणाऱ्या काळात अत्याधुनिक महानगर बनविण्यासाठी मी काम करणार असल्याची ग्वाही दर्डा यांनी दिली. मसिआचे अध्यक्ष भारत मोतिंगे म्हणाले की, राजेंद्र दर्डा यांच्यामुळेच डीएमआयसी औद्योगिक प्रकल्प औरंगाबादेत आला आहे. त्यामुळे येणारा काळ व्यापाऱ्यांसाठी सुवर्णकाळ असणार आहे. व्यापारी महासंघाचे अध्यक्ष अजय शहा म्हणाले की, व्हिजन असलेला नेता सोबत असल्याने व्यापाऱ्यांना काळजी करण्याचे कारण नाही. बैठकीला मसिआचे उपाध्यक्ष अशोक बेडसे पाटील, व्यापारी महासंघाचे सचिव राजन हौजवाला, संजय कांकरिया, मदन जालनावाला, सुभाष दरख, हरिसिंग, हरिभाऊ पवार, राजकुमार भाटिया, राकेश सोनी, शिवशंकर स्वामी, अर्जुन राऊत, मुकेश मुगळे, विकास पाटणी, आदेशपालसिंग छाबडा आदींसह विविध व्यापारी संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.