शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

‘मराठी’साठी इंग्रजी शाळा बंद करणे चुकीचे

By admin | Updated: November 30, 2014 00:56 IST

लातूर : मराठी भाषा टिकविण्यासाठी इंग्रजी शाळा बंद करायला हव्यात. ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांचे हे वक्तव्य साहित्यकांचा वादविवाद आहे़

लातूर : मराठी भाषा टिकविण्यासाठी इंग्रजी शाळा बंद करायला हव्यात. ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांचे हे वक्तव्य साहित्यकांचा वादविवाद आहे़ इंग्रजी शाळा बंद करून मराठी टिकेल हे म्हणणे चुकीचे आहे़ मुलांचे करिअर आणि रोजगाराच्या संधी पाहता मराठीसह इंग्रजीशिवाय गत्यंतर नाही, असे ‘लोकमत’ने केलेल्या सर्व्हेक्षणातून पुढे आले आहे़ महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी आपल्या भाषणात इंग्रजी माध्यमांच्या शाळा बंद करा, मुलांना मातृभाषेतच स्वप्न पडायला हवीत, असे रोखठोक मत व्यक्त करून नव्या वादाला तोंड फोडले आहे़ या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने शहरातील नागरिकांचे सर्व्हेक्षणातून मत जाणून घेतले आहे़ आजच्या युगात इंग्रजी शिक्षण महत्वाचे असून इंग्रजी माध्यमांच्या शाळा बंद करण्याची मागणी करणे चुकीचे आहे़ मराठी भाषा टिकली पाहिजे़ परंतू इंग्रजीच्या शाळा बंद करून हे शक्य होणार नाही़ स्पर्धेच्या युगात मराठी शाळांनी आपली गुणवत्ता जोपासली पाहिजे़ शिवाय, इंग्रजी शाळांच्या बरोबरीने मराठीबरोबरच इंग्रजी शिक्षणावर भर द्यायला हवा, असे मत व्यक्त करण्यात आले आहे़ मराठीसाठी इंग्रजी शाळा बंद करणे या निर्णयाने मराठी वाढेल काय यावर शंभर नागरिकांची मते जाणून घेण्यात आली़ यापैकी ७३ नागरिकांनी इंग्रजी शाळा बंद करण्याचा निर्णय घेणे चुकीचे असल्याचे मत नोंदविले़ तर २७ नागरिकांनी मराठी टिकविण्यासाठी शासनाने हा निर्णय घ्यायला हवी, असे सांगितले़ इंग्रजी शाळांच्या अतिक्रमणामुळे मराठी व मराठी शाळा नामशेष होत आहेत का? या प्रश्नावर ५४ टक्के नागरिकांनी होकार दर्शविला तर २३ टक्के लोकांनी नकार दर्शविला असून २३ टक्के नागरिकांनी काही प्रमाणात म्हणून उत्तर नोंदविले आहे़ आपला मुलगा कोणत्या शाळेत शिकतो वा शिकावा असे आपणास वाटते? या प्रश्नावर ५१ टक्के नागरिकांनी मराठीला पसंती दिली असली तरी ४९ टक््के लोक आता इंग्रजीची कास धरल्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगत आहेत़ कोणत्या शाळेतून मुलांचे करिअर व्यवस्थित होईल, असे वाटते ? या प्रश्नावर ४९ टक्के पालक इंग्रजीतून करिअर करता येते़ विविध बँका, शासकीय कार्यालये, खाजगी व निमशासकीय कार्यालयात इंग्रजीतच सर्वप्रकारचे अर्ज व नवीन जीआर निघत असल्याने इंग्रजीचा अभ्यास गरजेचा आहे़ एकीकडे मराठी टिकविण्यासाठी चर्चा होत असताना दुसरीकडे मात्र राज्य शासनाचा बहुतांश कारभारच इंग्रजीतून चालत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे़ ५१ टक्के पालक मराठीतूनही करिअर होते, त्यासाठी मराठी गरजेची आहे, मत व्यक्त करीत आहेत़ मराठी वाचवा ही हाक कशासाठी वाटते? यावर ४५ टक्के पालक म्हणतात मराठी जगविण्यासाठी हा निर्णय योग्य आहे़ राजकीय खुर्च्या टिकविण्यासाठी मराठी भाषेचा कांगावा केला जात असल्याचे ३९ टक्के नागरिकांचे मत आहे़ तर १६ टक्के पालकांनी हा साहित्यकांचा वादविवाद असल्याचे मत नोंदविले आहे़