शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
3
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
4
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
5
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
6
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
7
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
8
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
9
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
10
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
11
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
12
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
13
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
14
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
15
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
16
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
17
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
18
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
19
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
20
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी

इसापूर प्रकल्पातून नऊ पाणीपाळ््या मिळणार

By admin | Updated: December 11, 2014 00:27 IST

नांदेड : रबी हंगामासाठी शेतकऱ्यांना पाणी मिळणार की नाही, ही संभ्रमावस्था असताना उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातंर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांना रबीसाठी चार तर उन्हाळी हंगामासाठी पाच पाणीपाळ््या देण्यात येणार

नांदेड : रबी हंगामासाठी शेतकऱ्यांना पाणी मिळणार की नाही, ही संभ्रमावस्था असताना उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातंर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांना रबीसाठी चार तर उन्हाळी हंगामासाठी पाच पाणीपाळ््या देण्यात येणार असल्यामुळे रबी, उन्हाळी हंगाम घेवू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. इसापूर प्रकल्पात रबी हंगाम २०१४-१५ च्या प्रारंभी १५ आॅक्टोबर २०१४ रोजी ७५८.१७ दलघमी म्हणजे ७८.६४ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरल्यानुसार रबी हंगाम व उन्हाळी हंगामासाठी एकूण नऊ पाणीपाळ््या देण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार रबी हंगामातील पिकांना पाणी मिळणार आहे. इसापूर प्रकल्पात सध्या ६४ टक्के पाणीसाठा उपलब्ध असून उपलब्ध पाणीसाठ्यातून पिण्याचे पाणी आरक्षीत करुन उर्वरित पाणी शेतकऱ्यांना रबी व उन्हाळी हंगामासाठी सिंचन विभागाकडून नियोजन करण्यात आले आहे. यामुळे खरिपात बुडालेल्या शेतकऱ्यांना रबीने तरी काही प्रमाणात दिलासा मिळण्याची आशा वाटत आहे. यासंदर्भात नियोजन केले आहे. इसापूर धरणातून मराठवाड्यातील नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातील गहू, ज्वारी, हरभरा, सूर्यफूल, केळी, हळद, ऊस, कापूस, तूर आदी पिकांसाठी पाणी सोडण्यात येत आहे. रबी हंगामातील चार रोटेशनपैकी २६ आॅक्टोबर २०१४ व २६ नोव्हेंबर २०१४ अशा दोन पाणीपाळ््या देण्यात आल्या आहेत. तर उर्वरित २६ डिसेंबर २०१४ व २६ जानेवारी २०१५ अशा आणखी दोन पाणीपाळ््या सोडण्यात येणार आहेत. यामुळे सिंचनाखाली असलेल्या भागातील बळीराजाला मात्र काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.यानंतर उन्हाळी हंगामाचेही संभाव्य नियोजन केले आहे. पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करुन उन्हाळी हंगामासाठी १ मार्च ते ३० जून यादरम्यान पाच पाणीपाळ््या देण्यात येणार आहेत. उन्हाळी पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांनाही याचा फायदा होईल. या निर्णयामुळे दुष्काळाने होरपळणाऱ्या जनतेला काही प्रमाणात दिलासा मिळेल़ (प्रतिनिधी)