शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा रुग्णालयात; 'हिटमॅन'ला अचानक काय झालं? Viral Video मुळे फॅन्स चिंतेत
2
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
3
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
4
GEN-Z च्या आंदोलनापुढे नेपाळ सरकार झुकले; सोशल मीडियावरील बंदी उठवली
5
केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
6
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५, नशिबाची साथ लाभेल, परदेशातून शुभ समाचार मिळतील
7
अग्रलेख: चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ; प्रश्नांकडे दुर्लक्ष ही धोरणात्मक चूक
8
नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार
9
विशेष लेख:बिहारचे मैदान तापले; सर्वांच्या अस्तित्वाची लढाई!
10
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक
11
लेख: माणूस १०० वर्षांपलीकडे आपले आयुष्य वाढवू शकतो का?
12
आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 
13
जीपच्या धडकेत तिघे ५० फूट फेकले, पती-पत्नीसह एक वर्षाचा चिमुकला ठार
14
Navratri 2025: तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रीला १४ सप्टेंबरपासून सुरुवात
15
संयम अन् सकारात्मकतेमुळे इथवर आलो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उलगडले गुपित
16
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे चकमक; दोन अतिरेकी ठार
17
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
18
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
19
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
20
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना

महापुरुषांमुळेच समाजाला दिशा मिळाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:06 IST

औरंगाबाद : महापुरुषांमुळेच समाजाला दिशा मिळाली, असे प्रतिपादन निवडणूक उपजिल्हाधिकारी भारत कदम यांनी शनिवारी येथे केले. ते मौलाना अबुल ...

औरंगाबाद : महापुरुषांमुळेच समाजाला दिशा मिळाली, असे प्रतिपादन निवडणूक उपजिल्हाधिकारी भारत कदम यांनी शनिवारी येथे केले.

ते मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्रात गुरू रविदास, संत सेवालाल, छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रसंत गाडगेबाबा आणि माता रमाई यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानमालेचे उद्घाटन करताना बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य रामदास वनारे होते. प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.

रात्र वैऱ्याची असल्यामुळे बहुजन समाजाने आता जागृत होण्याची गरज आहे व शिक्षणामुळे कायापालट होतो हे लक्षात घेऊन शिक्षणाची कास धरली पाहिजे, असे आवाहन कदम यांनी यावेळी केले. स्वागताध्यक्ष प्रा.डॉ. गोपाल बछिरे यांनी प्रास्ताविक केले.

जयश्री सोनकवडे यांचे भाषण झाले. रतिलाल कुचे व अनिल अंभोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. मानवता सेवा संघ व गुरू रविदास जयंती केंद्रीय उत्सव महासंघाच्या वतीने या व्याख्यानमालेचे आयोजन केले होते. दिवसभर चाललेल्या या व्याख्यानमालेत प्रा. श्याम सुडे यांचे रविदासांचे मानवतावादी व विज्ञानवादी विचार व कार्य या विषयावर व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी सुभाष बरोदे होते. संत रविदास, कबीर, तुकाराम महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज, गाडगेबाबा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची कूळ एकच होती, हे लक्षात घ्या, असे ते म्हणाले.

शिवाजी महाराजांचे बहुजन हितैषी कार्य या विषयावर प्रा. डॉ. प्रल्हाद लुलेकर यांचे व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी डी. टी. शिंपणे होते. प्राचार्य हिरालाल राठोड यांनी सेवालाल महाराजांचे अंधश्रद्धा विषयीचे विचार व कार्य या विषयाची मांडणी केली. अध्यक्षस्थानी प्राध्यापक डॉ. युवराज गहराव होते, तर गाडगेबाबा यांचे अंधश्रद्धा निर्मूलन व बहुजन जागृतीचे कार्य या विषयावर डॉ. संजय पाईकराव यांनी आपले विचार मांडले. अध्यक्षस्थानी डॉक्टर पी. आर. भगुरे होते. प्रा. डॉ. प्रतिभा अहिरे यांनी ''माता रमाईंचा त्याग व संघर्ष'' या विषयावर सुरेख मांडणी केली. अध्यक्षस्थानी ॲड. सुखलाल पसरटे होते. रमेश डोंगरे, रमेश विठोरे, प्रमिला चिंचोले, गौराबाई जाटवे, कमल धामणे, राधा शिंगणे, प्रवीण बोराडे, मदन भगुरे, भगीरथ धामुणे, सीताराम पंढरे, आदींनी या व्याख्यानमालेच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.