शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

दोन मिनिटे लागली एका पदवीधरच्या मतदानाला

By | Updated: December 3, 2020 04:10 IST

औरंगाबाद : शहरात पदवीधर मतदारांचा उत्साह दिसून आला. शहरातील ११७ मतदान केंद्रांवर एकूण मतदानाच्या अंदाजे ६५ टक्के मतदानाची नोंद ...

औरंगाबाद : शहरात पदवीधर मतदारांचा उत्साह दिसून आला. शहरातील ११७ मतदान केंद्रांवर एकूण मतदानाच्या अंदाजे ६५ टक्के मतदानाची नोंद झाली. सकाळी ८ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाल्यानंतर शहरातील बहुतांश केंद्रांवर पदवीधर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. एका मतदाराला मतदानासाठी २ मिनिटांचा अवधी लागत होता. त्यामुळे सकाळच्या सत्रात मतदान संथ गतीने सुरू होते. दुपारनंतर मतदानाला वेग आला. दरम्यानच्या काळात पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या पदवीधर मतदारांची केंद्रांवर गर्दी होत गेली. केंद्रावर रांगेत उभ्या असलेल्या अनेक ज्येष्ठ मतदारांना नवमतदारांनी मतदान कसे करावे, मत बाद कसे होते याची माहिती विचारून मतदान केले.

शहरात गजानन महाराज मंदिर परिसर, हडको, सिडको, मुकुंदवाडी, जिल्हा परिषद, औरंगपुरा, उस्मानपुरा, चिकलठाणा, पुंडलिकनगर परिसर, जवाहर कॉलनी, अजबनगर, हर्सूल, नागसेनवन, लेबर कॉलनी, एन-७ आदी परिसरात मतदान केंद्रे होती. सर्वच केंद्रांवर मतदारांचा उत्साह होता. वृद्ध, तरुण, मध्यमवयीन मतदारांची गर्दी मतदान केंद्रांवर होती. ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेद्वारे हे मतदान होते. मतपत्रिकेवर क्रमांक लिहिणे, तत्पूर्वी घडी मारून मतपत्रिका घेणे, मत नोंदविल्यावर तशीच घडी मारून मतपेटीत टाकणे या प्रक्रियेमुळे प्रत्येकाला उशीर लागला.

दुपारनंतर मोबाईल बंदीचा आदेश

मतदान करताना, पहिल्या पसंतीचे मत नोंदविताना फोटो काढून ते सोशल मीडियावर टाकण्याच्या प्रकारामुळे दुपारनंतर शहरात आणि ग्रामीण भागात मतदान केंद्रांच्या आत मोबाईल नेण्यास बंदीचे आदेश प्रशासनाने जारी केले. विभागातील काही जिल्ह्यांतील व्हिडिओदेखील सोशल मीडियातून व्हायरल झाले होते.

सर्वच केंद्रांवर राजकीय नेत्यांची गर्दी

कडा ऑफिस येथील मतदान केंद्रावर भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी भेट देऊन आढावा घेतला. भाजपकडून खा. डॉ. भागवत कराड, आ. अतुल सावे, शिवसेना आ. अंबादास दानवे, विधानसभा संघटक राजू वैद्य, विश्वनाथ स्वामी यांच्यासह छाया जंगले, कदीर मौलाना आदींनी मतदानाचा आढावा घेतला.

स्वयंस्फूर्तीने मतदान केंद्रांवर

इतर निवडणुकींमध्ये पक्षाची यंत्रणा मतदार बाहेर काढण्यासाठी लावलेली असते; परंतु यावेळी मतदार स्वत: केंद्रांवर पोहोचले. स्वयंस्फूर्तीने मतदार आल्यामुळे मतदानाचा टक्का वाढत गेला. हायटेक प्रचारामुळे प्रत्येक मतदाराला व्हॉटस्‌अ‍ॅपद्वारे पोलिंग चीट देण्यात आल्याने मतदार उमदेवारांच्या तंबूवर जाण्याऐवजी थेट मतदान केंद्रांत गेले.