शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

जिल्हाभरात पाऊस बरसला, पिके आयसीयुतून जनरल वॉर्डात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:02 IST

औरंगाबाद : तब्बल वीस दिवसांच्या खंडानंतर जिल्ह्यातील अनेक भागात सोमवारी पावसाच्या सरी कोसळल्या. पावसाच्या खंडानंतर जोमातून कोमात गेलेल्या पिकांना ...

औरंगाबाद : तब्बल वीस दिवसांच्या खंडानंतर जिल्ह्यातील अनेक भागात सोमवारी पावसाच्या सरी कोसळल्या. पावसाच्या खंडानंतर जोमातून कोमात गेलेल्या पिकांना मोठा आधार मिळाला आहे. त्यामुळे पिके आयुसीयुतून आता जनरल वॉर्डात दाखल झाली आहेत. मात्र, उत्पादनात मोठी घट होणार आहे. हलक्या जमिनीतील पिकांनी अगोदरच माना टाकून रामराम केला. त्यामुळे कोसळला तर खरा, पण थोडा उशीरच झाला. आठ दहा दिवसांपूर्वीच कोसळला असता, तर पिकांना तडाखा बसला नसता, असे मत शेतकरी व्यक्त करीत आहेत.

पैठण तालुक्यात पाच महसुली मंडलात अतिवृष्टी

पैठण : तालुक्यात सोमवारी पाच महसूल मंडलात अतिवृष्टीची नोंद झाली. तालुक्यात धो-धो बरसल्याने महत्त्वाच्या नद्या, नाले व ओढ्यांना पूर आला. वीरभद्रा नदीला आलेल्या महापुराने गेल्या २४ तासांपासून नांदर गावाचा संपर्क तुटला आहे. शेतशिवारात व उभ्या पिकांत पाणीच पाणी साचले आहे.

सोमवारी दुपारनंतर तालुक्यात पावसाला प्रारंभ झाला. बालानगर, आडूळ, पाचोड, विहामांडवा व नांदर महसूल मंडलात अतिवृष्टी झाल्याने तालुक्यातील वीरभ्रदा या प्रमुख नदीला महापूर आला होता. यामुळे नांदर या मोठ्या गावाचा संपर्क मंगळवारी सकाळी १० वाजेपर्यंत तुटला होता. तसेच अनेक गावातील रस्ते पाण्याखाली गेल्याने संपर्क तुटले होते. काहींच्या उभ्या पिकात पाणी साचल्याने पिकांचे नुकसानही झाले आहे.

मंडलनिहाय सोमवारी झालेला पाऊस

पैठण २५ मि.मी., पिंपळवाडी पिराची ३८ मि.मी., बिडकीन १० मि.मी., ढोरकीन ४४ मि.मी., बालानगर ८५ मि.मी.,

नांदर ८१ मि.मी., आडूळ ६६ मि.मी., पाचोड ७५ मि.मी., लोहगाव १५ मि.मी., विहामांडवा ९३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यात आजपर्यंत एकूण पाऊस ३९६४ मि.मी. झाला असल्याचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी सांगितले.

फोटो :