शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

जिल्हाभरात पाऊस बरसला, पिके आयसीयुतून जनरल वॉर्डात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:02 IST

औरंगाबाद : तब्बल वीस दिवसांच्या खंडानंतर जिल्ह्यातील अनेक भागात सोमवारी पावसाच्या सरी कोसळल्या. पावसाच्या खंडानंतर जोमातून कोमात गेलेल्या पिकांना ...

औरंगाबाद : तब्बल वीस दिवसांच्या खंडानंतर जिल्ह्यातील अनेक भागात सोमवारी पावसाच्या सरी कोसळल्या. पावसाच्या खंडानंतर जोमातून कोमात गेलेल्या पिकांना मोठा आधार मिळाला आहे. त्यामुळे पिके आयुसीयुतून आता जनरल वॉर्डात दाखल झाली आहेत. मात्र, उत्पादनात मोठी घट होणार आहे. हलक्या जमिनीतील पिकांनी अगोदरच माना टाकून रामराम केला. त्यामुळे कोसळला तर खरा, पण थोडा उशीरच झाला. आठ दहा दिवसांपूर्वीच कोसळला असता, तर पिकांना तडाखा बसला नसता, असे मत शेतकरी व्यक्त करीत आहेत.

पैठण तालुक्यात पाच महसुली मंडलात अतिवृष्टी

पैठण : तालुक्यात सोमवारी पाच महसूल मंडलात अतिवृष्टीची नोंद झाली. तालुक्यात धो-धो बरसल्याने महत्त्वाच्या नद्या, नाले व ओढ्यांना पूर आला. वीरभद्रा नदीला आलेल्या महापुराने गेल्या २४ तासांपासून नांदर गावाचा संपर्क तुटला आहे. शेतशिवारात व उभ्या पिकांत पाणीच पाणी साचले आहे.

सोमवारी दुपारनंतर तालुक्यात पावसाला प्रारंभ झाला. बालानगर, आडूळ, पाचोड, विहामांडवा व नांदर महसूल मंडलात अतिवृष्टी झाल्याने तालुक्यातील वीरभ्रदा या प्रमुख नदीला महापूर आला होता. यामुळे नांदर या मोठ्या गावाचा संपर्क मंगळवारी सकाळी १० वाजेपर्यंत तुटला होता. तसेच अनेक गावातील रस्ते पाण्याखाली गेल्याने संपर्क तुटले होते. काहींच्या उभ्या पिकात पाणी साचल्याने पिकांचे नुकसानही झाले आहे.

मंडलनिहाय सोमवारी झालेला पाऊस

पैठण २५ मि.मी., पिंपळवाडी पिराची ३८ मि.मी., बिडकीन १० मि.मी., ढोरकीन ४४ मि.मी., बालानगर ८५ मि.मी.,

नांदर ८१ मि.मी., आडूळ ६६ मि.मी., पाचोड ७५ मि.मी., लोहगाव १५ मि.मी., विहामांडवा ९३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यात आजपर्यंत एकूण पाऊस ३९६४ मि.मी. झाला असल्याचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी सांगितले.

फोटो :