शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धी महामार्ग होऊ नये ही मागणी नाही- उद्धव ठाकरे

By admin | Updated: June 26, 2017 12:58 IST

समृद्धी महामार्ग होऊ नये ही मागणी नाही, पण शेतकऱ्यांची काय मागणी आहे हे समजून घ्यावं लागेल.

ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 26-  समृद्धी महामार्ग होऊ नये ही मागणी नाही, पण शेतकऱ्यांची काय मागणी आहे हे समजून घ्यावं लागेल. काही शेतकरी जमीन न देण्याच्या मानसिकतेमध्ये आहेत. तर काही शेतकरी त्यांच्या जमिनी देणार आहेत. या महामार्गासाठी सुपीक जमीनी जात आहे. त्यामुळे याबाबत अभ्यास करण्यासाठी मुंबईला बैठक घेतली जाईल, असं शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी सांगितलं आहे. समृद्धी महामार्ग विरोधात शेतकऱ्यांशी चर्चा करणार त्याचा अभ्यास करणार,  महामार्गाचे टेंडर निघत आहे, भूसंपादन रक्कम देण्यासाठी अंतिम मसूदा तयार आहे. हे थांबविण्याबाबत सध्या तरी काही निर्णय नाही. पण मंत्री एकनाथ शिंदे व महामार्ग बाधित शेतकरी यांच्यात बैठक घेणार असल्याचं पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी सांगितलं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज महामार्ग बाधित शेतकरींशी पळशी व माळीवाडा येथे संवाद साधला. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरे  २५ जूनपासून नाशिक आणि नगरच्या दौऱ्यावर आहेत. 
दरम्यान आज सकाळी उद्धव ठाकरे  यांनी औरंगाबादमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी 40 लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाल्याचं मोजून घेणार, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी सरकारला दिला. तसेच वेळप्रसंगी शिवसेना समृद्धी महामार्ग विरोधात आंदोलन करील असा इशाराही त्यांनी दिला. कर्जमाफी ही फॅशन आहे, भाव दिला तरी रडतात साले, मोबाईल बिल भरण्यासाठी पैसे असतात पण कर्ज फेडायला तयार नसतात. असं म्हणून शेतकऱ्यांची हेटाळणी करणाऱ्यांना झुकविले आणि कर्जमाफी करायला लावली, असंही ते म्हणाले आहेत. 
तसंच नगर, नाशिकमधील शेतकरी अद्यापही त्रस्त आहेत त्याबाबत अभ्यासगट स्थापन करण्याच्या सरकारला सूचना देणार असल्याचं उद्धव ठाकरे या पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत. तसंच कर्जमाफीच्या आंदोलनात ज्या प्रमाणे शिवसेना कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला त्याच प्रकारे प्रत्येकाने आपापल्या गावातील शेतकऱ्यांच्या परिस्थितीची माहिती उपलब्ध करून द्यावी, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.  शेतकरी आणि शिवसेना एकत्र आल्याने शेतकऱ्यांना कर्जमाफी शक्य झाली.  शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठिशी उभी राहिली आणि यापुढेसुद्धा राहिलं. शिवसेनेकडून शेतकऱ्यांच्या सूचनांचा आणि मागण्यांचा पाठपुरावा शिवसेना करणार आहे, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हंटलं आहे.  
 कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केलं पण या आंदोलनादरम्यान पुणतांब्यातील ज्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत ते तातडीने मागे घ्या, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे. तसंच  नियमितपणे कर्ज परत फेडणाऱ्या शेतकऱ्यांना जी मदत मिळणार आहे त्या मदतीत वाढ केली जावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. शिवसेनेच्या पाठीशी शेतकरी आहेत त्यामुळे कर्जमुक्तीला फॅशन म्हणणाऱ्यांना कर्जमाफी करावीच लागली, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांना टोला लगावला आहे. जून 2016 पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं आहे त्या शेतकऱ्यांचं कर्ज राज्य सरकारने माफ केलं आहे पण आता जून 2017 पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं आहे त्यांचं कर्ज माफ करावं, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.
औरंगाबादमधील संवाद यात्रेनंतर 29 जूनपासून उद्धव ठाकरे मराठवाड्याचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या सूचनांची आणि मागण्यांची माहिती घेतली जाणार आहे.