शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
2
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
3
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
4
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
5
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
6
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
7
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
8
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
9
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
10
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
11
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
12
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 
13
नेपाळमध्ये निदर्शने, सत्तापालट सुरू असतानाच आता पाकिस्तानच्या या प्रांतात बंद, जनता संतापली
14
'सरकारचे कौतुक, पण धोका दिल्यास सोडणार नाही': मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
15
भारताबाबत ट्रेड डीलवर ट्रम्प यांची एक पोस्ट आणि 'या' शेअर्समध्ये सुस्साट तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
भारत-नेपाळ सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न; नेपाळच्या तुरुंगातून पळालेल्या ५ कैद्यांचा अटक
17
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
18
सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना
19
"सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण हाच त्यांचा खरा चेहरा...", 'लालबागचा राजा' मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने सुनावलं
20
संकष्ट चतुर्थी 2025: पितृपक्षातील संकष्टीला चंद्रोदय कधी? पहा गणेश पूजन विधी आणि शुभ मुहूर्त

‘म्युकरमायकोसिस’मुळे डोळे काढावेच लागतात, हा गैरसमज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:02 IST

औरंगाबाद : ‘म्युकरमायकोसिस’ झाला म्हणजे प्रत्येक रुग्णाचे डोळे काढावे लागतात, हा समज चुकीचा आहे. लवकर निदान झाले, तर डोळे ...

औरंगाबाद : ‘म्युकरमायकोसिस’ झाला म्हणजे प्रत्येक रुग्णाचे डोळे काढावे लागतात, हा समज चुकीचा आहे. लवकर निदान झाले, तर डोळे काढण्याची वेळच येत नाही. घाटीतील तज्ज्ञांनी ३३ जणांचे डोळे वाचविले आहेत.

म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य जंतूमुळे होणाऱ्या आजाराचे घाटीत ९३ रुग्ण भरती आहेत. घाटीत आतापर्यंत ५५ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. कान, नाक, घसा विभागप्रमुख डाॅ. सुनील देशमुख, डाॅ. वसंत पवार, डाॅ. महेंद्र कटरे, डाॅ. शैलेश निकम यांच्या पथकाने ५० एण्डोस्कोपिक सर्जरी केल्या आहेत. नेत्र विभागप्रमुख डाॅ. वर्षा नांदेडकर, नेत्रतज्ज्ञ व नोडल ऑफिसर डाॅ. शुभा घोणसीकर आणि पथकाने ३३ जणांचे डोळे आतापर्यंत वाचविले आहेत. ५ जणांमध्ये हा आजार जास्त पसरलेला होता. त्यांच्यावर अधिक विस्तृत शस्त्रक्रिया करण्यात आली. अधिष्ठाता डाॅ. कानन येळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली कान, नाक, घसातज्ज्ञ, नेत्रतज्ज्ञ, औषधवैद्यकतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ रुग्णांसाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहे. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी साखरेचे प्रमाण आटोक्यात ठेवावे, स्वच्छ मास्क वापरावा, तसेच धुळीच्या ठिकाणी जाणे टाळणे आणि कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करता कामा नये, असे आवाहन घाटीतील तज्ज्ञांनी केले आहे.

आधी नाकाची शस्त्रक्रिया

ज्यांना म्युकरमायकोसिसचे लवकर निदान होते, त्यांची आधी नाकाची शस्त्रक्रिया केली जाते. जर डोळ्याभोवती बुरशी वाढणे सुरू झाले, तर त्या जागी इंजेक्शन दिले जाते. यातून डोळ्याचा संसर्ग आटोक्यात येण्यास मदत होते. काही रुग्णांमध्ये डोळ्याची नस आजारामुळे बंद झालेली आढळते. अशांमध्ये डोळे काढण्याची शस्त्रक्रिया करण्याची गरज नसते, असे घाटीतील तज्ज्ञांनी सांगितले.