शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
3
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
4
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
5
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
6
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
7
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
8
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
9
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
10
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
11
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
12
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
13
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
14
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
15
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
16
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
17
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
18
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
19
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
20
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार

‘म्युकरमायकोसिस’मुळे डोळे काढावेच लागतात, हा गैरसमज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:02 IST

औरंगाबाद : ‘म्युकरमायकोसिस’ झाला म्हणजे प्रत्येक रुग्णाचे डोळे काढावे लागतात, हा समज चुकीचा आहे. लवकर निदान झाले, तर डोळे ...

औरंगाबाद : ‘म्युकरमायकोसिस’ झाला म्हणजे प्रत्येक रुग्णाचे डोळे काढावे लागतात, हा समज चुकीचा आहे. लवकर निदान झाले, तर डोळे काढण्याची वेळच येत नाही. घाटीतील तज्ज्ञांनी ३३ जणांचे डोळे वाचविले आहेत.

म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य जंतूमुळे होणाऱ्या आजाराचे घाटीत ९३ रुग्ण भरती आहेत. घाटीत आतापर्यंत ५५ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. कान, नाक, घसा विभागप्रमुख डाॅ. सुनील देशमुख, डाॅ. वसंत पवार, डाॅ. महेंद्र कटरे, डाॅ. शैलेश निकम यांच्या पथकाने ५० एण्डोस्कोपिक सर्जरी केल्या आहेत. नेत्र विभागप्रमुख डाॅ. वर्षा नांदेडकर, नेत्रतज्ज्ञ व नोडल ऑफिसर डाॅ. शुभा घोणसीकर आणि पथकाने ३३ जणांचे डोळे आतापर्यंत वाचविले आहेत. ५ जणांमध्ये हा आजार जास्त पसरलेला होता. त्यांच्यावर अधिक विस्तृत शस्त्रक्रिया करण्यात आली. अधिष्ठाता डाॅ. कानन येळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली कान, नाक, घसातज्ज्ञ, नेत्रतज्ज्ञ, औषधवैद्यकतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ रुग्णांसाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहे. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी साखरेचे प्रमाण आटोक्यात ठेवावे, स्वच्छ मास्क वापरावा, तसेच धुळीच्या ठिकाणी जाणे टाळणे आणि कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करता कामा नये, असे आवाहन घाटीतील तज्ज्ञांनी केले आहे.

आधी नाकाची शस्त्रक्रिया

ज्यांना म्युकरमायकोसिसचे लवकर निदान होते, त्यांची आधी नाकाची शस्त्रक्रिया केली जाते. जर डोळ्याभोवती बुरशी वाढणे सुरू झाले, तर त्या जागी इंजेक्शन दिले जाते. यातून डोळ्याचा संसर्ग आटोक्यात येण्यास मदत होते. काही रुग्णांमध्ये डोळ्याची नस आजारामुळे बंद झालेली आढळते. अशांमध्ये डोळे काढण्याची शस्त्रक्रिया करण्याची गरज नसते, असे घाटीतील तज्ज्ञांनी सांगितले.