शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

जमिनी सांभाळणे हेच मोठे आव्हान

By admin | Updated: July 15, 2015 00:40 IST

औरंगाबाद : क्षेत्रफळाने महाराष्ट्रात सर्वांत मोठी बाजार समिती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबाद तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक सोमवारी पार पडली.

औरंगाबाद : क्षेत्रफळाने महाराष्ट्रात सर्वांत मोठी बाजार समिती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबाद तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक सोमवारी पार पडली. १८ जणांचे नवीन संचालक मंडळ निवडून आले. त्यांच्या समोर बाजार समितीची ७३ हे. २८ आर एवढी जमीन सांभाळणे, अतिक्रमणापासून वाचविणे, न्यायालयीन वादात अडकलेल्या २० हे. ८३ आर जमिनी मिळविण्यासाठी प्रयत्न करणे आणि ज्यामुळे बाजार समितीची विकासकामे रखडली आहेत तो मास्टर प्लॅन महानगरपालिकेकडून मंजूर करून घेणे हे मोठे आव्हान असणार आहे. यासाठी संचालक मंडळाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. बाजार समितीवर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे पुरस्कृत ‘सहकारी संस्था विकास पॅनल’ असो की, माजी आ. कल्याण काळे पुरस्कृत ‘शेतकरी सहकारी विकास पॅनल’ कोणाचाही सभापती झाला तरीही त्यांच्यासमोर बाजार समितीची जमीन सांभाळणे हे मोठे आव्हान असणार आहे. ११ हे. ५९ आर जमीन अजूनही बाजार समितीच्या ताब्यात मिळाली नाही. या जाधववाडी व हर्सूल येथील जमिनीचा वाद न्यायालयात सुरू आहे. या जमिनी मिळवून घेण्यासाठी सभापती व संचालकांना सर्वाधिक प्रयत्न करावे लागणार आहेत. २००९ मध्ये बाजार समितीचा मास्टर प्लॅन तयार झाला. मात्र, ६ वर्षे झाली; पण अजूनही त्यास महानगरपालिकेने मंजुरी दिली नाही. प्रत्यक्षात कोणत्याही मास्टर प्लॅनला ६ महिन्यांचा आत मंजुरी देणे अपेक्षित होते; पण मनपाने मंजुरी न दिल्याने अखेर बाजार समितीने मनपाविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. मास्टर प्लॅनला मंजुरी न मिळाल्याने बाजार समिती परिसरातील विकासकामांवर मोठा परिणाम झाला आहे. महानगरपालिकेकडून मास्टर प्लॅन मंजूर करून घेण्यासाठी नवीन सभापती व संचालकांकडे राजकीय इच्छाशक्तीची आवश्यकता आहे. अखेर कोणाच्या पॅनलचा सभापती होतो, यावर बाजार समितीच्या विकासाची दिशा ठरणार आहे. मोंढा स्थलांतरावरही निर्णय घ्यावा लागणारनवीन सभापती व संचालक मंडळाला ‘राजकारण’ बाजूला ठेवून मोंढा स्थलांतराचा प्रश्न सोडवावा लागणार आहे. मागील १७ वर्षांपासून हा विषय अनेकदा ऐरणीवर आला; पण स्थलांतर झाले नाही. पुणे येथील कृषी पणन मंडळाने दिलेल्या सूचनेनुसार बाजार समितीने पाच वर्षांचा विकास आराखडा तयार केला आहे. त्यानुसारच नवीन संचालक मंडळाला बाजार समितीत विकास करावा लागणार आहे. २०१३-२०१४ मध्ये विकास आराखडा तयार करण्यात आला; पण त्यातील अनेक प्रस्तावांना अजूनही मंजुरी मिळाली नाही. बाजार समितीकडे २०१८ पर्यंतचा विकास आराखडा तयार आहे. प्रस्ताव मंजूर करून तो योग्य पद्धतीने राबविण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती वापरावी लागणार आहे.बाजार समितीच्या २२ याचिका सध्या वेगवेगळ्या न्यायालयांत प्रलंबित आहेत. यात बाजार समितीच्या मालमत्तेबाबत, गाळे, जागा संपादनाबाबत तसेच मास्टर प्लॅनला मंजुरी मिळण्याबाबतच्या याचिका आहेत. २०१३-२०१४ मध्ये ६६ याचिका न्यायालयात दाखल होत्या. न्यायालयात सर्वाधिक याचिका दाखल असणारी बाजार समिती म्हणूनही जाधववाडीतील बाजार समितीचा उल्लेख केला जात असे. मात्र, मागील वर्षभरात अनेक याचिका निकाली निघाल्या आहेत.