शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
4
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
5
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
6
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
7
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
8
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
9
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
10
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
11
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
12
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
13
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
14
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
15
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
16
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
17
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
18
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
19
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
20
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?

जमिनी सांभाळणे हेच मोठे आव्हान

By admin | Updated: July 15, 2015 00:40 IST

औरंगाबाद : क्षेत्रफळाने महाराष्ट्रात सर्वांत मोठी बाजार समिती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबाद तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक सोमवारी पार पडली.

औरंगाबाद : क्षेत्रफळाने महाराष्ट्रात सर्वांत मोठी बाजार समिती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबाद तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक सोमवारी पार पडली. १८ जणांचे नवीन संचालक मंडळ निवडून आले. त्यांच्या समोर बाजार समितीची ७३ हे. २८ आर एवढी जमीन सांभाळणे, अतिक्रमणापासून वाचविणे, न्यायालयीन वादात अडकलेल्या २० हे. ८३ आर जमिनी मिळविण्यासाठी प्रयत्न करणे आणि ज्यामुळे बाजार समितीची विकासकामे रखडली आहेत तो मास्टर प्लॅन महानगरपालिकेकडून मंजूर करून घेणे हे मोठे आव्हान असणार आहे. यासाठी संचालक मंडळाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. बाजार समितीवर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे पुरस्कृत ‘सहकारी संस्था विकास पॅनल’ असो की, माजी आ. कल्याण काळे पुरस्कृत ‘शेतकरी सहकारी विकास पॅनल’ कोणाचाही सभापती झाला तरीही त्यांच्यासमोर बाजार समितीची जमीन सांभाळणे हे मोठे आव्हान असणार आहे. ११ हे. ५९ आर जमीन अजूनही बाजार समितीच्या ताब्यात मिळाली नाही. या जाधववाडी व हर्सूल येथील जमिनीचा वाद न्यायालयात सुरू आहे. या जमिनी मिळवून घेण्यासाठी सभापती व संचालकांना सर्वाधिक प्रयत्न करावे लागणार आहेत. २००९ मध्ये बाजार समितीचा मास्टर प्लॅन तयार झाला. मात्र, ६ वर्षे झाली; पण अजूनही त्यास महानगरपालिकेने मंजुरी दिली नाही. प्रत्यक्षात कोणत्याही मास्टर प्लॅनला ६ महिन्यांचा आत मंजुरी देणे अपेक्षित होते; पण मनपाने मंजुरी न दिल्याने अखेर बाजार समितीने मनपाविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. मास्टर प्लॅनला मंजुरी न मिळाल्याने बाजार समिती परिसरातील विकासकामांवर मोठा परिणाम झाला आहे. महानगरपालिकेकडून मास्टर प्लॅन मंजूर करून घेण्यासाठी नवीन सभापती व संचालकांकडे राजकीय इच्छाशक्तीची आवश्यकता आहे. अखेर कोणाच्या पॅनलचा सभापती होतो, यावर बाजार समितीच्या विकासाची दिशा ठरणार आहे. मोंढा स्थलांतरावरही निर्णय घ्यावा लागणारनवीन सभापती व संचालक मंडळाला ‘राजकारण’ बाजूला ठेवून मोंढा स्थलांतराचा प्रश्न सोडवावा लागणार आहे. मागील १७ वर्षांपासून हा विषय अनेकदा ऐरणीवर आला; पण स्थलांतर झाले नाही. पुणे येथील कृषी पणन मंडळाने दिलेल्या सूचनेनुसार बाजार समितीने पाच वर्षांचा विकास आराखडा तयार केला आहे. त्यानुसारच नवीन संचालक मंडळाला बाजार समितीत विकास करावा लागणार आहे. २०१३-२०१४ मध्ये विकास आराखडा तयार करण्यात आला; पण त्यातील अनेक प्रस्तावांना अजूनही मंजुरी मिळाली नाही. बाजार समितीकडे २०१८ पर्यंतचा विकास आराखडा तयार आहे. प्रस्ताव मंजूर करून तो योग्य पद्धतीने राबविण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती वापरावी लागणार आहे.बाजार समितीच्या २२ याचिका सध्या वेगवेगळ्या न्यायालयांत प्रलंबित आहेत. यात बाजार समितीच्या मालमत्तेबाबत, गाळे, जागा संपादनाबाबत तसेच मास्टर प्लॅनला मंजुरी मिळण्याबाबतच्या याचिका आहेत. २०१३-२०१४ मध्ये ६६ याचिका न्यायालयात दाखल होत्या. न्यायालयात सर्वाधिक याचिका दाखल असणारी बाजार समिती म्हणूनही जाधववाडीतील बाजार समितीचा उल्लेख केला जात असे. मात्र, मागील वर्षभरात अनेक याचिका निकाली निघाल्या आहेत.