शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादचे इनामी जमिनीचे प्रकरण अडगळीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 12:26 IST

शासनाने याप्रकरणी अद्याप काही निर्णय घेतलेला नाही. शासन दरबारी हे प्रकरण अडगळीला पडले असून, या प्रकरणांशी निगडित उपजिल्हाधिकार्‍यांवर निलंबनाची कारवाई मात्र झालेली आहे.

ठळक मुद्दे कुळ व इनामी जमिनींच्या व्यवहारात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचे डिसेंबर २०१७ मध्ये उघडकीस आले.तीन महिन्यांपासून २२५ पैकी ११८ प्रकरणांचा शासनाकडे पाठविलेला चौकशी अहवाल अडगळीला पडला आहे.

औरंगाबाद : जिल्ह्यात कुळ व इनामी जमिनींच्या व्यवहारात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचे डिसेंबर २०१७ मध्ये उघडकीस आले. मात्र; तीन महिन्यांपासून २२५ पैकी ११८ प्रकरणांचा शासनाकडे पाठविलेला चौकशी अहवाल अडगळीला पडला आहे.

शासनाने याप्रकरणी अद्याप काही निर्णय घेतलेला नाही. शासन दरबारी हे प्रकरण अडगळीला पडले असून, या प्रकरणांशी निगडित उपजिल्हाधिकार्‍यांवर निलंबनाची कारवाई मात्र झालेली आहे. तीन महिन्यांपूर्वी या प्रकरणात विभागीय प्रशासनाने शासनाकडे अहवाल पाठविला आहे. उपजिल्हाधिकार्‍यांना निलंबनाला सामोरे जावे लागले; परंतु या जमिनींच्या व्यवहारांना स्थगिती देण्यासाठी शासनाने काहीही कारवाई केलेली नाही. महसूल सचिवांकडे सदरील प्रकरणाची माहिती देऊन तीन महिन्यांचा काळ लोटला आहे. अद्याप त्यावर निर्णय न झाल्यामुळे चौकशी समितीने घेतलेली मेहनत वाया जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

कुळ व इनामी जमिनींच्या व्यवहारात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली असून, त्या जमिनी लाटण्यासाठी शहरातील काही राजकीय पक्षाशी निगडित नेत्यांनी पुढाकार घेतल्याचे समोर आले होते. गायरान, महारहाडोळा व कुळाच्या शेकडो एकर जमीन घेण्यासाठी संबंधित नेत्यांनी मूळ जमीनधारकांच्या आडून जिल्हा प्रशासनाकडे परवानगी मागितली होती. जमीन खरेदी-विक्रीस परवानगी देताना कागदपत्रांची शहानिशा न करता उपजिल्हाधिकार्‍यांनी परवानगी दिल्यामुळे त्यांचे निलंबन करण्यात आले तर निवासी उपजिल्हाधिकार्‍यांनी डीएमआयसीलगत असलेल्या १७ गटांमधील जमिनींच्या परवानग्या दिल्यामुळे त्यांच्यावरही विभागीय आयुक्तांनी निलंबनाची कारवाई केली. यानंतर आयुक्तांनी अहवाल शासनाकडे पाठविला. डीएमआयसीलगतच्या जमिनींच्या खरेदी-विक्रीच्या परवानग्या कुणाला दिल्या हे चार महिन्यांपासून समोर आलेले नाही. हिवाळी अधिवेशनात हे प्रकरण चव्हाट्यावर आल्यावर मागील चार महिन्यांपासून व्यवहारांना बे्रक लावण्याचा निर्णय शासनाने घेतला नाही.

१०० एकरपेक्षा अधिक जमीन१०० एकरांहून अधिक जमिनी लाटण्याचा व्यवहार या प्रकरणात झाल्याची चर्चा डिसेंबर २०१७ पासून सुरू आहे. शासनाचा २२ लाख रुपयांचा महसूलही बुडाला आहे. तो कधी वसूल करणार यावर विभागीय तथा जिल्हा प्रशासन काही बोलण्यास तयार नाही. शासनाकडे बोट दाखवून सर्व प्रशासन प्रमुख हात वर करीत आहेत.

टॅग्स :District Collector Aurangabadजिल्हाधिकारी औरंगाबादAurangabadऔरंगाबादTaxकर