शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

औरंगाबादचे इनामी जमिनीचे प्रकरण अडगळीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 12:26 IST

शासनाने याप्रकरणी अद्याप काही निर्णय घेतलेला नाही. शासन दरबारी हे प्रकरण अडगळीला पडले असून, या प्रकरणांशी निगडित उपजिल्हाधिकार्‍यांवर निलंबनाची कारवाई मात्र झालेली आहे.

ठळक मुद्दे कुळ व इनामी जमिनींच्या व्यवहारात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचे डिसेंबर २०१७ मध्ये उघडकीस आले.तीन महिन्यांपासून २२५ पैकी ११८ प्रकरणांचा शासनाकडे पाठविलेला चौकशी अहवाल अडगळीला पडला आहे.

औरंगाबाद : जिल्ह्यात कुळ व इनामी जमिनींच्या व्यवहारात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचे डिसेंबर २०१७ मध्ये उघडकीस आले. मात्र; तीन महिन्यांपासून २२५ पैकी ११८ प्रकरणांचा शासनाकडे पाठविलेला चौकशी अहवाल अडगळीला पडला आहे.

शासनाने याप्रकरणी अद्याप काही निर्णय घेतलेला नाही. शासन दरबारी हे प्रकरण अडगळीला पडले असून, या प्रकरणांशी निगडित उपजिल्हाधिकार्‍यांवर निलंबनाची कारवाई मात्र झालेली आहे. तीन महिन्यांपूर्वी या प्रकरणात विभागीय प्रशासनाने शासनाकडे अहवाल पाठविला आहे. उपजिल्हाधिकार्‍यांना निलंबनाला सामोरे जावे लागले; परंतु या जमिनींच्या व्यवहारांना स्थगिती देण्यासाठी शासनाने काहीही कारवाई केलेली नाही. महसूल सचिवांकडे सदरील प्रकरणाची माहिती देऊन तीन महिन्यांचा काळ लोटला आहे. अद्याप त्यावर निर्णय न झाल्यामुळे चौकशी समितीने घेतलेली मेहनत वाया जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

कुळ व इनामी जमिनींच्या व्यवहारात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली असून, त्या जमिनी लाटण्यासाठी शहरातील काही राजकीय पक्षाशी निगडित नेत्यांनी पुढाकार घेतल्याचे समोर आले होते. गायरान, महारहाडोळा व कुळाच्या शेकडो एकर जमीन घेण्यासाठी संबंधित नेत्यांनी मूळ जमीनधारकांच्या आडून जिल्हा प्रशासनाकडे परवानगी मागितली होती. जमीन खरेदी-विक्रीस परवानगी देताना कागदपत्रांची शहानिशा न करता उपजिल्हाधिकार्‍यांनी परवानगी दिल्यामुळे त्यांचे निलंबन करण्यात आले तर निवासी उपजिल्हाधिकार्‍यांनी डीएमआयसीलगत असलेल्या १७ गटांमधील जमिनींच्या परवानग्या दिल्यामुळे त्यांच्यावरही विभागीय आयुक्तांनी निलंबनाची कारवाई केली. यानंतर आयुक्तांनी अहवाल शासनाकडे पाठविला. डीएमआयसीलगतच्या जमिनींच्या खरेदी-विक्रीच्या परवानग्या कुणाला दिल्या हे चार महिन्यांपासून समोर आलेले नाही. हिवाळी अधिवेशनात हे प्रकरण चव्हाट्यावर आल्यावर मागील चार महिन्यांपासून व्यवहारांना बे्रक लावण्याचा निर्णय शासनाने घेतला नाही.

१०० एकरपेक्षा अधिक जमीन१०० एकरांहून अधिक जमिनी लाटण्याचा व्यवहार या प्रकरणात झाल्याची चर्चा डिसेंबर २०१७ पासून सुरू आहे. शासनाचा २२ लाख रुपयांचा महसूलही बुडाला आहे. तो कधी वसूल करणार यावर विभागीय तथा जिल्हा प्रशासन काही बोलण्यास तयार नाही. शासनाकडे बोट दाखवून सर्व प्रशासन प्रमुख हात वर करीत आहेत.

टॅग्स :District Collector Aurangabadजिल्हाधिकारी औरंगाबादAurangabadऔरंगाबादTaxकर