शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
2
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
3
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
4
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
5
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
6
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
7
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
8
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
9
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
10
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
11
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
12
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
13
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
14
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...
15
"पाय खूप सुजतात, नीट जेवणही नशिबात नसतं"; केदारनाथच्या पिठ्ठूची डोळे पाणावणारी गोष्ट
16
Gold Price 6 May: लग्नसराईच्या हंगामापूर्वी सोन्याच्या दरात मोठी तेजी, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा लेटेस्ट दर
17
१०० वर्षांनी अद्भूत योग: ८ राशींना लॉटरी, सुख-सोयींचा काळ; पद-पैसा वृद्धी, शेअर बाजारात नफा!
18
'या' ५८ देशांत भारतीयांना व्हिसा फ्री प्रवेश! विमान पकडा आणि थेट परदेशात उतरा, यादीत अनेक सुंदर देश
19
नाशिक बोगस शालार्थ आयडी प्रकरण : 'त्या' शिक्षक, अधिकाऱ्यांची झाडाझडती
20
हार्दिक पांड्या IPL मध्ये खेळतोय, दुसरीकडे त्याची Ex पत्नी नताशा काय करतेय? Photo Viral

महामार्गावरील अपघाताचा मुद्दा आला ऐरणीवर

By admin | Updated: July 28, 2016 00:51 IST

समिर सुतके , उमरगा ‘तीन वर्षांच्या कालावधीत महामार्गावर अपघातात १३० जणांचा मृत्यू ’ या ‘लोकमत’च्या वृत्ताचे पडसाद मंगळवारी विधानसभेत उमटले.

समिर सुतके , उमरगा‘तीन वर्षांच्या कालावधीत महामार्गावर अपघातात १३० जणांचा मृत्यू ’ या ‘लोकमत’च्या वृत्ताचे पडसाद मंगळवारी विधानसभेत उमटले. आ. ज्ञानराज चौगुले यांनी औचित्याचा मुद्दा म्हणून अपघाताचा प्रश्न उपस्थित केल्यानंतर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी संबंधित विभागाला आता चौकशीचे आदेश दिले आहेत. पोलीस ठाण्याच्या हद्दीत रामपूर पाटी ते तलमोडजवळील कर्नाटक सीमेपर्यंत या ३० किमी अंतरावर २०१२-१३ ते २०१६ या तीन वर्षांच्या कालावधीत महामार्गावर झालेल्या अपघातात १३० जण मृत्यूमुखी पडले असून हजारो जखमी झालेले आहेत. याकडे लक्ष वेधत ‘लोकमत’ने या महामार्गाच्या दयनयीय अवस्थेकडेही लक्ष वेधले होते. महामार्गावरील दिशादर्शक फलकांची दुरवस्था झाली आहे. साईडपट्ट्या गायब असून, गतिरोधक नसल्याने गाडीचालकांचे वेगावर नियंत्रण रहात नाही. त्यामुळे या मार्गावर दररोज अपघात होत असल्याचे व त्याकडे महामार्गाशी संबंधित विभागाकडून कानाडोळा केला जात असल्याचे वास्तव पुढे आणले होते. अपघातामुळे निष्पाप लोकांचा बळी जातोय, तर जखमींना कायमचे अपंगत्व येते आहे. महामार्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी महामार्ग रस्ते विकास विभाग व इतर संबंधित विभागाची कोणतीही यंत्रणा कार्यरत नाही. तलमोड ते कराळी पाटी येथील वळणावर गाडी चालविताना पुढून येणारे वाहन दिसत नाही तसेच वेगही समजत नाही. याच भागात सगळ्यात जास्त अपघात घडत असतात. या महामार्गाच्या लगतच नवीन महामार्गाचे चौपदीरकरणाचे काम चालू आहे. रस्त्याच्या कडेलाच नवीन रस्त्यासाठी खोलीकरण केले जात आहे. येथे कसलेही सूचना फलक अथवा सुरक्षाकडे नाही. खड्डे चुकविण्याच्या नादात अपघात होत असल्याचे या वृत्तात नमूद करण्यात आले होते. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित झाल्यापासून आतापर्यंत तब्बल सात अपघात होऊन तेथे चार-पाच जणांचा बळी गेला आहे. तर ३० जण जखमी झाले आहेत. आ. ज्ञानराज चौगुले यांनी या वृत्ताची गंभिरपणे दखल घेत सदर मुद्दा मंगळवारी विधानसभेत उपस्थित केला. तसेच प्रधान सचिवांना याबाबत उपाययोजनां करण्याबाबत पत्र दिले. विधानसभेत मुद्दा उपस्थित झाल्यानंतर संबंधित विभागाकडून याबाबतची संपुर्ण माहिती सादर करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचेही आ. चौगुले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.