शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

महामार्गावरील अपघाताचा मुद्दा आला ऐरणीवर

By admin | Updated: July 28, 2016 00:51 IST

समिर सुतके , उमरगा ‘तीन वर्षांच्या कालावधीत महामार्गावर अपघातात १३० जणांचा मृत्यू ’ या ‘लोकमत’च्या वृत्ताचे पडसाद मंगळवारी विधानसभेत उमटले.

समिर सुतके , उमरगा‘तीन वर्षांच्या कालावधीत महामार्गावर अपघातात १३० जणांचा मृत्यू ’ या ‘लोकमत’च्या वृत्ताचे पडसाद मंगळवारी विधानसभेत उमटले. आ. ज्ञानराज चौगुले यांनी औचित्याचा मुद्दा म्हणून अपघाताचा प्रश्न उपस्थित केल्यानंतर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी संबंधित विभागाला आता चौकशीचे आदेश दिले आहेत. पोलीस ठाण्याच्या हद्दीत रामपूर पाटी ते तलमोडजवळील कर्नाटक सीमेपर्यंत या ३० किमी अंतरावर २०१२-१३ ते २०१६ या तीन वर्षांच्या कालावधीत महामार्गावर झालेल्या अपघातात १३० जण मृत्यूमुखी पडले असून हजारो जखमी झालेले आहेत. याकडे लक्ष वेधत ‘लोकमत’ने या महामार्गाच्या दयनयीय अवस्थेकडेही लक्ष वेधले होते. महामार्गावरील दिशादर्शक फलकांची दुरवस्था झाली आहे. साईडपट्ट्या गायब असून, गतिरोधक नसल्याने गाडीचालकांचे वेगावर नियंत्रण रहात नाही. त्यामुळे या मार्गावर दररोज अपघात होत असल्याचे व त्याकडे महामार्गाशी संबंधित विभागाकडून कानाडोळा केला जात असल्याचे वास्तव पुढे आणले होते. अपघातामुळे निष्पाप लोकांचा बळी जातोय, तर जखमींना कायमचे अपंगत्व येते आहे. महामार्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी महामार्ग रस्ते विकास विभाग व इतर संबंधित विभागाची कोणतीही यंत्रणा कार्यरत नाही. तलमोड ते कराळी पाटी येथील वळणावर गाडी चालविताना पुढून येणारे वाहन दिसत नाही तसेच वेगही समजत नाही. याच भागात सगळ्यात जास्त अपघात घडत असतात. या महामार्गाच्या लगतच नवीन महामार्गाचे चौपदीरकरणाचे काम चालू आहे. रस्त्याच्या कडेलाच नवीन रस्त्यासाठी खोलीकरण केले जात आहे. येथे कसलेही सूचना फलक अथवा सुरक्षाकडे नाही. खड्डे चुकविण्याच्या नादात अपघात होत असल्याचे या वृत्तात नमूद करण्यात आले होते. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित झाल्यापासून आतापर्यंत तब्बल सात अपघात होऊन तेथे चार-पाच जणांचा बळी गेला आहे. तर ३० जण जखमी झाले आहेत. आ. ज्ञानराज चौगुले यांनी या वृत्ताची गंभिरपणे दखल घेत सदर मुद्दा मंगळवारी विधानसभेत उपस्थित केला. तसेच प्रधान सचिवांना याबाबत उपाययोजनां करण्याबाबत पत्र दिले. विधानसभेत मुद्दा उपस्थित झाल्यानंतर संबंधित विभागाकडून याबाबतची संपुर्ण माहिती सादर करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचेही आ. चौगुले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.