शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावरील अपघाताचा मुद्दा आला ऐरणीवर

By admin | Updated: July 28, 2016 00:51 IST

समिर सुतके , उमरगा ‘तीन वर्षांच्या कालावधीत महामार्गावर अपघातात १३० जणांचा मृत्यू ’ या ‘लोकमत’च्या वृत्ताचे पडसाद मंगळवारी विधानसभेत उमटले.

समिर सुतके , उमरगा‘तीन वर्षांच्या कालावधीत महामार्गावर अपघातात १३० जणांचा मृत्यू ’ या ‘लोकमत’च्या वृत्ताचे पडसाद मंगळवारी विधानसभेत उमटले. आ. ज्ञानराज चौगुले यांनी औचित्याचा मुद्दा म्हणून अपघाताचा प्रश्न उपस्थित केल्यानंतर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी संबंधित विभागाला आता चौकशीचे आदेश दिले आहेत. पोलीस ठाण्याच्या हद्दीत रामपूर पाटी ते तलमोडजवळील कर्नाटक सीमेपर्यंत या ३० किमी अंतरावर २०१२-१३ ते २०१६ या तीन वर्षांच्या कालावधीत महामार्गावर झालेल्या अपघातात १३० जण मृत्यूमुखी पडले असून हजारो जखमी झालेले आहेत. याकडे लक्ष वेधत ‘लोकमत’ने या महामार्गाच्या दयनयीय अवस्थेकडेही लक्ष वेधले होते. महामार्गावरील दिशादर्शक फलकांची दुरवस्था झाली आहे. साईडपट्ट्या गायब असून, गतिरोधक नसल्याने गाडीचालकांचे वेगावर नियंत्रण रहात नाही. त्यामुळे या मार्गावर दररोज अपघात होत असल्याचे व त्याकडे महामार्गाशी संबंधित विभागाकडून कानाडोळा केला जात असल्याचे वास्तव पुढे आणले होते. अपघातामुळे निष्पाप लोकांचा बळी जातोय, तर जखमींना कायमचे अपंगत्व येते आहे. महामार्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी महामार्ग रस्ते विकास विभाग व इतर संबंधित विभागाची कोणतीही यंत्रणा कार्यरत नाही. तलमोड ते कराळी पाटी येथील वळणावर गाडी चालविताना पुढून येणारे वाहन दिसत नाही तसेच वेगही समजत नाही. याच भागात सगळ्यात जास्त अपघात घडत असतात. या महामार्गाच्या लगतच नवीन महामार्गाचे चौपदीरकरणाचे काम चालू आहे. रस्त्याच्या कडेलाच नवीन रस्त्यासाठी खोलीकरण केले जात आहे. येथे कसलेही सूचना फलक अथवा सुरक्षाकडे नाही. खड्डे चुकविण्याच्या नादात अपघात होत असल्याचे या वृत्तात नमूद करण्यात आले होते. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित झाल्यापासून आतापर्यंत तब्बल सात अपघात होऊन तेथे चार-पाच जणांचा बळी गेला आहे. तर ३० जण जखमी झाले आहेत. आ. ज्ञानराज चौगुले यांनी या वृत्ताची गंभिरपणे दखल घेत सदर मुद्दा मंगळवारी विधानसभेत उपस्थित केला. तसेच प्रधान सचिवांना याबाबत उपाययोजनां करण्याबाबत पत्र दिले. विधानसभेत मुद्दा उपस्थित झाल्यानंतर संबंधित विभागाकडून याबाबतची संपुर्ण माहिती सादर करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचेही आ. चौगुले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.