शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
5
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
6
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
7
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
8
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
9
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
10
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
11
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
12
ऑनलाइन गेमिंग विधेयकावरुन अनुपम मित्तल यांची सरकारवर टीका; म्हणाले 'या निर्णयामुळे थेट...'
13
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
14
श्रावण शनि अमावास्या: शनिदोष, प्रतिकूल प्रभाव कसा ओळखावा? ‘हे’ ५ उपाय तारतील, कृपा होईल!
15
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
16
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
17
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
18
युद्ध थांबण्याचे नाव नाही! रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; एकाच वेळी डागली ४० क्षेपणास्त्र
19
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
20
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!

सिंचनातले अनुदान आटले !

By admin | Updated: May 22, 2014 00:13 IST

बालाजी थेटे, औराद शहाजानी दुष्काळ, पावसाचे होणारे कमी प्रमाण यामुळे कमी पाण्यावर जास्त सिंचन यासाठी शेतकर्‍यांनी लाखो रुपये खर्चून शेतात ठिबक व तुषार सिंचन योजना राबविल्या.

बालाजी थेटे , औराद शहाजानी राज्यात वारंवार पडणारा दुष्काळ, पावसाचे होणारे कमी प्रमाण, पाण्याची कमतरता यामुळे कमी पाण्यावर जास्त सिंचन यासाठी शेतकर्‍यांनी लाखो रुपये खर्चून शेतात ठिबक व तुषार सिंचन योजना राबविल्या. पण; यातील शासनाचा ५० टक्के अनुदानाचा वाटा अद्याप एक वर्षापासून शेतकर्‍यांना दिला नसल्यामुळे जवळपास दीड कोटी रुपयांचे अनुदान थकले आहे. राज्यात वारंवार दुष्काळाचे संकट येत आहे. अनेक धरणे बांधकामाअभावी बंद पडली आहेत. पावसाचे प्रमाण कमी होत आहे. पाण्याचा साठा कमी होत आहे. राज्यात काही वर्षांपूर्वी दुष्काळ पडला होता. शासनाने शेतकर्‍यांना कमी पाण्यावर जास्त सिंचन करण्यावर भर देण्याचे आवाहन केले. यासाठी शासन शेतकर्‍यांना ५० टक्के अनुदान देते. २०१२ ते २०१३ या आर्थिक वर्षातील ५०० शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात ठिबक सिंचनाचा वापर केला. पूर्वी तालुक्यात ३५०० हेक्टर्स क्षेत्र सिंचनाखाली होते. आता ५ हजार हेक्टर्सपर्यंत क्षेत्र पोहोचले आहे. बाजारात अनेक खाजगी कंपन्यांकडून ठिबक संच व तुषार संच उपलब्ध आहेत. शेतकर्‍यांनी सरकारच्या अनुदान यादीतील कंपन्यांमार्फत ठिबक सिंचन करून घेतले आहे. या वाढत्या ठिबक सिंचनामुळे पाण्याचा होणारा अपव्यय कमी झाला आहे. कमी पाण्यावर जास्त शेती क्षेत्र सिंचनाखाली आलेले आहे. आणखी शेतकर्‍यांंचा ओढा वाढला असता पण; शासनाने या योजनेतील अनुदान कृषी विभागाकडे उपलब्ध करून दिलेले नाही. यामुळे शेतकरी या योजनेपासून दूर जाताना दिसत आहे. याबाबत तालुका कृषी अधिकारी विठ्ठल लहाने यांच्याशी संपर्क साधला असता २०१२-१३ या वर्षातील शासनाचे अनुदान उपलब्ध झालेले नाही. सदरील अनुदान उपलब्ध होताच संबंधित शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर जमा केले जाईल. पूर्वी ठिबक सिंचन केल्यानंतर संबंधित कृषी विभागाकडे कागदपत्र सादर केले की, शेतकर्‍यांची फाईल संबंधित विभागामध्ये फिरत असे. पण आता आॅनलाईन ही फाईल अपलोड करण्यात येत आहे. यामुळे कामात जलदता आली. पण; अनुदान वाटपाला मात्र उशीर होत आहे. ठिबकने बारमाही पिके वाढली. शेतकर्‍यांनी सूक्ष्म ठिबक योजना शेतात राबविल्यामुळे औराद कृषी मंडळात ऊस, भाजीपाला, फळबाग या पिकांच्या क्षेत्रामध्ये वाढ होऊन उत्पादनही वाढले आहे. परंतु, अनुदान थकल्यामुळे शेतकर्‍यांत नाराजी असल्याचे माधवराव थेटे यांनी सांगितले.