शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

सिंचनातले अनुदान आटले !

By admin | Updated: May 22, 2014 00:13 IST

बालाजी थेटे, औराद शहाजानी दुष्काळ, पावसाचे होणारे कमी प्रमाण यामुळे कमी पाण्यावर जास्त सिंचन यासाठी शेतकर्‍यांनी लाखो रुपये खर्चून शेतात ठिबक व तुषार सिंचन योजना राबविल्या.

बालाजी थेटे , औराद शहाजानी राज्यात वारंवार पडणारा दुष्काळ, पावसाचे होणारे कमी प्रमाण, पाण्याची कमतरता यामुळे कमी पाण्यावर जास्त सिंचन यासाठी शेतकर्‍यांनी लाखो रुपये खर्चून शेतात ठिबक व तुषार सिंचन योजना राबविल्या. पण; यातील शासनाचा ५० टक्के अनुदानाचा वाटा अद्याप एक वर्षापासून शेतकर्‍यांना दिला नसल्यामुळे जवळपास दीड कोटी रुपयांचे अनुदान थकले आहे. राज्यात वारंवार दुष्काळाचे संकट येत आहे. अनेक धरणे बांधकामाअभावी बंद पडली आहेत. पावसाचे प्रमाण कमी होत आहे. पाण्याचा साठा कमी होत आहे. राज्यात काही वर्षांपूर्वी दुष्काळ पडला होता. शासनाने शेतकर्‍यांना कमी पाण्यावर जास्त सिंचन करण्यावर भर देण्याचे आवाहन केले. यासाठी शासन शेतकर्‍यांना ५० टक्के अनुदान देते. २०१२ ते २०१३ या आर्थिक वर्षातील ५०० शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात ठिबक सिंचनाचा वापर केला. पूर्वी तालुक्यात ३५०० हेक्टर्स क्षेत्र सिंचनाखाली होते. आता ५ हजार हेक्टर्सपर्यंत क्षेत्र पोहोचले आहे. बाजारात अनेक खाजगी कंपन्यांकडून ठिबक संच व तुषार संच उपलब्ध आहेत. शेतकर्‍यांनी सरकारच्या अनुदान यादीतील कंपन्यांमार्फत ठिबक सिंचन करून घेतले आहे. या वाढत्या ठिबक सिंचनामुळे पाण्याचा होणारा अपव्यय कमी झाला आहे. कमी पाण्यावर जास्त शेती क्षेत्र सिंचनाखाली आलेले आहे. आणखी शेतकर्‍यांंचा ओढा वाढला असता पण; शासनाने या योजनेतील अनुदान कृषी विभागाकडे उपलब्ध करून दिलेले नाही. यामुळे शेतकरी या योजनेपासून दूर जाताना दिसत आहे. याबाबत तालुका कृषी अधिकारी विठ्ठल लहाने यांच्याशी संपर्क साधला असता २०१२-१३ या वर्षातील शासनाचे अनुदान उपलब्ध झालेले नाही. सदरील अनुदान उपलब्ध होताच संबंधित शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर जमा केले जाईल. पूर्वी ठिबक सिंचन केल्यानंतर संबंधित कृषी विभागाकडे कागदपत्र सादर केले की, शेतकर्‍यांची फाईल संबंधित विभागामध्ये फिरत असे. पण आता आॅनलाईन ही फाईल अपलोड करण्यात येत आहे. यामुळे कामात जलदता आली. पण; अनुदान वाटपाला मात्र उशीर होत आहे. ठिबकने बारमाही पिके वाढली. शेतकर्‍यांनी सूक्ष्म ठिबक योजना शेतात राबविल्यामुळे औराद कृषी मंडळात ऊस, भाजीपाला, फळबाग या पिकांच्या क्षेत्रामध्ये वाढ होऊन उत्पादनही वाढले आहे. परंतु, अनुदान थकल्यामुळे शेतकर्‍यांत नाराजी असल्याचे माधवराव थेटे यांनी सांगितले.