शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

सिंचन, आरोग्य विभागाच्या निधीत कपातीवरून नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:05 IST

--- औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाच्या निधीत ४ कोटी, तर आरोग्य विभागाच्या निधीत ५ कोटींची कपात केल्याने ...

---

औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाच्या निधीत ४ कोटी, तर आरोग्य विभागाच्या निधीत ५ कोटींची कपात केल्याने जिल्हा परिषद सदस्यांनी स्थायी समितीच्या बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त केली. पुनर्नियोजनात कपात केलेला निधी मिळण्याची आशा असताना तसे घडले नाही. त्यामुळे कपात केलेला निधी परत देण्यात यावा अन्यथा उपोषणाचा इशारा स्थायी समिती सदस्यांनी दिला आहे.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मीना शेळके यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची बैठक गुरुवारी पार पडली. यावेळी उपाध्यक्ष एल. जी. गायकवाड, अर्थ व बांधकाम सभापती किशोर बलांडे, शिक्षण व आरोग्य सभापती अविनाश बलांडे यांच्यासह पदाधिकारी ऑनलाईन उपस्थित होते. बांधकाम विभागाला पुनर्नियोजनात मार्चअखेर चांगला निधी मिळाल्याने बलांडे यांनी आभार मानले. यावेळी जिल्हा परिषदेच्या अनेक कामांचे नियोजन झाल्याचे सांगताना प्रशासकीय मान्यता का दिली जात नाही. याला कोण जबाबदार आहे, असा सवाल सदस्य मधुकर वालतुरे यांनी उपस्थित केला. आरोग्य विभागाला अर्थसंकल्पात १६ कोटी ५० लाख रुपयांची तरतूद असताना ५ कोटी रुपये कपात करण्यात आले. ग्रामीण भागात कोविड संसर्ग वाढला आहे, खाटांची कमी, व्हेंटिलेटरची कमतरता भासत आहे. आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रात सोयी देण्यासाठी निधी आवश्यक असल्याचा ठराव रमेश गायकवाड यांनी मांडला. या ठरावावर उपाध्यक्ष गायकवाड, आरोग्य सभापती गलांडे यांनी निवेदन करीत अनुमोदन दिले.

--

दुर्दैवी निर्णय

---

शेतकऱ्यांसाठी २०२०-२१ च्या मूळ अर्थसंकल्पात १२ कोटी रुपये सिंचनासाठी असताना यातून ४ कोटी कमी करण्यात आले. पुनर्नियोजनात कमी केलेली तरतूद मिळेल अशी अपेक्षा असताना सिंचनासारख्या आवश्यक असलेल्या निधीमध्ये कपात करण्याचा निर्णय दुर्दैवी आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप सदस्य रमेश रमेश गायकवाड यांनी केला. पशुसंवर्धनला २ कोटी ९१ लाख असताना ८० लाख कमी केले. हा निधी न मिळाल्यास स्थायी समिती सदस्य जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचे सदस्य वालतुरे यांनी बैठकीत सांगितले.