शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
2
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
3
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
4
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
5
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
6
विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा 
7
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
8
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  
9
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
10
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
11
अतूट नातं! १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला राखी बांधतेय ऐश्वर्या राय; प्रेमाने मारते 'अशी' हाक
12
भाजपाच्या मित्रपक्षांमध्ये वाद, NDA सरकारमध्ये वाढली डोकेदुखी; बंद दाराआड बैठक घेणार
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये या अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार रावणाच्या जवळच्या व्यक्तीची भूमिका
14
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
15
पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून पती फरार; तिहेरी हत्याकांडांने दिल्ली हादरली
16
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?
17
ICICI Bank Minimum Balance: आता ₹१०००० नाही, बचत खात्यात ₹५०००० चा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार, 'या' दिवसापासून नियम लागू होणार
18
मर्मबंध! आईच्या दुधाचा स्वाद, ब्रेस्ट मिल्क फ्लेव्हर्ड आईस्क्रीमची तुफान चर्चा, पण हे आहे तरी काय?
19
हृदयद्रावक! रक्षाबंधनासाठी येणाऱ्या भावासोबत आक्रित घडलं, वाट पाहत होत्या बहिणी पण...
20
लफडं! पतीचे हात तोडले अन् १० वर्ष लहान भाच्यासोबत पळाली मामी; नात्याला काळीमा फासणारी कहाणी

शेती औजारांसाठी लाकडाऐवजी लोखंडाचा वापर

By admin | Updated: June 9, 2014 01:13 IST

मदन बियाणी , कनेरगाव नाका दिवसेंदिवस जंगले नष्ट होत असल्याने खेड्यापाड्यात शेतीसाठी वापरली जाणारी लाकडी अवजारे दुर्मिळ होत चालली आहेत.

मदन बियाणी , कनेरगाव नाकादिवसेंदिवस जंगले नष्ट होत असल्याने खेड्यापाड्यात शेतीसाठी वापरली जाणारी लाकडी अवजारे दुर्मिळ होत चालली आहेत. त्यांची जागा आता लोखंडी अवजारांनी घेतल्याचे चित्र असून सुतारांच्या व्यवसायावर संकट आले आहे. सध्या खरिपाच्या पेरणीची लगबग चालू झालेली असली तरी सुताराकडे शेतीऔजारे बनविण्याचे काम कमी झाल्याचे दिसत आहे. आपल्याकडच्या सामाजिक व्यवस्थेत बारा बलुतेदारांना महत्वाचे स्थान होते. संपूर्ण जनजीवन या बलुतेदारांभोवती फिरायचे. वस्तूंची देवाणघेवाण होऊन व्यवहार व्हायचे. बलुतेदार पिढ्यानपिढ्या तोच व्यवसाय करायचे. सुतार, लोहार, चांभार, कुंभार, सोनार अशा बलुतेदारांच्या अनेक पिढ्यांनी त्यांंच्या कामाबरोबरच एक कलाही जोपासली, वाढविली आहे. विकासाच्या ओघात काही बलुतेदारांनी इतर शिक्षण घेऊन, पारंपारिक शिक्षण घेऊन अन्य मार्ग पत्करले आहेत. मात्र बहुतांश सुतार व्यावसायिक समाज आजही आपल्या पारंपारिक कलेवर उपजीविका करीत आहेत. शेतकऱ्याला आवश्यक असणारी अवजारे बनविणे व दुरूस्ती करण्याचे काम सुतार या बलुतेदाराकडे असे. शेतीसाठी लागणारे नांगर, पाभर, तिफण, वखर, बैलगाडी इत्यादी अवजारे सुतार बनवित असे. प्राचीन काळी मंदिरे ही लाकडाची बनवली जात असत. एवढेच नाहीतर देवमूर्तीही लाकडाच्या असायच्या. कालांतराने लाकडी मंदिरे मागे पडली असली तरी सुतारकामाचे महत्व संपले नाही फर्निचर आणि लाकडी मूर्ती, शिल्पे यांच्यापुरताच मर्र्यादित राहिल्याचे चित्र आहे. अलीकडच्या काळात सुताार व्यवसाय हा परंपरागत बैलगाड्या, नांंगर, लाकडी चाके अदृश्य होऊ लागली आहेत. औद्योगिक क्रांतीचा हा एक अपरिहार्य परिणाम आहे. कनेरगावनाका परिसरात बाभूळ, साग, शिसव, सादोडा, धामोडी असे विविध प्रकारचे वृक्ष मोठ्या प्रमाणात होते. मात्र इमारतीचे बांधकाम, फर्निचर तसेच जळतनासाठी वृक्षतोड झाल्याने परिसर नाहीसा झाला आहे. विशेष म्हणजे या भागातून वाहणाऱ्या पैनगंगना नदीच्या काठावर असलेल्या कनेरगावनाका, पारडा परिसरात एके काळी धावंड्याची अनेक झाडे होती. या लाकडांचा उष्मांक चांगला असल्याने त्याचा सर्वाधिक वापर जळतनासाठी केला जातो. अशाप्रकारे बहुपयोगी ठरणारी वनसंपदा नष्ट होत आहे. तसेच सरकारी गायरान जमिनी शेतीसाठी वापरात आणल्या जात आहेत. त्यामुळे लाकूड मिळेनासे झाले. बहुसंख्य शेतकरी लोखंडी अवजारांकडे वळले असल्याने सुतारांच्या व्यवसायावर अवकळा आली आहे.