शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

शेती औजारांसाठी लाकडाऐवजी लोखंडाचा वापर

By admin | Updated: June 9, 2014 01:13 IST

मदन बियाणी , कनेरगाव नाका दिवसेंदिवस जंगले नष्ट होत असल्याने खेड्यापाड्यात शेतीसाठी वापरली जाणारी लाकडी अवजारे दुर्मिळ होत चालली आहेत.

मदन बियाणी , कनेरगाव नाकादिवसेंदिवस जंगले नष्ट होत असल्याने खेड्यापाड्यात शेतीसाठी वापरली जाणारी लाकडी अवजारे दुर्मिळ होत चालली आहेत. त्यांची जागा आता लोखंडी अवजारांनी घेतल्याचे चित्र असून सुतारांच्या व्यवसायावर संकट आले आहे. सध्या खरिपाच्या पेरणीची लगबग चालू झालेली असली तरी सुताराकडे शेतीऔजारे बनविण्याचे काम कमी झाल्याचे दिसत आहे. आपल्याकडच्या सामाजिक व्यवस्थेत बारा बलुतेदारांना महत्वाचे स्थान होते. संपूर्ण जनजीवन या बलुतेदारांभोवती फिरायचे. वस्तूंची देवाणघेवाण होऊन व्यवहार व्हायचे. बलुतेदार पिढ्यानपिढ्या तोच व्यवसाय करायचे. सुतार, लोहार, चांभार, कुंभार, सोनार अशा बलुतेदारांच्या अनेक पिढ्यांनी त्यांंच्या कामाबरोबरच एक कलाही जोपासली, वाढविली आहे. विकासाच्या ओघात काही बलुतेदारांनी इतर शिक्षण घेऊन, पारंपारिक शिक्षण घेऊन अन्य मार्ग पत्करले आहेत. मात्र बहुतांश सुतार व्यावसायिक समाज आजही आपल्या पारंपारिक कलेवर उपजीविका करीत आहेत. शेतकऱ्याला आवश्यक असणारी अवजारे बनविणे व दुरूस्ती करण्याचे काम सुतार या बलुतेदाराकडे असे. शेतीसाठी लागणारे नांगर, पाभर, तिफण, वखर, बैलगाडी इत्यादी अवजारे सुतार बनवित असे. प्राचीन काळी मंदिरे ही लाकडाची बनवली जात असत. एवढेच नाहीतर देवमूर्तीही लाकडाच्या असायच्या. कालांतराने लाकडी मंदिरे मागे पडली असली तरी सुतारकामाचे महत्व संपले नाही फर्निचर आणि लाकडी मूर्ती, शिल्पे यांच्यापुरताच मर्र्यादित राहिल्याचे चित्र आहे. अलीकडच्या काळात सुताार व्यवसाय हा परंपरागत बैलगाड्या, नांंगर, लाकडी चाके अदृश्य होऊ लागली आहेत. औद्योगिक क्रांतीचा हा एक अपरिहार्य परिणाम आहे. कनेरगावनाका परिसरात बाभूळ, साग, शिसव, सादोडा, धामोडी असे विविध प्रकारचे वृक्ष मोठ्या प्रमाणात होते. मात्र इमारतीचे बांधकाम, फर्निचर तसेच जळतनासाठी वृक्षतोड झाल्याने परिसर नाहीसा झाला आहे. विशेष म्हणजे या भागातून वाहणाऱ्या पैनगंगना नदीच्या काठावर असलेल्या कनेरगावनाका, पारडा परिसरात एके काळी धावंड्याची अनेक झाडे होती. या लाकडांचा उष्मांक चांगला असल्याने त्याचा सर्वाधिक वापर जळतनासाठी केला जातो. अशाप्रकारे बहुपयोगी ठरणारी वनसंपदा नष्ट होत आहे. तसेच सरकारी गायरान जमिनी शेतीसाठी वापरात आणल्या जात आहेत. त्यामुळे लाकूड मिळेनासे झाले. बहुसंख्य शेतकरी लोखंडी अवजारांकडे वळले असल्याने सुतारांच्या व्यवसायावर अवकळा आली आहे.