शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरद पवार उलगडलेलं, पण न उमजलेलं कोडं, तर अजित पवार...'; CM फडणवीसांचे 'रॅपिड फायर' उत्तरे, शिंदे-ठाकरेंबद्दल काय म्हणाले? 
2
Petal Gahlot : अभिमानास्पद! भारताच्या लेकीने फाडला पाकिस्तानचा बुरखा; वेधलं लक्ष, कोण आहे पेटल गहलोत?
3
अमेरिकेचा मोठा निर्णय! कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षाचा व्हिसा रद्द करणार, कारण काय सांगितलं?
4
पुराचा धसका! चिखलातील स्वप्नांचा शोध..; पिकेच नाही तर मातीही वाहून गेल्याने भविष्य संकटात
5
विना इनक्रिमेंट १ लाखांपेक्षा अधिक वाढली सॅलरी; रुपया आणि डॉलर्सचा काय आहे याच्याशी संबंध?
6
हृदयद्रावक! खेळता खेळता उकळत्या दुधात पडून दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू, मांजरीच्या मागे गेली अन्...
7
सुपर ओव्हरमधील वादावरून श्रीलंकेचे प्रशिक्षक जयसूर्या संतप्त, ICCकडे केली अशी मागणी 
8
भारतीय औषध उद्योगाला ‘ट्रम्प’ झटका! १०.५ अब्ज डॉलरची निर्यात धोक्यात, अमेरिकेलाही बसणार झळ
9
ऑक्टोबरमध्ये शुक्र-शनीची युती; काही राशींना वाट्याला 'राजयोग' तर काहींना 'कर्माचे भोग'
10
अभिषेक शर्मा-अभिषेक बच्चनच्या नावात शोएब अख्तरचा गोंधळ; अभिनेता स्पष्टच म्हणाला- "तुझा आदर करतो, पण..."
11
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
12
Happy Birthday Google! २७ वा वाढदिवस साजरा करतोय गुगल! तुम्हाला Google चा फुल फॉर्म माहितीये का आणि कसं पडलं हे नाव?
13
२५ जण, ६ वाहनं... १ मिनिटात ९ कोटींवर डल्ला; दागिन्यांच्या दुकानात फिल्मी स्टाईल दरोडा
14
'शार्क टँक' फेम अश्नीर ग्रोव्हरला 'बिग बॉस १९'कडून ईमेल, वाइल्ड कार्ड एन्ट्रीची ऑफर; म्हणाला- "आधी सलमान खानला..."
15
TATA च्या बहुप्रतिक्षित आयपीओची तारीख अखेर ठरली, 'या' दिवशी मिळणार गुंतवणूकीची संधी, चेक करा डिटेल्स
16
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
17
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
18
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
19
फ्लॅट वेळेत न दिल्यास बिल्डरला १८% व्याजासह भरपाई द्यावीच लागेल; सुप्रीम कोर्टाचा आदेश
20
राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय

शेती औजारांसाठी लाकडाऐवजी लोखंडाचा वापर

By admin | Updated: June 9, 2014 01:13 IST

मदन बियाणी , कनेरगाव नाका दिवसेंदिवस जंगले नष्ट होत असल्याने खेड्यापाड्यात शेतीसाठी वापरली जाणारी लाकडी अवजारे दुर्मिळ होत चालली आहेत.

मदन बियाणी , कनेरगाव नाकादिवसेंदिवस जंगले नष्ट होत असल्याने खेड्यापाड्यात शेतीसाठी वापरली जाणारी लाकडी अवजारे दुर्मिळ होत चालली आहेत. त्यांची जागा आता लोखंडी अवजारांनी घेतल्याचे चित्र असून सुतारांच्या व्यवसायावर संकट आले आहे. सध्या खरिपाच्या पेरणीची लगबग चालू झालेली असली तरी सुताराकडे शेतीऔजारे बनविण्याचे काम कमी झाल्याचे दिसत आहे. आपल्याकडच्या सामाजिक व्यवस्थेत बारा बलुतेदारांना महत्वाचे स्थान होते. संपूर्ण जनजीवन या बलुतेदारांभोवती फिरायचे. वस्तूंची देवाणघेवाण होऊन व्यवहार व्हायचे. बलुतेदार पिढ्यानपिढ्या तोच व्यवसाय करायचे. सुतार, लोहार, चांभार, कुंभार, सोनार अशा बलुतेदारांच्या अनेक पिढ्यांनी त्यांंच्या कामाबरोबरच एक कलाही जोपासली, वाढविली आहे. विकासाच्या ओघात काही बलुतेदारांनी इतर शिक्षण घेऊन, पारंपारिक शिक्षण घेऊन अन्य मार्ग पत्करले आहेत. मात्र बहुतांश सुतार व्यावसायिक समाज आजही आपल्या पारंपारिक कलेवर उपजीविका करीत आहेत. शेतकऱ्याला आवश्यक असणारी अवजारे बनविणे व दुरूस्ती करण्याचे काम सुतार या बलुतेदाराकडे असे. शेतीसाठी लागणारे नांगर, पाभर, तिफण, वखर, बैलगाडी इत्यादी अवजारे सुतार बनवित असे. प्राचीन काळी मंदिरे ही लाकडाची बनवली जात असत. एवढेच नाहीतर देवमूर्तीही लाकडाच्या असायच्या. कालांतराने लाकडी मंदिरे मागे पडली असली तरी सुतारकामाचे महत्व संपले नाही फर्निचर आणि लाकडी मूर्ती, शिल्पे यांच्यापुरताच मर्र्यादित राहिल्याचे चित्र आहे. अलीकडच्या काळात सुताार व्यवसाय हा परंपरागत बैलगाड्या, नांंगर, लाकडी चाके अदृश्य होऊ लागली आहेत. औद्योगिक क्रांतीचा हा एक अपरिहार्य परिणाम आहे. कनेरगावनाका परिसरात बाभूळ, साग, शिसव, सादोडा, धामोडी असे विविध प्रकारचे वृक्ष मोठ्या प्रमाणात होते. मात्र इमारतीचे बांधकाम, फर्निचर तसेच जळतनासाठी वृक्षतोड झाल्याने परिसर नाहीसा झाला आहे. विशेष म्हणजे या भागातून वाहणाऱ्या पैनगंगना नदीच्या काठावर असलेल्या कनेरगावनाका, पारडा परिसरात एके काळी धावंड्याची अनेक झाडे होती. या लाकडांचा उष्मांक चांगला असल्याने त्याचा सर्वाधिक वापर जळतनासाठी केला जातो. अशाप्रकारे बहुपयोगी ठरणारी वनसंपदा नष्ट होत आहे. तसेच सरकारी गायरान जमिनी शेतीसाठी वापरात आणल्या जात आहेत. त्यामुळे लाकूड मिळेनासे झाले. बहुसंख्य शेतकरी लोखंडी अवजारांकडे वळले असल्याने सुतारांच्या व्यवसायावर अवकळा आली आहे.