शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

गरमपाणी पुलावर लोखंडी जाळ्या बसविल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:03 IST

माझी वसुंधरा अभियान व केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत खाम नदीचे पुनरुज्जीवन केले जात आहे. त्यासाठी महापालिकेच्या प्रशासकांनी पुढाकार ...

माझी वसुंधरा अभियान व केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत खाम नदीचे पुनरुज्जीवन केले जात आहे. त्यासाठी महापालिकेच्या प्रशासकांनी पुढाकार घेतला असून, छावणी परिषद, व्हेरॉक आणि इकोसत्त्व या संस्था महापालिकेला मदत करीत आहेत. पहिल्या टप्प्यात नदीपात्रात अनेक वर्षांपासून साचलेला कचरा उचलण्यात आला, तसेच वृक्षारोपण करण्यात आले. नदीपात्रात नागरिकांनी कचरा टाकू नये यासाठी खाम नदीवर व नदीला मिळणाऱ्या नाल्यांच्या ३० पुलांवर लोखंडी जाळ्या बसविल्या जात आहेत. यापूर्वी जाफरगेट नाल्यावरील पुलावर जाळ्या लावण्यात आल्या आहेत. गुरुवारी गरमपाणी पुलावर जाळ्या बसविण्यात आल्या. यावेळी उद्यान अधीक्षक विजय पाटील, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख नंदकिशोर भोंबे, उद्यान विभाग अभियंता जी. बी. चांडक यांच्यासह परिसरातील मुलांची उपस्थिती होती. मनपा प्रशासकांनी नमूद केले की, खाम नदीचे पुनरुज्जीवन हा केवळ यांत्रिक किंवा तांत्रिक प्रकल्प नाही. शहरातील प्रत्येकाच्या जीवनाशी याचा संबंध आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून खाम नदीकाठावर राहणाऱ्या मुलांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे जीवनमान उंचावण्याची इच्छा आहे.