शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

आवक घटली, भाव वाढले

By admin | Updated: June 4, 2017 00:41 IST

औरंगाबाद : कर्जमाफी व अन्य मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा शनिवारी तिसरा दिवस होता.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : कर्जमाफी व अन्य मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा शनिवारी तिसरा दिवस होता. नाशिकमधून येणाऱ्या फळभाज्यांची आवक कमालीची घटली. आसपासच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी जाधववाडीच्या अडत बाजारपेठेत फळभाज्या-पालेभाज्या आणल्याच नाही. तरी शहरातील विविध ठिकाणच्या भाजीमंडईत फळभाज्या सहज मिळत होत्या. पण ग्राहकांना त्या खरेदीसाठी जास्त किंमत मोजावी लागत होती. औरंगाबादेत नाशिक जिल्ह्यातून फुलकोबी, पत्ताकोबी, काकडी, दोडके, लवंगी मिरची, कारले, भेंडी आदी फळभाज्यांची आवक होत असते. मात्र, शनिवारी नाशिकहून जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात फळभाज्यांची आवक झालीच नाही. आसपासच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनीही थेट बाजार समितीत पालेभाज्या आणणे टाळले. पण तरीही जाधववाडीच्या फळभाजीपाला अडत बाजारात पहाटेपासून किरकोळ विक्रेत्यांनी त्यांच्याकडील भाज्या विक्री करणे सुरू केले होते. सकाळीच संप मागे घेतल्याच्या बातम्या सर्वत्र पसरल्या. पण नंतर संप मागे घेण्यात आला नाही, अशाही बातम्या ऐकायला मिळाल्या. यामुळे शेतकरी, व्यापारी व ग्राहकांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली. यामुळे या अडत बाजारात भाज्या विक्रीला कोणीही विरोध केला नाही. त्यामुळे येथील व्यवहार सुरळीत सुरू होते. मात्र, जेथे २०० पेक्षा जास्त विक्रेते बसतात, तेथे आज जेमतेम ५० विक्रेतेच भाजी विकताना दिसून आले. भाज्या येणार नसल्याने काही अडत्यांनी तर आपली दुकानेही उघडली नाही. बाजार समितीमध्ये शनिवारी एकाही भाजीची आवक झाल्याची नोंद नाही. आवक घटल्याने (पान ७ वर)