शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

धारूर-वडवणी रस्ता खचल्याने अपघातास निमंत्रण

By admin | Updated: July 13, 2014 00:17 IST

धारूर : धारूर ते वडवणी रस्त्यावर पहाडी दहिफळ जवळ दोन महिन्यांपूर्वीच केलेला रस्ता खचून गेला आहे. आणखी एखादा मोठा पाऊस झाला तर या मार्गावरील वाहतूक ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

धारूर : धारूर ते वडवणी रस्त्यावर पहाडी दहिफळ जवळ दोन महिन्यांपूर्वीच केलेला रस्ता खचून गेला आहे. आणखी एखादा मोठा पाऊस झाला तर या मार्गावरील वाहतूक ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या या रस्त्याचे काम किती निकृष्ट दर्जाचे झाले आहे, हे पहिल्याच पावसात समोर आल्याने सा.बां. विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे.वडवणी, धारूर या दोन तालुक्यांना जोडणारा एक मुख्य रस्ता आहे. या मार्गावरील वाहनांची वर्दळ पाहता या रस्त्याची दोन महिन्यांपूर्वीच दुरूस्ती करण्यात आली होती. सा.बां. उपविभागाने दोन महिन्यांपूर्वीच धारूर हद्दीतील रस्त्याचे डांबरीकरण केले होते. मात्र पहिल्या पावसातच दहिफळजवळ दोन ठिकाणी हा रस्ता पूर्णपणे खचून गेला आहे. हा रस्ता खचल्यामुळे अपघातास निमंत्रण मिळत आहे. आणखी एखादा मोठा पाऊस झाला तर हा रस्ता मोठ्या प्रमाणावर खचून या मार्गावरील वाहतूक बंद पडण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. या रस्त्याची दुरूस्ती करून होणारे अपघात टाळावेत, अशी मागणी श्रीराम मुंंडे, सुरेश अंडील यांनी केली आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता अभय देशमुख म्हणाले, हा रस्ता किती आणि कसा खचला आहे, याची आम्ही पाहणी करू. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने लवकरात लवकर हा रस्ता दुरूस्त केला जाईल. नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्यात येईल़(वार्ताहर)संपर्क तुटू शकतो़़़धारुर ते वडवणी रस्त्यादरम्यान पारगाव, दहिफळ, चारदरी, चिंचवण, धारूर, आदी गावांचा संपर्क होतो़ हा रस्ता दुरुस्त न झाल्यास वरील गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता आहे़