शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकाल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
3
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
5
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
6
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
7
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
8
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
9
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
10
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
11
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
12
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
13
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
14
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
15
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
16
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
17
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
18
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
19
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
20
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार

व्यापाऱ्यांची गुन्हे शाखेकडून कसून चौकशी

By admin | Updated: May 27, 2017 00:41 IST

जालना : नाफेड हमीभाव केंद्रावरील तूर विक्री प्रकरणात संशयित व्यापाऱ्यांचे जबाब नोंदविण्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुरुवात केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : नाफेड हमीभाव केंद्रावरील तूर विक्री प्रकरणात संशयित व्यापाऱ्यांचे जबाब नोंदविण्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुरुवात केली आहे. दोन दिवसांत २१ व्यापाऱ्यांचे जबाब नोंदविण्यात आल्याची विश्वसनीय माहिती आहे. त्यामुळे गुन्हे दाखल होण्याच्या भितीने व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे.जालन्यातील नाफेडच्या तूर खरेदी केंद्रावर पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात साडेआठ हजार शेतकऱ्यांनी एक लाख ४२ हजार तीनशे क्विंटल तुरीची विक्री केली आहे. तुरीची आवक वाढल्याने २३ मार्चनंतर प्रती शेतकरी केवळ २५ क्विंटल तूर विक्रीची मर्यादा निश्चित करण्यात आली.दोन वेळा मुदतवाढ देऊन तुरीची आवक वाढतच गेल्यामुळे नाफेड केंद्राबाहेरील तुरीचे पंचनामे करण्याचे जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी आदेश दिले.पंचनाम्यात तुरीच्या तीन हजार पोत्यांचे मालक समोर आले नाहीत. त्यातच तुरीचे अठराशे पोते एकाच रात्रीतून गायब झाल्याने एकूण तूर खरेदीचा व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात सापडला. त्यामुळे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले. संशयित शेतकरी व व्यापारी अशा तब्बल ८४०० जणांची यादी तयार करण्यात आली आहे. पैकी शंभर क्विंटलपेक्षा अधिक तूर विक्री करणारे ८७९ शेतकरी, व्यापारी गुन्हे शाखेच्या रडारवर आहेत.तसेच ज्या व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या नावावर तूर विक्री करून बँकेत शेतकऱ्याच्या खात्यावर जमा झालेले पैसे, धनादेश व आरटीजीएसच्या माध्यमातून स्वत:च्या खात्यावर वळती केले, अशांंची कसून चौकशी केली जात आहे. गुरुवारी ११, तर शुक्रवारी दहा व्यापाऱ्यांना थेट मोंढ्यातून चौकशीकरिता गुन्हे शाखेत आणण्यात आल्याचे समजते.यामध्ये शहरातील काही प्रतिष्ठित व्यापाऱ्यांचाही समावेश आहे. चौकशीसाठी बोलावण्यात आलेल्या व्यापाऱ्यांचे जबाब नोंदविल्यानंतर आवश्यकता वाटल्यास पुन्हा हजर राहण्याच्या अटीवर त्यांना सोडण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. तूर विक्री प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नावावर तूर विक्री करणे अनेकांना महागात पडण्याची चिन्हे आहेत.