शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
5
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
6
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
7
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
8
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
9
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
10
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
11
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
12
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
14
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
15
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
16
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
17
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
18
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
19
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
20
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...

व्यापाऱ्यांची गुन्हे शाखेकडून कसून चौकशी

By admin | Updated: May 27, 2017 00:41 IST

जालना : नाफेड हमीभाव केंद्रावरील तूर विक्री प्रकरणात संशयित व्यापाऱ्यांचे जबाब नोंदविण्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुरुवात केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : नाफेड हमीभाव केंद्रावरील तूर विक्री प्रकरणात संशयित व्यापाऱ्यांचे जबाब नोंदविण्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुरुवात केली आहे. दोन दिवसांत २१ व्यापाऱ्यांचे जबाब नोंदविण्यात आल्याची विश्वसनीय माहिती आहे. त्यामुळे गुन्हे दाखल होण्याच्या भितीने व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे.जालन्यातील नाफेडच्या तूर खरेदी केंद्रावर पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात साडेआठ हजार शेतकऱ्यांनी एक लाख ४२ हजार तीनशे क्विंटल तुरीची विक्री केली आहे. तुरीची आवक वाढल्याने २३ मार्चनंतर प्रती शेतकरी केवळ २५ क्विंटल तूर विक्रीची मर्यादा निश्चित करण्यात आली.दोन वेळा मुदतवाढ देऊन तुरीची आवक वाढतच गेल्यामुळे नाफेड केंद्राबाहेरील तुरीचे पंचनामे करण्याचे जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी आदेश दिले.पंचनाम्यात तुरीच्या तीन हजार पोत्यांचे मालक समोर आले नाहीत. त्यातच तुरीचे अठराशे पोते एकाच रात्रीतून गायब झाल्याने एकूण तूर खरेदीचा व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात सापडला. त्यामुळे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले. संशयित शेतकरी व व्यापारी अशा तब्बल ८४०० जणांची यादी तयार करण्यात आली आहे. पैकी शंभर क्विंटलपेक्षा अधिक तूर विक्री करणारे ८७९ शेतकरी, व्यापारी गुन्हे शाखेच्या रडारवर आहेत.तसेच ज्या व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या नावावर तूर विक्री करून बँकेत शेतकऱ्याच्या खात्यावर जमा झालेले पैसे, धनादेश व आरटीजीएसच्या माध्यमातून स्वत:च्या खात्यावर वळती केले, अशांंची कसून चौकशी केली जात आहे. गुरुवारी ११, तर शुक्रवारी दहा व्यापाऱ्यांना थेट मोंढ्यातून चौकशीकरिता गुन्हे शाखेत आणण्यात आल्याचे समजते.यामध्ये शहरातील काही प्रतिष्ठित व्यापाऱ्यांचाही समावेश आहे. चौकशीसाठी बोलावण्यात आलेल्या व्यापाऱ्यांचे जबाब नोंदविल्यानंतर आवश्यकता वाटल्यास पुन्हा हजर राहण्याच्या अटीवर त्यांना सोडण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. तूर विक्री प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नावावर तूर विक्री करणे अनेकांना महागात पडण्याची चिन्हे आहेत.