शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरी बंधाऱ्याच्या गेट चोरीचा तपास थंड बस्त्यात

By admin | Updated: July 28, 2014 00:57 IST

फकिरा देशमुख, भोकरदन भोकरदन - जाफराबाद तालुक्यात १२ कोटी रूपये खर्च करून बांधलेल्या तीन कोल्हापुरी बंधाऱ्यांचे ३५० लोखंडी दरवाजे चोरीला जाऊन दोन वर्ष झाली.

फकिरा देशमुख, भोकरदनभोकरदन - जाफराबाद तालुक्यात १२ कोटी रूपये खर्च करून बांधलेल्या तीन कोल्हापुरी बंधाऱ्यांचे ३५० लोखंडी दरवाजे चोरीला जाऊन दोन वर्ष झाली. अद्यापही या भागातील लोकप्रतिनिधींनी संबंधित दरवाजे बसविण्यासाठी कोणताही पाठपुरावा न केल्यामुळे जमासाठा होण्याऐवजी वाहून जात आहे. याची चिंता ना लोकप्रतिनिधींना न संबंधित विभागाला आहे.भोकरदन तालुक्यात कोल्हापुरी बंधाऱ्याच्या भूमिपूजनच्या कार्यक्रमावरून केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आ़ चंद्रकांत दानवे व बदनापूरचे आ़ संतोष सांबरे यांच्यात चांगलीच राजकीय जुगलबंदी सुरु आहे. मात्र ज्या नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रमावरून पुढारी भांडत आहेत. त्याच नद्यावरील कोल्हापुरी बंधाऱ्याचे तब्बल ४०० दरवाजे चोरीला गेले आहेत. त्यामध्ये पाणीसाठा होत नाही. त्या बंधाऱ्याचे दरवाजे बसविण्यासाठी या लोकप्रतिनिधींना वेळ नाही अशी परिस्थिती आहे. दोन्ही दानवे व संतोष सांबरे यांनी वजीरखेडा, सिरसगाव मंडप, गोकुळ जाफराबाद तालुक्यातील सावंगी वरगणे, मेरखेडा येथील कोल्हापुरी बधांऱ्याचे एकूण ४०० लोखंडी दरवाजे गेल्या वर्षी चोरीला गेले आहेत. या प्रकणात जाफराबाद व हसनाबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तर सिरसगाव मंडप प्रकरणात भोकरदन पोलिस ठाण्यात अधिकाऱ्यांनी तक्रार देऊन मोकळे झाले. चोरी गेलेल्या एका दरवाजाचे वजन हे १ क्विंटलपर्यंत आहे. जर ३५० दरवाजे चोरीला जाईपर्यंत पाटबंधारे विभागाच्या अधिकारी, कर्मचारी किंवा या परिसरातील शेतकऱ्यांना कसे कळाले नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. सदरील दरवाजे चोरी प्रकरणाशी या खात्यातील कोणाचा वरदहस्त आहे काय कारण ट्रक शिवाय दरवाजे घेऊन जाणे शक्य नाही, असे असताना सुध्दा पोलिसांनी केवळ गुन्हे दाखल करून घेतले व फाईल बंद केली, असाच प्रकार म्हणावा लागणार आहे. सदरील चोरी गेलेल्या दरवाज्यांचा तपास लावावा किवा नवीन दरवाजे बसविण्यासाठी रावसाहेब दानवे, आ़ चंद्रकांंत दानवे, आ़ संतोष सांबरे यांनी काही प्रयत्न केले का सवाल जनतेतून व्यक्त होत आहे. जर दरवाजाचा शोध लागत नसेल तर पाटबंधारे विभागाने फायबर दरवाजासाठी सादर केलेल्या प्रस्तावाला या नेत्यांनी आतापर्यंत का पाठपुरावा करून दरवाजे मंजूर करून आणले नाही. कारण जर हे नेते नवीन तीन कोल्हापुरी बंधारे मंजूर करुन आणल्याच्या श्रेयासाठी भांडत आहेत. तर या तीन कोल्हापुरी बंधाऱ्यांना नवीन दरवाजे मंजूर करून घेण्यासाठी का भांडत नाहीत.या तीन नेत्यांपैकी चंद्रकांत दानवे हे राज्यातील सत्ताधारी आमदार आहेत. त्यांनी सुध्दा या बंधाऱ्यात पाणीसाठा होण्यासाठी काही काय केले हे जनतेसमोर सांगण्याची गरज आहे.दुर्लक्ष कायम...केवळ निवडणुका आल्या म्हणून आपणच विकासाची कामे केली म्हणून जनतेला भूलथापा मारून मतदारांना आपल्याकडे वळविण्यासाठी या नेत्यांचा केविलवाणा प्रयत्न सुरु असल्याची चर्चा तालुक्यात रंगत आहे.