शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

Aurangabad Violence : विशेष तपास पथकाकडून चौकशीला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 12:09 IST

शहरातील काही भागांत झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक गठित करण्यात आले आहे.

औरंगाबाद : शहरातील काही भागांत झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक गठित करण्यात आले आहे. या पथकाने कामाला सुरुवात केली असून, नागरिकांकडून सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुरावे गोळा करण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू करण्यात आले आहे. दंगलीतील दोन जणांना अटक करून तीन दिवस पोलीस कोठडीत अधिकची विचारपूस केली जाणार आहे.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रभारी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक गठित केले आहे. या पथकात सहायक पोलीस आयुक्त सी. डी. शेवगण, पोलीस निरीक्षक सुरेश वानखेडे, नाथा जाधव, अविनाश आघाव, श्रीकांत नवले, सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे, अजबसिंग जारवाल, विजय घोरडे, पोलीस उपनिरीक्षक हेमंत तोडकर, योगेश धोंडे यांचा समावेश राहणार आहे. पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे, राहुल श्रीरामे हेही पथकाला सहकार्य करीत आहेत.

शुक्रवारी औरंगाबादेत किरकोळ कारणावरून दंगल होऊन शेकडो वाहने, अनेक दुकाने जाळली. यामध्ये कोट्यवधींचे नुकसान झाले. पथकाने सोमवारपासूनच प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे. घटनास्थळावर जाऊन दंगलीशी संबंधितविविध पुरावे गोळा केले जात आहेत.

नागरिकांकडे असलेले मोबाईल शूटिंग, सीसीटीव्ही फुटेज गोळा करण्यात येत आहे, तसेच घटनास्थळावर पडलेल्या रॉकेलच्या बाटल्या, दगड, पेट्रोलने भरलेल्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. विविध पोलीस ठाण्यांत दाखल असलेल्या गुन्ह्यांच्या अनुषंगाने लोकांची ओळख पटवून त्यांना अटक करण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे.

मोबाईल कॅमेरेच तपासाचा केंद्रबिंदूशुक्रवारी रात्री शहरात उसळलेल्या दंगलीचे मोबाईल कॅमेऱ्यामध्ये असंख्य नागरिकांनी चित्रीकरण केले. नागरिकांनी केलेले चित्रीकरणच पोलीस तपासासाठी उपयुक्त ठरत आहे. या आधारावरच पोलिसांनी तपासाची पुढील दिशा ठरविण्यास सुरुवात केली असून, दंगलीशी संबंधित अनेक पुरावे जमा करण्याचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे. ज्या नागरिकांनी आपल्या मोबाईल कॅमे-याद्वारे चित्रीकरण केले होते त्याचे व्हिडिओच सोशल मीडियावर अपलोड केले. मंगळवारी दिवसभर शहरात व्हिडिओची देवाण-घेवाण सुरू होती. स्मार्ट सिटींतर्गंत शहरात तब्बल १८०० सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. हे काम मागील एक ते दीड वर्षापासून रखडले

टॅग्स :Aurangabad Violenceऔरंगाबाद हिंसाचारAurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीस