शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
2
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
3
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
4
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
5
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
6
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
7
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
8
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
9
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
10
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
11
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
12
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
13
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
14
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
15
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
16
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
17
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
18
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
19
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
20
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

स्मॅटस प्रणालीनंतरही अवैध वाळू उपसा जोरात

By admin | Updated: April 4, 2015 00:32 IST

गजानन वानखडे , जालना मोठा गाजावाजा करून जिल्ह्यातील विविध वाळू पट्ट्यातून होत असलेल्या अवैध वाळू उपशावर नियंत्रण ठेवण्यासाठी मोठा गाजावाजा करुन स्मॅटस् प्रणालीचा वापर सुरु केला आ

 

गजानन वानखडे , जालना

मोठा गाजावाजा करून जिल्ह्यातील विविध वाळू पट्ट्यातून होत असलेल्या अवैध वाळू उपशावर नियंत्रण ठेवण्यासाठी मोठा गाजावाजा करुन स्मॅटस् प्रणालीचा वापर सुरु केला आहे. मात्र असे असले तरी वाळू पट्ट्यातून अवैध वाळू उपसा सुरुच आहे. यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसुलास चुना लावला जात आहे. चोरीवर अंकुश ठेवण्यासाठी स्मॅट्स प्रणाली सुरू करण्यात आली. परंतु अद्यापही वाळू चोरी थांबलेली नाही. यामुळे स्मॅट्स प्रणालीच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत. स्मॅट्स प्रणाली संपूणत: मोबाईलवर आधारित आहे. महाआॅनलाईनला जोडल्या गेलेल्या क्रमांकावर संबंधित वाहने यात नियंत्रित करता येतात. पण या शिवाय इतर माध्यमातून होणाऱ्या वाळू चोरीवर नियंत्रण मिळविणे यातून शक्य होत नाही. त्याकरिता गौण खनिज विभागाला संपूर्णत: महसूल विभागाच्या सहकार्यावर अवलंबून राहावे लागत आहे. या विभागाच्या मर्यादाही वेळोवेळी स्पष्ट झाल्या आहेत. महसूल विभाग आपल्या सवडीनुसार व आवश्यकतेनुसार वाळू माफियांवर कारवाई करते. तर कधी दुर्लक्ष करते. भोकरदन, अंबड, घनसावंगी, बदनापूर, परतूर, मंठा, जाफराबाद आदी आठही तालुक्यात राजरोसपणे मोठ्या प्रमाणात वाळूची चोरी होत आहे. याकडे महसूल विभागासह गौण खनिज विभागाचे दुर्लक्ष असते. यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या अधिकारी वर्गावर या वाळू माफियांनी मारहाण करून अंगावर वाहने घालण्यापर्यंत मजल गेली आहे. वाळू माफियांच्या सुळसुळाटामुळे सर्वत्र यंत्रणा हैराण झाल्या आहेत. त्यामुळे या वाळू माफियांच्या धाकामुळे प्रशासन सुस्तावले के काय असा प्रश्न पडला आहे. चोरीचे प्रमाण जास्त असले तरी कारवाईचे प्रमाण अत्यल्प आहे. आठही तालुक्यात दररोज असंख्य वाहनांव्दारे विविध घाटावरून वाळू चोरी होत आहे. त्यातील काही वाहनेच महसूल, गौण खनिज विभागाचे कर्मचारी पकडतात. त्यांच्याकडून दंड आकारून वाहने सोडली जातात. दंडासोबतच चोरीचे वाहने जप्त करून पोलिसांत देणे, फौजदारी कारवाई करणे आदी प्रकारची कारवाई इतर जिल्ह्यात केली जाते. मात्र जालना जिल्ह्यात मात्र अशी कारवाई अपवादानेच होते. त्यामुळे यात कोणाकोणाचे हितसंबंध आहेत असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यापूर्वी जीपीस प्रणालीव्दारे आणि बारकोड पावत्यांच्या प्रणालीचा वापर करण्यात आलेला आहे. परंतु या दोनही पध्दती अयशस्वी ठरल्या आहेत. स्मॅट्स प्रणाली केवळ लिलाव घेणाऱ्या ठेकेदारावच लक्ष ठेवते त्यामुळे या प्रणालीच्या सुध्दा मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील गिरजा पूर्णा, अंबड व घनसावंगी तालुक्यातील गोदावरी, तसेच परतूर तालुक्यातील दुधनाच्या नदीच्या पात्रातून दिवसरात्र हजारो ब्रास वाळूचा उपसा होत आहे. यामुळे नदीपात्राची अक्षरश: चाळणी झाली आहे. दहा ते बारा फुट खोल खड्डे पडले आहेत. सततच्या वाळू उपशामुळे परिसरातील पाणी पातळीवरही मोठा परिणाम होत आहे. एकूणच वाळू उपशामुळे नदीपात्र पर्यायाने पर्यावरण व रस्त्यांचीही वाट लागली आहे.