शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

महिला बाल रुग्णालयाच्या नूतनीकरणास मुहूर्त

By admin | Updated: May 26, 2014 00:31 IST

जालना : महिला व बाल रुग्णालयाच्या नूतनीकरणास अखेर मुहूर्त लागणार असून जूनच्या दुसर्‍या आठवड्यात कामाचा शुभारंभ होणार असल्याचे आ. कैलास गोरंट्याल यांनी सांगितले.

जालना : बहुप्रतिक्षित जिल्ह्यातील एकमेव जालना येथील महिला व बाल रुग्णालयाच्या नूतनीकरणास अखेर मुहूर्त लागणार असून जूनच्या दुसर्‍या आठवड्यात कामाचा शुभारंभ होणार असल्याचे आ. कैलास गोरंट्याल यांनी सांगितले. रविवारी पत्रकार परिषदेत बोलताना आ. गोरंट्याल यांनी ही माहिती दिली. हे रुग्णालय दुमजली उभारण्यात येणार असून त्यासाठी ३५ कोटी ३६ लाखांच्या निधीस शासनाने मान्यता दिली आहे. रुग्णालयाच्या इमारतीबरोबरच डॉक्टर व कर्मचार्‍यांची निवासस्थाने, एक धर्मशाळाही उभारण्यात येणार असल्याचे आ. गोरंट्याल यांनी सांगितले. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांच्या प्रयत्नांमुळेच हा निधी मंजूर झाल्याचे ते म्हणाले. शहरातील महात्मा फुले मार्केटमधील नवीन संकुलाच्या कामाची संचिका प्रशासकीय स्तरावर मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. याबाबत आपण संबंधित अधिकार्‍यांची भेट घेऊन हे कामही लवकर सुरू व्हावे, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आ. गोरंट्याल म्हणाले. नगरपालिकेने गेल्या अडीच वर्षांच्या काळात प्रभावीपणे चांगली कामे केल्याने पालिकेस आयएसओ ९००१:२००८ प्रमाणपत्र मिळाले. ज्यामुळे आगामी काळात नवीन योजना अंमलात येऊ शकतील, असा विश्वास गोरंट्याल यांनी व्यक्त केला. शहरात ३० नवीन रस्त्यांची कामे पालिकेने हाती घेतली असून त्यापैकी काही पूर्ण झाली तर काही अंतिम टप्प्यात आहेत. १० जूनपर्यंत आणखी १४ रस्त्यांची कामे पूर्ण करण्याचा निर्णयही पालिकेने घेतला आहे. याशिवाय १० हायमॅक्स दिवे लावण्यात आले आहेत. सहा चौकांचे सुशोभिकरण होत असून त्यापैकी एकाचे काम पूर्ण झाले. पाणीपट्टीत तीन पटींनी वाढ एक वर्षापूर्वीच झालेली आहे. शहरासाठी महत्वाच्या असलेल्या जायकवाडी-जालना पाणीपुरवठा योजनेचा खर्च कसा काढायचा, यासाठी पाणीपट्टीचा पर्याय समोर आला होता. २००५-०६ मध्ये याविषयीचा ठराव पालिकेत सर्वसंमतीने घेण्यात आला होता, असेही ते म्हणाले. यावेळी प्रभारी नगराध्यक्ष राजेश राऊत, नगरसेविका पार्वताबाई रत्नपारखे, जगदीश भरतिया, मोहन इंगळे, राम सावंत यांची उपस्थिती होती.लोकसभा निवडणुकीच्या वेळी देशात लाट होती. त्यामुळे राज्यातही काँग्रेस आघाडीचे दिग्गज उमेदवारांना पराभव पत्करावा लागला. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत अशा प्रकारची लाट राहणार नाही, असा विश्वास आ. गोरंट्याल यांनी व्यक्त केला. जालना शहरात अनेक सुविधा देण्याचा प्रयत्न नगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात आल्याचे आ. गोरंट्याल यांनी यावेळी पत्रकारांना सांगितले.