शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभेत लोकप्रतिनिधींची संख्या वाढवून हिंदुत्ववादी सत्ता राखण्याचा डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:02 IST

औरंगाबाद : सध्या लोकसभेतील ५४३ खासदारांची संख्या बदलून १ हजार करण्यात येणार आहे. त्यात उत्तरप्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाणा, मध्य ...

औरंगाबाद : सध्या लोकसभेतील ५४३ खासदारांची संख्या बदलून १ हजार करण्यात येणार आहे. त्यात उत्तरप्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाणा, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यात ६०० ते ६५० खासदारांच्या जागा द्यायच्या आणि दक्षिण, पूर्वांचल भागातून ३५० ते ४०० खासदारांच्या जागा देण्याचा डाव आहे. यातूृन कायम हिंदू पट्ट्यातील संख्येच्या आधारावर हिंदुत्ववादी सरकार दिल्लीत कायम राहील, असा डाव आखला जात असल्याचा दावा ज्येष्ठ विचारवंत तथा राज्यसभेतील खासदार कुमार केतकर यांनी केला आहे. यातून देश पुन्हा फाळणीच्या दिशेने जाणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

लोकसंवाद फाउंडेशतर्फे अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त खासदार केतकर यांचे ' भारत : काल, आज आणि उद्या ' या विषयावर व्याख्यानाचे आयोजन रविवारी ऑनलाईन पद्धतीने झाले. अध्यक्षस्थानी माजी कुलगुरू डॉ. सुधीर गव्हाणे होते. यावेळी बोलताना खासदार केतकर म्हणाले, लोकसभेतील खासदार एक हजारपर्यंत वाढविणे हे भाजपचे आगामी उद्दिष्ट आहे. भाजपचा पाया भक्कम असलेल्या उत्तर प्रदेश, हरियाणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान आदी भागातील हिंदू बहुल भागातील लोकप्रतिनिधींची संख्या वाढवत कायमस्वरुपी हिंदुत्ववादी सत्ता देशावर राखण्याचा प्रयत्न यातून केला जात आहे. मात्र यातूनच देशात अस्वस्थता वाढणार आहे. काश्मीर, पंजाब, तामिळनाडू, मिझोराम, आसाम आदी राज्यातून स्वतंत्र होण्याची मागणी पुढे येऊ शकेल. सध्या नव्याने बांधण्यात येत असलेल्या संसदेतील लोकसभेत १ हजार खासदार बसतील, अशी व्यवस्था केली जात असल्याचा दावाही कुमार केतकर यांनी केला आहे. अध्यक्षीय समारोपात डॉ. गव्हाणे यांनी मागील ७५ वर्षांत झालेल्या विकासात्मक कामाचा प्रचार आणि प्रसार करण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे, असे आवाहन यावेळी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेश करपे यांनी केले. सूत्रसंचालन संजय शिंदे यांनी केले. डॉ. गणेश मोहिते यांनी आभार मानले.

चौकट,

नेहरू -गांधींमुळेच देशाची प्रगती

भारत स्वतंत्र झाला त्यावेळी देशाची लोकसंख्या ३५ कोटी होती. आता १३५ कोटी झाली आहे. या लोकसंख्येला भारत जगवू शकतो, दोन वेळेचे अन्न देऊ शकतो. हे केवळ ७५ वर्षात झालेल्या प्रगतीमुळेच आहे. स्वातंत्र्यावेळी केवळ १ कोटी लोक मध्यम वर्गात होते. आज ती संख्या ४० कोटीपर्यंत पोहचली. पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून नियोजनबद्धपणे उच्चशिक्षण संस्था स्थापन केल्या. यातून शिक्षण घेऊन असंख्य विद्यार्थी परदेशात गेले. इंदिरा गांधी यांनी बँकांचे राष्ट्रीयीकरण करून खेडोपाडी आर्थिक कर्जाची उपलब्धता करून दिली. शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध झाले. यातून हरित क्रांती झाली. राजीव गांधी यांच्या तंत्रस्नेही धोरणामुळे भारत जगात संगणक तंत्रज्ञानाचा हब बनला. या धोरणांमुळेच देशातील मध्यम वर्गाची संख्या वाढली, ही देशाच्या प्रगतीची कारणे असल्याचेही खा. केतकर यांनी सांगितले.