शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

लोकसभेत लोकप्रतिनिधींची संख्या वाढवून हिंदुत्ववादी सत्ता राखण्याचा डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:02 IST

औरंगाबाद : सध्या लोकसभेतील ५४३ खासदारांची संख्या बदलून १ हजार करण्यात येणार आहे. त्यात उत्तरप्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाणा, मध्य ...

औरंगाबाद : सध्या लोकसभेतील ५४३ खासदारांची संख्या बदलून १ हजार करण्यात येणार आहे. त्यात उत्तरप्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाणा, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यात ६०० ते ६५० खासदारांच्या जागा द्यायच्या आणि दक्षिण, पूर्वांचल भागातून ३५० ते ४०० खासदारांच्या जागा देण्याचा डाव आहे. यातूृन कायम हिंदू पट्ट्यातील संख्येच्या आधारावर हिंदुत्ववादी सरकार दिल्लीत कायम राहील, असा डाव आखला जात असल्याचा दावा ज्येष्ठ विचारवंत तथा राज्यसभेतील खासदार कुमार केतकर यांनी केला आहे. यातून देश पुन्हा फाळणीच्या दिशेने जाणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

लोकसंवाद फाउंडेशतर्फे अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त खासदार केतकर यांचे ' भारत : काल, आज आणि उद्या ' या विषयावर व्याख्यानाचे आयोजन रविवारी ऑनलाईन पद्धतीने झाले. अध्यक्षस्थानी माजी कुलगुरू डॉ. सुधीर गव्हाणे होते. यावेळी बोलताना खासदार केतकर म्हणाले, लोकसभेतील खासदार एक हजारपर्यंत वाढविणे हे भाजपचे आगामी उद्दिष्ट आहे. भाजपचा पाया भक्कम असलेल्या उत्तर प्रदेश, हरियाणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान आदी भागातील हिंदू बहुल भागातील लोकप्रतिनिधींची संख्या वाढवत कायमस्वरुपी हिंदुत्ववादी सत्ता देशावर राखण्याचा प्रयत्न यातून केला जात आहे. मात्र यातूनच देशात अस्वस्थता वाढणार आहे. काश्मीर, पंजाब, तामिळनाडू, मिझोराम, आसाम आदी राज्यातून स्वतंत्र होण्याची मागणी पुढे येऊ शकेल. सध्या नव्याने बांधण्यात येत असलेल्या संसदेतील लोकसभेत १ हजार खासदार बसतील, अशी व्यवस्था केली जात असल्याचा दावाही कुमार केतकर यांनी केला आहे. अध्यक्षीय समारोपात डॉ. गव्हाणे यांनी मागील ७५ वर्षांत झालेल्या विकासात्मक कामाचा प्रचार आणि प्रसार करण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे, असे आवाहन यावेळी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेश करपे यांनी केले. सूत्रसंचालन संजय शिंदे यांनी केले. डॉ. गणेश मोहिते यांनी आभार मानले.

चौकट,

नेहरू -गांधींमुळेच देशाची प्रगती

भारत स्वतंत्र झाला त्यावेळी देशाची लोकसंख्या ३५ कोटी होती. आता १३५ कोटी झाली आहे. या लोकसंख्येला भारत जगवू शकतो, दोन वेळेचे अन्न देऊ शकतो. हे केवळ ७५ वर्षात झालेल्या प्रगतीमुळेच आहे. स्वातंत्र्यावेळी केवळ १ कोटी लोक मध्यम वर्गात होते. आज ती संख्या ४० कोटीपर्यंत पोहचली. पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून नियोजनबद्धपणे उच्चशिक्षण संस्था स्थापन केल्या. यातून शिक्षण घेऊन असंख्य विद्यार्थी परदेशात गेले. इंदिरा गांधी यांनी बँकांचे राष्ट्रीयीकरण करून खेडोपाडी आर्थिक कर्जाची उपलब्धता करून दिली. शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध झाले. यातून हरित क्रांती झाली. राजीव गांधी यांच्या तंत्रस्नेही धोरणामुळे भारत जगात संगणक तंत्रज्ञानाचा हब बनला. या धोरणांमुळेच देशातील मध्यम वर्गाची संख्या वाढली, ही देशाच्या प्रगतीची कारणे असल्याचेही खा. केतकर यांनी सांगितले.