शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत रात्र वैऱ्याची! आधीच यमुनेच्या पुराचे पाणी, त्यात भूकंप, अफगाणिस्तानात केंद्र
2
इथे खरा पेच...! दुकानदार २२ सप्टेंबरपासून आधीचा माल कसा विकणार? GST कमी करून की...
3
स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा निर्णय, काँग्रेसच्या काळात...; जीएसटी बदलावर पंतप्रधानांची पहिली प्रतिक्रिया
4
अजित पवारांना नडलेल्या IPS अधिकारी अंजना कृष्णा कोण आहेत?
5
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
6
नेपाळमध्ये फेसबुक, एक्ससह २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी, युट्यूब अन् व्हॉट्सअ‍ॅपवरही बंदी
7
मोठा गाजावाजा करत मुंबईकडे कूच करणार त्याआधीच वैभव खेडेकरांचा भाजपा पक्षप्रवेश स्थगित; कारण काय?
8
नाशिक मंडळ : अल्प उत्पन्न गटासाठी म्हाडाची ४७८ घरे
9
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
10
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
11
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
12
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
13
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
14
Happy Teachers Day 2025: शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
15
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
16
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
17
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
18
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
20
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना

निकाल जाहीर करून पात्र असल्यास मुलाखतीची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:05 IST

औरंगाबाद : लोकसेवा आयोगाने जाहीर केलेल्या मुदतीत पदवी प्रमाणपत्र मिळाले नसल्याने राखून ठेवलेला दोघा उमेदवारांचा मुख्य परीक्षेचा ...

औरंगाबाद : लोकसेवा आयोगाने जाहीर केलेल्या मुदतीत पदवी प्रमाणपत्र मिळाले नसल्याने राखून ठेवलेला दोघा उमेदवारांचा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर करून ते पात्र असल्यास त्यांना मुलाखतीची संधी द्यावी, असा आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्या. संजय गंगापूरवाला व न्या. श्रीकांत कुलकर्णी यांनी लोकसेवा आयोगास दिला आहे.

नितीशा संजय जगताप आणि वैभव सुभाषराव बांगर यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा उत्तीर्ण करून मुख्य परीक्षेसाठी अर्ज केला होता. त्यांचा अर्ज स्वीकारण्यात आला आणि मुख्य परीक्षाही घेण्यात आली.

कोविडमुळे संबंधितांची अंतिम वर्षाची परीक्षा एप्रिल २०२० ऐवजी ऑक्टोबर २०२० मध्ये घेण्यात आली. निकाल ३ डिसेंबर २०२० रोजी लागला.

मुख्य परीक्षेसाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ११ नोव्हेंबर २०२० होती. तत्पूर्वी पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य होते; परंतु निकाल ३ डिसेंबर २०२० रोजी लागल्याने संबंधित उमेदवार विहित मुदतीत पदवीचे प्रमाणपत्र दाखल करू शकले नाहीत. मुख्य परीक्षा ८ ते १७ जानेवारी २०२१ या कालावधीत पार पडली. केंद्रीय लोकसेवा आयोगाने मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर केला; परंतु वरील दोघांचा निकाल जाहीर केला नाही. मुलाखतीसाठी कागदपत्रे सादर करण्याची ५ एप्रिल २०२१ शेवटची तारीख होती. दोघांनी रविभूषण आडगावकर व ॲड. सचिन देशमुख यांच्यामार्फत याचिका दाखल केली होती. केंद्रातर्फे ॲड. आर. आर. बांगर यांनी काम पाहिले.

..................................