शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

निकाल जाहीर करून पात्र असल्यास मुलाखतीची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:05 IST

औरंगाबाद : लोकसेवा आयोगाने जाहीर केलेल्या मुदतीत पदवी प्रमाणपत्र मिळाले नसल्याने राखून ठेवलेला दोघा उमेदवारांचा मुख्य परीक्षेचा ...

औरंगाबाद : लोकसेवा आयोगाने जाहीर केलेल्या मुदतीत पदवी प्रमाणपत्र मिळाले नसल्याने राखून ठेवलेला दोघा उमेदवारांचा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर करून ते पात्र असल्यास त्यांना मुलाखतीची संधी द्यावी, असा आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्या. संजय गंगापूरवाला व न्या. श्रीकांत कुलकर्णी यांनी लोकसेवा आयोगास दिला आहे.

नितीशा संजय जगताप आणि वैभव सुभाषराव बांगर यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा उत्तीर्ण करून मुख्य परीक्षेसाठी अर्ज केला होता. त्यांचा अर्ज स्वीकारण्यात आला आणि मुख्य परीक्षाही घेण्यात आली.

कोविडमुळे संबंधितांची अंतिम वर्षाची परीक्षा एप्रिल २०२० ऐवजी ऑक्टोबर २०२० मध्ये घेण्यात आली. निकाल ३ डिसेंबर २०२० रोजी लागला.

मुख्य परीक्षेसाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ११ नोव्हेंबर २०२० होती. तत्पूर्वी पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य होते; परंतु निकाल ३ डिसेंबर २०२० रोजी लागल्याने संबंधित उमेदवार विहित मुदतीत पदवीचे प्रमाणपत्र दाखल करू शकले नाहीत. मुख्य परीक्षा ८ ते १७ जानेवारी २०२१ या कालावधीत पार पडली. केंद्रीय लोकसेवा आयोगाने मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर केला; परंतु वरील दोघांचा निकाल जाहीर केला नाही. मुलाखतीसाठी कागदपत्रे सादर करण्याची ५ एप्रिल २०२१ शेवटची तारीख होती. दोघांनी रविभूषण आडगावकर व ॲड. सचिन देशमुख यांच्यामार्फत याचिका दाखल केली होती. केंद्रातर्फे ॲड. आर. आर. बांगर यांनी काम पाहिले.

..................................