शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

आंतरराष्ट्रीय बौद्ध महोत्सवाची जय्यत तयारी

By admin | Updated: October 3, 2016 00:33 IST

औरंगाबाद : येत्या १४ आॅक्टोबर रोजी औरंगाबादेत आंतरराष्ट्रीय बौद्ध महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

औरंगाबाद : बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रौप्यमहोत्सवी जयंती वर्ष तसेच धम्मदीक्षा सोहळ्यास ६० वर्षे पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून येत्या १४ आॅक्टोबर रोजी औरंगाबादेत आंतरराष्ट्रीय बौद्ध महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. बीड बायपास रोडलगतच्या जबिंदा लॉनवर उभारण्यात येणाऱ्या सभामंडपाचे भूमिपूजन रविवारी सकाळी झाले असून महोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना या महोत्सवाचे संयोजक भंते धम्मज्योती थेरो यांनी सांगितले की, जगभरातील बौद्ध राष्ट्रांसोबत भारतीय बौद्धांचे शैक्षणिक, धार्मिक, व्यापार आणि सांस्कृतिक संबंध वृद्धिंगत करण्यासाठी हा महोत्सव आयोजित करण्याचा हेतू आहे. महोत्सवाचे उद्घाटन दिल्ली येथील लामा लोबजोन यांच्या हस्ते होईल. प्रमुख पाहुणे म्हणून श्रीलंकेचे माजी राष्ट्राध्यक्ष महिंद्रा राजपक्षे याशिवाय तेथील खा. उदय गमनपिल, खा. रोहित रतवन, राजदूत सरोज श्रीसेना, कोरियाचे राजदूत सांम चून हे उपस्थित राहणार आहेत. या महोत्सवास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, समाजकल्याणमंत्री राजकुमार बडोले, पालकमंत्री रामदास कदम, दिलीप कांबळे, अर्जुन खोतकर हेदेखील उपस्थित राहणार आहेत. महोत्सवाचे स्वागताध्यक्ष म्हणून केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले असतील.आ. संजय शिरसाठ यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या महोत्सवात सकाळी ८ ते रात्री १२ वाजेपर्यंत भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात भदन्त बोधिपालो महाथेरो, भदन्त विशुद्धानंद बोधी महास्थवीर, डॉ. खेमधम्मो महास्थवीर, भदन्त एस. काश्यपायन, भदन्त प्रज्ञाशील महास्थवीर आदींसह बौद्ध भिक्खू हे धम्मदेशना देतील. या आंतरराष्ट्रीय बौद्ध महोत्सवामध्ये ‘सिद्धार्थ गौतम’ या चित्रपटातील प्रमुख अभिनेते गमन मलिक व अभिनेत्री आचल सिंह यांच्यासह एअरक्राफ्ट हे विमान तयार करणारे तरुण संशोधक अमोल यादव, माजी मंत्री गंगाधर गाडे, कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे, सैराट चित्रपटाचे दिग्दर्शक संतोष शंकर आणि अशोक आठवले यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे.