शहरं
Join us  
Trending Stories
1
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
2
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
3
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
4
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
5
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
6
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
7
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
8
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
9
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
10
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
11
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
12
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
13
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
14
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
15
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
16
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
17
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
18
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
19
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
20
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 

अंतर्गत जलवाहिनीचे काम दर्जाहीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 00:09 IST

सव्वाशे कोटी रुपये खर्चाचे अंतर्गत जलवाहिनीचे काम चुकीच्या पद्धतीने सुरू आहे. निकृष्ट पद्धतीने होत असलेल्या या कामाची गुणवत्ता न तपासताच पालिक ा प्रशासन कोट्यवधींचे देयके काढत असल्याचा आरोप नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत करण्यात आला.

सर्वसाधारण सभेत आरोप : गुणवत्तापूर्ण कामासाठी समिती हवीजालना : शहरात सव्वाशे कोटी रुपये खर्चाचे अंतर्गत जलवाहिनीचे काम चुकीच्या पद्धतीने सुरू आहे. निकृष्ट पद्धतीने होत असलेल्या या कामाची गुणवत्ता न तपासताच पालिक ा प्रशासन कोट्यवधींचे देयके काढत असल्याचा आरोप नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत करण्यात आला. जलवाहिनीच्या गुणवत्तापूर्ण कामासाठी नगराध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याची मागणीही सदस्यांनी केली.डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी नगरपालिकेची सर्वसाधारण सभा घेण्यात आली. सभागृहात उपनगराध्यक्ष राजेश राऊत, मुख्याधिकारी संतोष खांडेकर व पालिका सदस्यांची उपस्थिती होती.शहरात अंथरण्यात येत असलेल्या अंतर्गत जलवाहिनीच्या कामावर सत्ताधारी व विरोधी सदस्यांनी प्रश्न उपस्थित केले. सेनेचे विरोधी गटनेते विष्णू पाचफुले, भाजपचे भास्कर दानवे म्हणाले, की जलवाहिनीसाठी शहरात चुकीच्या पद्धतीने खोदकाम सुरू आहे. झोननिहाय काम पूर्ण करून चाचणी घेणे आवश्यक असताना एजन्सीने बहुतांश ठिकाणी अर्धवट कामे केली आहेत. काही ठिकाणी जुन्या जलवाहिनीमध्ये जोडण्या केल्या जात आहे. तरीही एजन्सीला २४ कोटींची देयके देण्यात आली. बाला परदेशी यांनी जलवाहिनीच्या कामाची गुणवत्ता तपासण्यासाठी नियुक्त पुण्याच्या फोरट्रेस एजन्सीचा मुद्दा उपस्थित केला. ११० किलोमीटर काम झालेले असताना या एजन्सीकडून एकदाही गुणवत्तेची तपासली नाही. बोगस काम सुरू असताना एकूण बिलाच्या दोन टक्के रक्कम फोरट्रेस एजन्सीला कशी देता, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शहराच्या भविष्यासाठी जलवाहिनीचे काम चांगल्या पद्धतीने होणे महत्त्वाचे आहे, त्यासाठी नगराध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली जावी. समितीने झोननिहाय कामाची तपासणी केल्यानंतरच एजन्सीचे बील मंजूर करावे, अशी मागणी अशोक पांगारकर, रावसाहेब राऊत शशिकांत घुगे, चंपालाल भगत, ज्ञानेश्वर ढोबळे आदींनी केली. मंगळबाजारात जागा असतानाही एजन्सीकडून जलकुंभ उभारणीस विलंब केला जात असल्याचा मुद्दा आरेफ खान, रमेश गौरक्षक यांनी उपस्थित केला. विकास कामांसाठी भाजप-सेनेच्या सदस्यांनी सहकार्य करावे, अशी मागणी सदस्य रफिया बेगम यांनी केली. विशिष्ट प्रभागातच विकास कामे सुरू असून, कामांचे वाटप करताना दुजाभाव केला जात असल्याचा आरोप शहाआलम खान यांनी केला. एनआरएचएम अंतर्गत शहरासाठी चार हेल्थ सेंटर मंजूर आहेत. यासाठीचा सर्व खर्च शासन करणार आहे. पालिकेने जागा न दिल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. यासाठी तातडीने जागा उपलब्ध करून द्यावी, असे लोहार म्हणाले. कुंडलिका नदीचे खोलीकरण व स्वच्छतेचे काम जिल्हा प्रशासन करत आहे. त्यामुळे विषय पत्रिकेवरील चार क्रमांकाचा कुंडलिकेच्या स्वच्छतेचा ठराव घेण्याची गरज नसल्याच्या मुद्याकडे भास्कर दानवे व शशिकांत घुगे यांनी लक्ष वेधले. सदस्यांनी उपस्थित केलेल्या विविध मुद्यांवर मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी स्पष्टीकरण दिले.