शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

एटीएम कार्डची अदलाबदल करून फसवणुक करणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत, औरंगाबाद ग्रामीण पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 13:25 IST

एटीएम सेंटरवर पैसे काढण्यासाठी गेलेल्या नागरीकांना मदतीच्या बहाण्याने एटीएम कार्डची अदलाबदल करून फसवणुक करणा-या एका आंतरराज्यीय टोळीला ग्रामीण पोलिसांनी बुधवारी छत्तीसगडमधून अटक केली.

ठळक मुद्दे देशभरातील विविध राज्यात शंभरहून अधिक गुन्हे,५० लाखाची झाली फसवणुकछत्तीसगड राज्याची राजधानी असलेल्या रायपूरमधून घेतले ताब्यात

औरंगाबाद:  एटीएम सेंटरवर पैसे काढण्यासाठी गेलेल्या नागरीकांना मदतीच्या बहाण्याने एटीएम कार्डची अदलाबदल करून फसवणुक करणा-या एका आंतरराज्यीय टोळीला ग्रामीण पोलिसांनी बुधवारी छत्तीसगडमधून अटक केली. या टोळीने देशभरातील विविध राज्यात शंभरहून अधिक गुन्हे केले असून त्यांनी या फसवणुकीतून ५० लाख  रुपये हाडपल्याची माहिती समोर आली,अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मुख्य आरोपी शैलेंद्रसिंग घिसाराम (४२,रा.सुलतानपुरी, दिल्ली), विनोदसिंग गजेंसिंग (२५),पालराम गंजेसिंग(३२,दोघे रा. लोहारी, हिस्सार, हरियाणा) आणि राजेश सतबिरसिंग (२५,रा. सुलेमाननगर, दिल्ली) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपींचे दोन साथीदार पसार असून त्यांचा शोध सुरू आहे. डॉ. आरती म्हणाल्या की,  विस्तार अधिकारी सुधाकर रंगनाथ म्हस्के (रा.औरंगाबाद) हे ८ सप्टेंबर रोजी वैजापुरमधील रेल्वेस्टेशन रोडवरील एका एटीएम सेंटरवर पैसे काढण्यासाठी गेले होते. यावेळी अनोळखी माणसाने त्यांना पैसे काढण्यासाठी मदत करतो,असे म्हणून त्यांचे एटीएम कार्ड घेतले. यावेळी आरोपीने त्यांचे एटीएम कार्ड घेतले आणि स्वॅब करून पैसे काढून दिले मात्र त्यांचे कार्ड त्यांना परत न करता ते बदलून दिले.तीन दिवसानंतर ते पुन्हा एटीएम वर पैसे काढण्यासाठी गेले तेव्हा त्यांच्याकडील एटीएम कार्ड हे दुस-याच व्यक्तीचे असल्याचे समजले. अधिक चौकशीअंती त्यांच्या खात्यातून भामट्यांनी तब्बल ७७ हजार रुपये परस्पर काढून घेतल्याचेही त्यांना कळले. त्यांनी याप्रकरणी तात्काळ वैजापुर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला. 

याबाबत माहिती मिळताच ग्रामीण गुन्हेशाखा आणि सायबर क्राईम सेलने आरोपीचा शोध सुरू केला. तेव्हा आरोपी एटीएम सेंटरमधील सीसीटिव्हीत कैद झाल्याचे आढळले. आरोपी पोलिसांच्या रेकॉर्डवरील नव्हता. यामुळे त्यांचा शोध घेणे पोलिसांना अवघड होते. असे असताना सायबर क्राईम सेलच्या मदतीने पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला. त्यांचे मोबाईल नंबर मिळविले. असता ते घटनेनंतर विविध राज्यात फिरत असल्याचे आढळले. शेवटी ही टोळी छत्तीसगड राज्याची राजधानी असलेल्या रायपूरमध्ये असल्याची पक्की माहिती मिळताच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग, उपनिरीक्षक सय्यद मोसीन,कर्मचारी रतन वारे, किरण गोरे, रविंद्र लोखंडे, सागर पाटील, योगेश तरमाळे, योगेश दारवंटे, गजानन बनसोड यांनी तेथे जाऊन बुधवारी त्यांच्या मुसक्या आवळल्या. यावेळी आरोपींकडून मोठ्या प्रमाणात विविध बँकांची एटीएम हस्तगत करण्यात आली.