शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

एटीएम कार्डची अदलाबदल करून फसवणुक करणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत, औरंगाबाद ग्रामीण पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 13:25 IST

एटीएम सेंटरवर पैसे काढण्यासाठी गेलेल्या नागरीकांना मदतीच्या बहाण्याने एटीएम कार्डची अदलाबदल करून फसवणुक करणा-या एका आंतरराज्यीय टोळीला ग्रामीण पोलिसांनी बुधवारी छत्तीसगडमधून अटक केली.

ठळक मुद्दे देशभरातील विविध राज्यात शंभरहून अधिक गुन्हे,५० लाखाची झाली फसवणुकछत्तीसगड राज्याची राजधानी असलेल्या रायपूरमधून घेतले ताब्यात

औरंगाबाद:  एटीएम सेंटरवर पैसे काढण्यासाठी गेलेल्या नागरीकांना मदतीच्या बहाण्याने एटीएम कार्डची अदलाबदल करून फसवणुक करणा-या एका आंतरराज्यीय टोळीला ग्रामीण पोलिसांनी बुधवारी छत्तीसगडमधून अटक केली. या टोळीने देशभरातील विविध राज्यात शंभरहून अधिक गुन्हे केले असून त्यांनी या फसवणुकीतून ५० लाख  रुपये हाडपल्याची माहिती समोर आली,अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मुख्य आरोपी शैलेंद्रसिंग घिसाराम (४२,रा.सुलतानपुरी, दिल्ली), विनोदसिंग गजेंसिंग (२५),पालराम गंजेसिंग(३२,दोघे रा. लोहारी, हिस्सार, हरियाणा) आणि राजेश सतबिरसिंग (२५,रा. सुलेमाननगर, दिल्ली) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपींचे दोन साथीदार पसार असून त्यांचा शोध सुरू आहे. डॉ. आरती म्हणाल्या की,  विस्तार अधिकारी सुधाकर रंगनाथ म्हस्के (रा.औरंगाबाद) हे ८ सप्टेंबर रोजी वैजापुरमधील रेल्वेस्टेशन रोडवरील एका एटीएम सेंटरवर पैसे काढण्यासाठी गेले होते. यावेळी अनोळखी माणसाने त्यांना पैसे काढण्यासाठी मदत करतो,असे म्हणून त्यांचे एटीएम कार्ड घेतले. यावेळी आरोपीने त्यांचे एटीएम कार्ड घेतले आणि स्वॅब करून पैसे काढून दिले मात्र त्यांचे कार्ड त्यांना परत न करता ते बदलून दिले.तीन दिवसानंतर ते पुन्हा एटीएम वर पैसे काढण्यासाठी गेले तेव्हा त्यांच्याकडील एटीएम कार्ड हे दुस-याच व्यक्तीचे असल्याचे समजले. अधिक चौकशीअंती त्यांच्या खात्यातून भामट्यांनी तब्बल ७७ हजार रुपये परस्पर काढून घेतल्याचेही त्यांना कळले. त्यांनी याप्रकरणी तात्काळ वैजापुर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला. 

याबाबत माहिती मिळताच ग्रामीण गुन्हेशाखा आणि सायबर क्राईम सेलने आरोपीचा शोध सुरू केला. तेव्हा आरोपी एटीएम सेंटरमधील सीसीटिव्हीत कैद झाल्याचे आढळले. आरोपी पोलिसांच्या रेकॉर्डवरील नव्हता. यामुळे त्यांचा शोध घेणे पोलिसांना अवघड होते. असे असताना सायबर क्राईम सेलच्या मदतीने पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला. त्यांचे मोबाईल नंबर मिळविले. असता ते घटनेनंतर विविध राज्यात फिरत असल्याचे आढळले. शेवटी ही टोळी छत्तीसगड राज्याची राजधानी असलेल्या रायपूरमध्ये असल्याची पक्की माहिती मिळताच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग, उपनिरीक्षक सय्यद मोसीन,कर्मचारी रतन वारे, किरण गोरे, रविंद्र लोखंडे, सागर पाटील, योगेश तरमाळे, योगेश दारवंटे, गजानन बनसोड यांनी तेथे जाऊन बुधवारी त्यांच्या मुसक्या आवळल्या. यावेळी आरोपींकडून मोठ्या प्रमाणात विविध बँकांची एटीएम हस्तगत करण्यात आली.