शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
3
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
4
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
5
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
6
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
7
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
8
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
9
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
10
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
11
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
12
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
13
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
14
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
15
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
16
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
17
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
18
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
20
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा

तब्बल सव्वालाख शेतकऱ्यांना विमा

By admin | Updated: September 2, 2014 01:55 IST

सुनील कच्छवे, औरंगाबाद सततची नापिकी आणि पावसाचा लहरीपणा, यामुळे जिल्ह्यात यंदा पीक विमा उतरविणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील

सुनील कच्छवे, औरंगाबादसततची नापिकी आणि पावसाचा लहरीपणा, यामुळे जिल्ह्यात यंदा पीक विमा उतरविणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील तब्बल १ लाख १८ हजार शेतकऱ्यांनी कापूस, मका आणि इतर पिकांचा विमा उतरविला आहे. या शेतकऱ्यांनी विम्याच्या हप्त्यापोटी तब्बल ७ कोटी ३५ लाख रुपयांचा भरणा केला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मागील काही वर्षांपासून सातत्याने नापिकीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळेच यंदा बहुसंख्य शेतकऱ्यांनी पीक विमा काढण्यास पसंती दिली आहे. कृषी विभागानेही यंदा पीक विम्यासंदर्भात विशेष जागृती मोहीम राबविली. गावोगाव विमा रथ फिरवून शेतकऱ्यांना पिकांचा विमा उतरविण्याचे आवाहन केले. त्याचा परिणाम म्हणून जिल्ह्यात यंदा पीक विमा उतरविणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या एक लाखाच्या पुढे गेली आहे. पीक विमा काढण्यासाठी सुरुवातीला ३१ जुलैपर्यंत मुदत होती; परंतु नंतर ती वाढवून १६ आॅगस्ट करण्यात आली. या मुदतीत जिल्ह्यातील तब्बल १ लाख १८ हजार ५१२ शेतकऱ्यांनी पिकांचा विमा काढला. गंगापूर तालुक्यात सर्वाधिक ३९ हजार ६५७ शेतकऱ्यांनी पिकांचा विमा काढला. त्यापाठोपाठ वैजापूर तालुक्यातही २९ हजार ६६४ शेतकऱ्यांनी पीक विम्याचा हप्ता भरला. फुलंब्री तालुक्यात सर्वात कमी २५९१ शेतकऱ्यांनी पिकांचा विमा उतरविला. जिल्ह्यात यंदा सुमारे ६ लाख ३० हजार हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली आहे. यामध्ये चार लाख हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड झाली आहे. त्यापाठोपाठ दीड लाख हेक्टरवर मका पिकाची लागवड झाली आहे. उर्वरित क्षेत्रावर सोयाबीन, बाजरी, तूर, मूग, उडीद इ. पिकांची पेरणी झाली आहे. दीड लाख हेक्टरला संरक्षणजिल्ह्यात खरिपाचे एकूण क्षेत्र ६ लाख ३० हेक्टर आहे. यापैकी दीड लाख हेक्टरला विम्याचे संरक्षण मिळाले आहे. पिकांचा विचार करता सर्वाधिक पीक विमा हा कपाशीचा काढला गेला असल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.